शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

आकाशपाळण्याच्या परवानग्या बसल्या जागेवरूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:04 IST

सरकारी यंत्रणा नामानिराळी : अपघात झाल्यास सगळी जबाबदारी पाळणाचालकाची

मुरलीधर भवार कल्याण : अहमदाबाद येथे आकाशपाळणा अचानक तुटल्याने दोन जणांचा मृत्यू तर पंधराजण जखमी झाल्याची घटना ताजी असताना आपल्याकडेही आकाशपाळण्याविषयी परवानग्या देताना सरकारी यंत्रणा केवळ कार्यालयात बसूनच परवानग्या देते, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे आपल्याकडील फन फेअर, उत्सव, आनंदमेळे, जत्रा यामध्ये उंच आकाशात जाण्याचा ‘आनंद’ घेणे, हे आपल्या जीवावर बेतू शकते. सरकारी यंत्रणा परवानग्या देऊन नामानिराळ्या होतात. त्यानंतर, एखादा अपघात घडल्यास त्याची सगळी जबाबदारी आकाशपाळणाचालकाच्या गळ्यात टाकून मोकळे होतात.

उंच आकाशपाळणा उभारण्याकरिता महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून परवानगी दिली जाते. ती उत्सव आयोजकाला आयोजन करण्यासाठी दिली जाते. त्या जागेचे मालमत्ता विभागाकडून परवाना शुल्क आकारले जाते. आयोजकांनी त्या जागेत आकाशपाळणा उभारायचा की, अन्य काही खेळण्यांचे प्रकार ठेवायचे, हा आयोजकांचा प्रश्न आहे. त्याठिकाणी काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी आयोजकांसह आकाशपाळणा उभारणाऱ्यावर निश्चित केली जाते. आकाशपाळणा हा किमान ८० फूट उंच असतो. एका आकाशपाळण्यात २४ सीट असतात. एका सीटवर चारजण बसतात. नव्या पद्धतीचा ३२ सीटचा आकाशपाळणाही काही ठिकाणी उभारला जात आहे.

हा व्यवसाय करणारे मुन्ना खंडेलवाल यांनी सांगितले की, आकाशपाळणा उभारण्यासाठी पोलीस परवानगी घ्यावी लागते. अग्निशमन दलाकडून नाहरकत दाखला घ्यावा लागतो. त्याचबरोबर आयोजक महापालिकेची परवानगी घेतात. सार्वजनिक बांधकाम खात्याकडूनही नाहरकत दाखला घ्यावा लागतो. हा दाखला देताना त्यात एक ओळ सर्वात शेवटी लिहिलेली असते. आकाशपाळण्याची फिटिंग झाल्यावर कार्यालयाशी संपर्क साधावा. यात दुहेरी अर्थ असला, तरी ती झाल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याचा अधिकारी जागेवर जाऊन आकाशपाळण्याची पाहणी करील, असे त्यातून अभिप्रेत आहे. एकाही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करत नाहीत. या नाहरकत दाखल्यास ७०० रुपयांची पावती फाडावी लागते. पोलीस परवानगीकरिता काही पैसे लागत नाहीत. मात्र, अग्निशमन दलास नाहरकत दाखल्याकरिता ३२०० रुपये भरावे लागतात. महापालिकेस आयोजकाला चौरस फुटांच्या दरानुसार जागेचे भाडे भरावे लागते. ते आयोजक पाळणाचालकाकडून काही अंशी घेतो.

पैसे उकळले जातात...सगळ्याच खात्यांकडून आकाशपाळणाचालकाकडून जास्तीच्या पैशांची मागणी केली जाते. तेव्हाच परवानग्या दिल्या जातात. रीतसर परवानग्या घेऊन अपघात झाल्यास पाळणाचालकाला जबाबदार धरले जाते.सरकारी यंत्रणा नामानिराळ्या राहतात. सध्या विविध अ‍ॅडव्हेंचर पार्कमुळे आकाशपाळण्याची क्रेझ कमी झाली आहे. मुंबई उपनगरांसह बड्या शहरांत आणि ग्रामीण भागातील मोठ्या जत्रेत आकाशपाळणे लावले जातात.आकाशपाळण्याचा आनंद आजही लोकांना घ्यावासा वाटतो. कल्याणच्या दुर्गाडी येथे नवरात्रीत नऊ दिवस जत्रा भरते. त्याठिकाणी आकाशपाळणाचालकाकडून नऊ दिवसांकरिता जागामालक २४ लाख रुपये भाडे वसूल करतो.

मौत का कुंआवर बंदी...देशातील अन्य राज्यांत ‘मौत का कुंआ’ या जीवघेण्या खेळावर बंदी आहे. मात्र, महाराष्ट्रात सगळीकडे सर्रास हा खेळ जत्रा आणि आनंदमेळाव्यातून आयोजित केला जातो. त्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. कल्याणच्या दुर्गाडीदेवीच्या जत्रेत दीड वर्षापूर्वी ‘मौत का कुंआ’ खेळात एक तरुणी जखमी झाली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच पाच वर्षांपूर्वी डोंबिवली पश्चिमेतील गावदेवी जत्रेत आकाशपाळण्यातून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता, तर एका तरुणाचा हात जायबंदी झाला होता.

२० फूट मोकळ्या जागेचा नियम धाब्यावरज्या ठिकाणी आकाशपाळणा उभारला जाणार आहे, त्याठिकाणी चारही बाजूला २० फूट मोकळी जागा सोडली पाहिजे. एखाद्या वेळी आकाशपाळणा अडकला व चालेनासा झाल्यास अग्निशमन दलाची गाडी बोलवून शिडीच्या साहाय्याने आकाशपाळण्यातील लोकांना खाली उतरवण्यात येते. २० फूट मोकळी जागा सोडण्याचा नियम कुठेही पाळला जात नाही. पाळण्याच्या अवतीभोवतीच अन्य खेळांचे प्रकार लावले जातात. आकाशपाळणा ज्या ठिकाणी लावला जातो, त्याठिकाणी तलाव नसावा. या नियमाकडेही डोळेझाक केली जाते. आकाशपाळणा ज्या जागेवर उभारला जाणार आहे, ती जागा मातीचा भराव टाकलेली, भुसभुशीत नसावी, याची खात्री करूनच सार्वजनिक बांधकाम विभागाने नाहरकत दाखला दिला पाहिजे. मात्र, त्यांच्याकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जात नाही.