शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांना घेऊन चालण्याचा पेरेंचा राज्यकर्त्यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 01:08 IST

रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला : ग्रामसेवा हीच ईश्वरसेवा या विषयावर गुंफले पाचवे पुष्प

ठाणे : जो नेता मतदाराला देव मानेल त्याला वैकुंठात जागा मिळेल, हे शास्त्र सांगते. त्यांनी त्यांचे काम इमानेइतबारे करावे. संतांनी केले म्हणून ते तिथपर्यंत पोहोचले. आपल्या मतदारसंघाचा, देशाचा विकास करा, एकमेकांना घेऊन चला असा सल्ला औरंगाबाद येथील पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे यांनी दिला. तुमच्याकडे किती ताकद आहे, किती पैसा आणि अक्कल आहे याला किंमत नसते तर तुम्हाला किती जणांना घेऊन चालता येते, त्याला महत्त्व असते असे मतही त्यांनी यावेळी मांडले.

रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प पेरे यांनी सोमवारी गुंफले. ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी गंगेवर सफाई कामगारांचे पाय धुतले, त्याचे पण राजकारण केले. टीका करणाऱ्यांनी धुवून पाहावे. मोदींनी जे केले ते उपजत असावे लागते, अशा शब्दांत त्यांनी मोदींचे कौतुक केले. ग्रामसेवा हीच ईश्वरसेवा या विषयावर ते बोलत होते. १९९५ पासून मी पाटोदा गावात काम करीत आहे. पाच हजारांहून अधिक गावांत फिरलो आहे. मला तीन वेळा आंतरराष्ट्रीय ग्रामस्वच्छता परिषदेतदेखील आमंत्रित केले. मी महाराष्ट्रातील सर्व सरपंचांना प्रशिक्षण देतोय. गावात लोकांना स्वच्छ पाणी दिले, पाण्याचा पुनर्वापर केला, फळझाडे लावली, परिसर स्वच्छ ठेवला आणि मुलांचे चांगले शिक्षण केले तर आपण महासत्ता होऊ शकतो. महासत्ता म्हणजे प्रत्येक गाव आणि आपला देश हा स्वत:च्या पायावर उभा राहीला पाहिजे आणि हे सोपे आहे. देशाचा जवान आणि खेड्यातील बाई आपल्याकडे प्रामाणिकपणाने काम करीत असल्याचे पेरे म्हणाले.सरपंचांमुळे खेड्यातील लोकांचे आयुष्य कमी झालेसमाज आणि शासनातले सरपंच हे पोस्टमन आहेत असे सांगून लोकांचा सरपंचावर विश्वासच राहिलेला नाही, सरपंच बदनाम झाले, खेड्यापाड्यातील लोकांचे आयुष्य कमी झाले हे त्यांचेच पाप आहे. कारण त्यांनी कामेच तशी केलेली आहेत. अन्न, शिक्षण, पाणी चांगले नाही. तसेच, एकमेकांमधले हेवेदावे, स्वार्थीपणादेखील कारणीभूत आहे. मी लोकांना पाच ते दहा टक्केच शिकवतो उरलेले त्यांच्याकडून काम करून घेतो. लोकांना शिकवायला गेलो की राग येतो.

प्रत्येक घरातून वर्षातून एकदा साडेतीन हजार रुपये कर घेतला जातो, त्यातून त्यांना चार प्रकाराचे स्वच्छ पाणी देतो, महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गिरणी सुरू केली, त्यात मसाल्याच्या गिरण्या, डाळीच्या गिरण्या आहेत. बटाटे चिप्स करून देतो. वायफाय फ्री आहे. या करातून वरील सर्व त्यांना फ्री दिले जाते. वर्षाला दोन लाख रुपये माझ्या गावाला नफा होतो. सरकारी निधीतून नविन कामे करतो. कपटी सरपंचाने आपला कपटीपणा चांगल्या कामासाठी वापरावा असा सल्ला त्यांनी दिला. सरकारच्या ९६० योजना आहेत आणि या योजनांचा लाभ मिळो अथवा न मिळो पण लोक या योजनांच्या आहारी गेले आहेत की, आता ३३ कोटी लोकसंख्या १२५ कोटी करण्याचे कामही शासनावर टाका असा खोचक टोला त्यांनी लगावला.

या योजनांची लाज वाटते असे सांगून त्यांचा समाजाला काही फायदा नसल्याचे ते म्हणाले. सरकारला असे वाटते आम्ही खूप देतोय आणि माणसाला वाटते आम्हाला काही मिळत नाही असे सांगताना पेरे म्हणाले हल्ली जो तो मोर्चा काढतोय कारण माणूस समाधानीच राहीलेला नाही. सरकार एक शौचालय बांधायला १२ हजार रुपये देते. पण आम्ही १७ वर्षांपूर्वी पाच हजार रुपयांचे कर्ज काढून शौचालय बांधले. तीन दिवसांत मी माझे गाव हागणदारीमुक्त केले.

जोपर्यंत मुर्ख मतदार आहेत तोपर्यंत पुढारी असेच असणार, जेव्हा मतदार शहाणे होतील तेव्हा या पुढाऱ्यांना कळेल असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. राजकारण्यांनी आई होण्याची गरज आहे. तुम्हाला समाजाला काही तरी चांगले द्यावे लागेल. आपण आपले गाव, देश, मतदारसंघ चांगले दिसले पाहिजे यासाठी झटले पाहिजे असा सल्ला त्यांनी राज्यकर्त्यांना दिला.