शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

कायमची ‘दातखिळी’, गार्डियन दंत महाविद्यालयाची मान्यता रद्द, विद्यार्थांना अन्य महाविद्यालयात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 03:45 IST

अंबरनाथ येथील गार्डीयन दंत महाविद्यालयाने अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे समोर आल्यावर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे दाद मागितली होती. दंत महाविद्यालयाला आवश्यक असलेल्या अटी पूर्ण होत नसल्याने राज्य सरकारनेही या महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ येथील गार्डीयन दंत महाविद्यालयाने अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे समोर आल्यावर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे दाद मागितली होती. दंत महाविद्यालयाला आवश्यक असलेल्या अटी पूर्ण होत नसल्याने राज्य सरकारनेही या महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दंत महाविद्यालयाला कायमची ‘दातखिळी’ बसली आहे. या महाविद्यालयात शिकणाºया १३४ विद्यार्थ्यांना दुसºया महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.अंबरनाथमधील बहुचर्चित आणि नेहमीच वादात सापडलेल्या गार्डीयन महाविद्यालय पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे. या महाविद्यालयात २०१३-१४ आणि २०१४-१५ या वर्षात प्रवेश घेतलेल्या १३४ विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचे काम महाविद्यालयाने केले आहे. या महाविद्यालयाची मान्यताच रद्द केल्याने या विद्यार्थ्यांपुढे आता मोठी समस्या निर्माण झाली आहे. महाविद्यालयाची मान्यता रद्द करत असताना या ठिकाणी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्या विद्यार्थ्यांचे इतर महाविद्यालयात स्थलांतर करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र असे असतानाही महाविद्यालय या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नव्हते. विद्यार्थ्यांना स्थलांतरीत होण्यासाठी महाविद्यालयात जमा केलेल्या कागदपत्रे आणि दाखल्यांची गरज आहे. मात्र ते देण्यासही महाविद्यालय तयार नव्हते. या प्रकरणात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी राज्य सरकारकडे धाव घेतली होती. या विद्यार्थ्यांच्या स्थलांतराला मुदतवाढ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना स्थलांतरीत करण्यास मान्यता देत मुदतवाढही दिली आहे.राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार महाविद्यालयातील त्रुटी विचारात घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने २०१७-१८ पासून महाविद्यालयाचे संलग्नीकरण कायमस्वरुपी रद्द केले आहे. त्यामुळे आता या महाविद्यालयात बीडीएस अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी देण्यात आलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. यापुढे या महाविद्यालयात दंत महाविद्यालय सुरू करता येणार नाही. महाविद्यालय कायमस्वरुपी बंद करत असताना या ठिकाणी शिकत असलेल्या १३४ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी त्या सर्व विद्यार्थ्यांचे राज्यातील इतर महाविद्यालयात स्थलांतर करण्यात येणार आहे. दुसरीकडे या विद्यार्थ्यांचे इतर महाविद्यालयात स्थलांतर करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आदेश काढले आहेत. त्यानुसार २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये प्रवेश घेतलेल्या आणि सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयात स्थलांतरीत करण्यासाठी गुणवत्ता आणि पसंतीक्रमानुसार महाविद्यालयात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या संदर्भात महाविद्यालयाचे प्रमुख अफान शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून त्रास देणे पुन्हा सुरूज्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर इतर महाविद्यालयात करण्यात येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणणे बंधनकारक आहे. त्याचा फायदा घेत गार्डीयन महाविद्यालयायाने पुन्हा विद्यार्थ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. या विद्यार्थांनी गुणपत्रिकांची मागणी केल्यावर ते देण्यास टाळाटाळ केली जात आहे.तर काही विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी केली जात आहे. सरकारने महाविद्यालय बंद केल्याने त्या विद्यार्थ्यांची सर्व महत्वाची कागदपत्रे आणि दस्तावेज त्यांना परत देणे बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही त्यांना ते कागदपत्रे मिळत नाही. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस दाद लागून देत नाही.

टॅग्स :thaneठाणे