शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आकाशपाळण्याच्या परवानग्या बसल्या जागेवरूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:04 IST

सरकारी यंत्रणा नामानिराळी : अपघात झाल्यास सगळी जबाबदारी पाळणाचालकाची

मुरलीधर भवार कल्याण : अहमदाबाद येथे आकाशपाळणा अचानक तुटल्याने दोन जणांचा मृत्यू तर पंधराजण जखमी झाल्याची घटना ताजी असताना आपल्याकडेही आकाशपाळण्याविषयी परवानग्या देताना सरकारी यंत्रणा केवळ कार्यालयात बसूनच परवानग्या देते, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे आपल्याकडील फन फेअर, उत्सव, आनंदमेळे, जत्रा यामध्ये उंच आकाशात जाण्याचा ‘आनंद’ घेणे, हे आपल्या जीवावर बेतू शकते. सरकारी यंत्रणा परवानग्या देऊन नामानिराळ्या होतात. त्यानंतर, एखादा अपघात घडल्यास त्याची सगळी जबाबदारी आकाशपाळणाचालकाच्या गळ्यात टाकून मोकळे होतात.

उंच आकाशपाळणा उभारण्याकरिता महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून परवानगी दिली जाते. ती उत्सव आयोजकाला आयोजन करण्यासाठी दिली जाते. त्या जागेचे मालमत्ता विभागाकडून परवाना शुल्क आकारले जाते. आयोजकांनी त्या जागेत आकाशपाळणा उभारायचा की, अन्य काही खेळण्यांचे प्रकार ठेवायचे, हा आयोजकांचा प्रश्न आहे. त्याठिकाणी काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी आयोजकांसह आकाशपाळणा उभारणाऱ्यावर निश्चित केली जाते. आकाशपाळणा हा किमान ८० फूट उंच असतो. एका आकाशपाळण्यात २४ सीट असतात. एका सीटवर चारजण बसतात. नव्या पद्धतीचा ३२ सीटचा आकाशपाळणाही काही ठिकाणी उभारला जात आहे.

हा व्यवसाय करणारे मुन्ना खंडेलवाल यांनी सांगितले की, आकाशपाळणा उभारण्यासाठी पोलीस परवानगी घ्यावी लागते. अग्निशमन दलाकडून नाहरकत दाखला घ्यावा लागतो. त्याचबरोबर आयोजक महापालिकेची परवानगी घेतात. सार्वजनिक बांधकाम खात्याकडूनही नाहरकत दाखला घ्यावा लागतो. हा दाखला देताना त्यात एक ओळ सर्वात शेवटी लिहिलेली असते. आकाशपाळण्याची फिटिंग झाल्यावर कार्यालयाशी संपर्क साधावा. यात दुहेरी अर्थ असला, तरी ती झाल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याचा अधिकारी जागेवर जाऊन आकाशपाळण्याची पाहणी करील, असे त्यातून अभिप्रेत आहे. एकाही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करत नाहीत. या नाहरकत दाखल्यास ७०० रुपयांची पावती फाडावी लागते. पोलीस परवानगीकरिता काही पैसे लागत नाहीत. मात्र, अग्निशमन दलास नाहरकत दाखल्याकरिता ३२०० रुपये भरावे लागतात. महापालिकेस आयोजकाला चौरस फुटांच्या दरानुसार जागेचे भाडे भरावे लागते. ते आयोजक पाळणाचालकाकडून काही अंशी घेतो.

पैसे उकळले जातात...सगळ्याच खात्यांकडून आकाशपाळणाचालकाकडून जास्तीच्या पैशांची मागणी केली जाते. तेव्हाच परवानग्या दिल्या जातात. रीतसर परवानग्या घेऊन अपघात झाल्यास पाळणाचालकाला जबाबदार धरले जाते.सरकारी यंत्रणा नामानिराळ्या राहतात. सध्या विविध अ‍ॅडव्हेंचर पार्कमुळे आकाशपाळण्याची क्रेझ कमी झाली आहे. मुंबई उपनगरांसह बड्या शहरांत आणि ग्रामीण भागातील मोठ्या जत्रेत आकाशपाळणे लावले जातात.आकाशपाळण्याचा आनंद आजही लोकांना घ्यावासा वाटतो. कल्याणच्या दुर्गाडी येथे नवरात्रीत नऊ दिवस जत्रा भरते. त्याठिकाणी आकाशपाळणाचालकाकडून नऊ दिवसांकरिता जागामालक २४ लाख रुपये भाडे वसूल करतो.

मौत का कुंआवर बंदी...देशातील अन्य राज्यांत ‘मौत का कुंआ’ या जीवघेण्या खेळावर बंदी आहे. मात्र, महाराष्ट्रात सगळीकडे सर्रास हा खेळ जत्रा आणि आनंदमेळाव्यातून आयोजित केला जातो. त्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. कल्याणच्या दुर्गाडीदेवीच्या जत्रेत दीड वर्षापूर्वी ‘मौत का कुंआ’ खेळात एक तरुणी जखमी झाली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच पाच वर्षांपूर्वी डोंबिवली पश्चिमेतील गावदेवी जत्रेत आकाशपाळण्यातून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता, तर एका तरुणाचा हात जायबंदी झाला होता.

२० फूट मोकळ्या जागेचा नियम धाब्यावरज्या ठिकाणी आकाशपाळणा उभारला जाणार आहे, त्याठिकाणी चारही बाजूला २० फूट मोकळी जागा सोडली पाहिजे. एखाद्या वेळी आकाशपाळणा अडकला व चालेनासा झाल्यास अग्निशमन दलाची गाडी बोलवून शिडीच्या साहाय्याने आकाशपाळण्यातील लोकांना खाली उतरवण्यात येते. २० फूट मोकळी जागा सोडण्याचा नियम कुठेही पाळला जात नाही. पाळण्याच्या अवतीभोवतीच अन्य खेळांचे प्रकार लावले जातात. आकाशपाळणा ज्या ठिकाणी लावला जातो, त्याठिकाणी तलाव नसावा. या नियमाकडेही डोळेझाक केली जाते. आकाशपाळणा ज्या जागेवर उभारला जाणार आहे, ती जागा मातीचा भराव टाकलेली, भुसभुशीत नसावी, याची खात्री करूनच सार्वजनिक बांधकाम विभागाने नाहरकत दाखला दिला पाहिजे. मात्र, त्यांच्याकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जात नाही.