शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

 वेध परतीच्या पावसाचे : विजांचा कडकडाट आणखी काही दिवस, दिवाळीच्या खरेदीपर्यंत बरसणार सरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 06:17 IST

सध्या विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पडणारा पाऊस धडकी भरवत असला, तरी या महिनाअखेरपर्यंत अशाच स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाची अधूनमधून हजेरी लागणार असल्याने दिवाळीच्या खरेदीच्या काळातही हा पाऊस ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना सोबत करेल, असे हा अंदाज सांगतो.

ठाणे : सध्या विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पडणारा पाऊस धडकी भरवत असला, तरी या महिनाअखेरपर्यंत अशाच स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाची अधूनमधून हजेरी लागणार असल्याने दिवाळीच्या खरेदीच्या काळातही हा पाऊस ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना सोबत करेल, असे हा अंदाज सांगतो.गेले चार दिवस वेगवेगळ््या वेळी पडणारा पाऊस सोबत विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट घेऊन येतो आहे. प्रचंड कडकडाटामुळे धडकी भरावे असे वातावरण असले, तरी या महिना अखेरीपर्यंत अधूनमधून असाच पाऊस पडत राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील पंधरवडाभर तरी जोरदार सरी कोसळतील, अशीही शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. नंतर मात्र त्यांचे प्रमाण कमी कमी होत जाईल. मात्र या काळात कडकडीत ऊन, आर्द्रतेमुळे घामाच्या धारा आणि त्यात दिलासा देणारा पाऊस असेच चित्र अनुभवायला मिळेल.हा पाऊस जरी परतीचा असला, तरी तो जाता जाता जोरदार हजेरी लावून जातो, असे आजवरचे चित्र आहे. त्यातही साधारणत: चार महिने गृहीत धरला जाणारा पाऊस हल्ली दोन महिन्यातच सरासरी पूर्ण करतो, असाही आलेख हवामान खात्याने मांडला आहे. यंदाही तसेच चित्र असले; तरी पावसाळ््याच्या संपूर्ण काळात अनुभवायला मिळाला नाही, इतका विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सध्या अनुभवायला मिळतो आहे. त्याची तीव्रता महिनाअखेरपर्यंत कमी होत जाण्याची शक्यता आहे. मात्र आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाच्या सरी कोसळणार असल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाºयांना हा पाऊस सोबत करण्याची शक्यता आहे.आॅक्टोबर हीट वाढणार : आॅक्टोबर हिटच्या काळात साधारण ३३ अंशापर्यंत सरासरी तापमान असते. पण यंदा ते ३७ ते ३८ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. प्रत्यक्षात तापमान तेवढे असले तरी आर्द्रता, वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे होणारे प्रदूषण-त्यातून झालेली तापमानवाढ आणि काँक्रिटीकरणामुळे वाढलेले तापमान यांच्या परिणामामुळे त्याचे चटके ३८ ते ४० अंश सेल्सियस इतके जाणवतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.गरब्यालाही सोबत : पुढच्या आठवड्यात २१ सप्टेंबरपासून सुरू होणारे नवरात्र जरी २९ तारखेला संपणार असले तरी गरबा मात्र १ आॅक्टोबरपर्यंत सुरू राहील, अशी चिन्हे आहेत. महिनाअखेरपर्यंत पावसाच्या दमदार सरी कोसळणार असल्याने रास दांडियाच्या उत्साहाच्या सोबतीला पावसाचीही हजेरी असेल.