शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

यादींमधील घोळामुळे घटली मतांची टक्केवारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 04:12 IST

कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात २८ उमेदवार उभे ठाकले होते; परंतु खरी लढत शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात पाहायला मिळाली.

प्रशांत माने कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात २८ उमेदवार उभे ठाकले होते; परंतु खरी लढत शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात पाहायला मिळाली. २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये येथे मतदार वाढले तसा मतदानाचा टक्काही वाढला आहे. काही ठिकाणी यादींमधील घोळामुळे मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. अन्यथा मतदानाचा टक्का अधिक वाढला असता, असे बोलले जात आहे. दरम्यान, हे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडते? की कोणाच्या मुळावर उठते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कल्याण मतदारसंघात १९ लाख ६५ हजार १३१ मतदार होते. यात १० लाख ६१ हजार ३५६ पुरुष मतदार, तर ९ लाख ३ हजार ५०२ स्त्री मतदार होते. तर २०१४ च्या निवडणुकीत १९ लाख १९ हजार ५७१ इतकी मतदारांची संख्या होती. यंदा मतदानाचा टक्का अडीच टक्क्यांनी वाढला आहे.

२०१४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे तब्बल अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून आले होते. यंदा ४५.२८ टक्के मतदान झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत २.४० टक्कांनी वाढ झाली आहे. या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

अंबरनाथमध्ये मागच्या तुलनेत आठ, तर उल्हासनगरमध्ये १० टक्यांनी मतांमध्ये वाढ झाली आहे. उर्वरित चार मतदारसंघांमध्येही ४० टक्क्यांच्यावर मतदानाची आकडेवारी राहिली आहे. दरम्यान, या वेळेस राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारात ते स्थानिक भुमिपुत्र असल्याचा मुद्दा ग्रामीण भागात आळविला जात होता. त्यामुळे कल्याणमध्ये टक्का वाढेल अशी अपेक्षा होती; परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान दोन टक्के कमी झाले आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत ४७.४५ टक्के मतदान झाले होते. यंदा ४७.१४ टक्के मतदान झाले आहे. सेना-भाजपचा बालेकिल्ला डोंबिवलीत दोन, तर कल्याण पूर्वेत तीन टक्क्यांनी मतदान घसरले आहे. विशेष बाब म्हणजे कल्याण मतदारसंघातील मतदारसंख्या तब्बल १९ लाख ६५ हजार असतानाही केवळ ८ लाख ८९ हजार ८०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गेल्यावेळीही अशीच काहीशी परिस्थिती होती. मतदार यादींमधील गोंधळ तसेच काही ठिकाणी मतदानयंत्रामधील बिघाड ही कारणे मतदान कमी व्हायला कारणीभूत मानली जात असली, तरी सुशिक्षित शहरांचा समावेश असलेल्या या मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानातून मतदानाबाबतचा निरूत्साहीपणा स्पष्ट होत आहे. दरम्यान मतदानाची टक्केवारी समाधानकारक नसली, तरी वाढलेले मतदान कोणाला लाभदायक ठरते? हे २३ मे ला स्पष्ट होईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkalyan-pcकल्याण