शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

कायमची ‘दातखिळी’, गार्डियन दंत महाविद्यालयाची मान्यता रद्द, विद्यार्थांना अन्य महाविद्यालयात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 03:45 IST

अंबरनाथ येथील गार्डीयन दंत महाविद्यालयाने अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे समोर आल्यावर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे दाद मागितली होती. दंत महाविद्यालयाला आवश्यक असलेल्या अटी पूर्ण होत नसल्याने राज्य सरकारनेही या महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ येथील गार्डीयन दंत महाविद्यालयाने अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे समोर आल्यावर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे दाद मागितली होती. दंत महाविद्यालयाला आवश्यक असलेल्या अटी पूर्ण होत नसल्याने राज्य सरकारनेही या महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दंत महाविद्यालयाला कायमची ‘दातखिळी’ बसली आहे. या महाविद्यालयात शिकणाºया १३४ विद्यार्थ्यांना दुसºया महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.अंबरनाथमधील बहुचर्चित आणि नेहमीच वादात सापडलेल्या गार्डीयन महाविद्यालय पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे. या महाविद्यालयात २०१३-१४ आणि २०१४-१५ या वर्षात प्रवेश घेतलेल्या १३४ विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचे काम महाविद्यालयाने केले आहे. या महाविद्यालयाची मान्यताच रद्द केल्याने या विद्यार्थ्यांपुढे आता मोठी समस्या निर्माण झाली आहे. महाविद्यालयाची मान्यता रद्द करत असताना या ठिकाणी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्या विद्यार्थ्यांचे इतर महाविद्यालयात स्थलांतर करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र असे असतानाही महाविद्यालय या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नव्हते. विद्यार्थ्यांना स्थलांतरीत होण्यासाठी महाविद्यालयात जमा केलेल्या कागदपत्रे आणि दाखल्यांची गरज आहे. मात्र ते देण्यासही महाविद्यालय तयार नव्हते. या प्रकरणात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी राज्य सरकारकडे धाव घेतली होती. या विद्यार्थ्यांच्या स्थलांतराला मुदतवाढ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना स्थलांतरीत करण्यास मान्यता देत मुदतवाढही दिली आहे.राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार महाविद्यालयातील त्रुटी विचारात घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने २०१७-१८ पासून महाविद्यालयाचे संलग्नीकरण कायमस्वरुपी रद्द केले आहे. त्यामुळे आता या महाविद्यालयात बीडीएस अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी देण्यात आलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. यापुढे या महाविद्यालयात दंत महाविद्यालय सुरू करता येणार नाही. महाविद्यालय कायमस्वरुपी बंद करत असताना या ठिकाणी शिकत असलेल्या १३४ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी त्या सर्व विद्यार्थ्यांचे राज्यातील इतर महाविद्यालयात स्थलांतर करण्यात येणार आहे. दुसरीकडे या विद्यार्थ्यांचे इतर महाविद्यालयात स्थलांतर करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आदेश काढले आहेत. त्यानुसार २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये प्रवेश घेतलेल्या आणि सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयात स्थलांतरीत करण्यासाठी गुणवत्ता आणि पसंतीक्रमानुसार महाविद्यालयात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या संदर्भात महाविद्यालयाचे प्रमुख अफान शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून त्रास देणे पुन्हा सुरूज्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर इतर महाविद्यालयात करण्यात येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणणे बंधनकारक आहे. त्याचा फायदा घेत गार्डीयन महाविद्यालयायाने पुन्हा विद्यार्थ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. या विद्यार्थांनी गुणपत्रिकांची मागणी केल्यावर ते देण्यास टाळाटाळ केली जात आहे.तर काही विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी केली जात आहे. सरकारने महाविद्यालय बंद केल्याने त्या विद्यार्थ्यांची सर्व महत्वाची कागदपत्रे आणि दस्तावेज त्यांना परत देणे बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही त्यांना ते कागदपत्रे मिळत नाही. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस दाद लागून देत नाही.

टॅग्स :thaneठाणे