शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

'आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी याचिकाकर्त्यांची'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 05:42 IST

भिवंडी न्यायालयात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल असलेल्या अवमान याचिकेची शुक्रवारी सुनावणी झाली.

भिवंडी : भिवंडी न्यायालयात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल असलेल्या अवमान याचिकेची शुक्रवारी सुनावणी झाली. या वेळी आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी याचिकाकर्त्यांची असल्याचे सांगत राहुल यांच्या वकिलांनी आरोप फेटाळून लावले. पुढील सुनावणी १० सप्टेंबरला होणार आहे.लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केल्याचा आरोप राहुल यांनी केला होता. त्याविरोधात राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी मुख्य न्यायाधीश ए.आय. शेख यांच्या न्यायालयात झाली. त्या वेळी कुंटे यांचे वकील अ‍ॅड. नंदू फडके यांनी राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यासंदर्भात उच्च न्यायालयात सादर केलेला भाषणाचा लिखित उतारा मान्य आहे की नाही, अशी विचारणा या अर्जाद्वारे केली. त्यावर, आरोपी पक्षाचे वकील अ‍ॅड. संदीप पाचबोल यांनी हरकत घेत राहुल यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेला भाषणाचा उतारा हा स्वत:च्या बचावासाठी केला आहे. मात्र, अवमान याचिकेसंदर्भात पुरावा सादर करण्याची जबाबदारी ही फिर्यादी पक्षाची असल्याचे सांगत याचिकाकर्त्यांचे आरोप फेटाळून लावले. सुनावणीदरम्यान कुंटे यांच्या वतीने अ‍ॅड. नंदू फडके, अ‍ॅड. गणेश धारगळकर, अ‍ॅड. प्रबोध जयवंत यांनी, तर राहुल यांच्या वतीनेअ‍ॅड. संदीप पाचबोल, अ‍ॅड.खुशाल मोर व अ‍ॅड. नारायणअय्यर यांनी बाजू मांडली. याप्रकरणी पुढील सुनावणी १० सप्टेंबरला होणार आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस