शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

यादींमधील घोळामुळे घटली मतांची टक्केवारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 04:12 IST

कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात २८ उमेदवार उभे ठाकले होते; परंतु खरी लढत शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात पाहायला मिळाली.

प्रशांत माने कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात २८ उमेदवार उभे ठाकले होते; परंतु खरी लढत शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात पाहायला मिळाली. २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये येथे मतदार वाढले तसा मतदानाचा टक्काही वाढला आहे. काही ठिकाणी यादींमधील घोळामुळे मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. अन्यथा मतदानाचा टक्का अधिक वाढला असता, असे बोलले जात आहे. दरम्यान, हे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडते? की कोणाच्या मुळावर उठते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कल्याण मतदारसंघात १९ लाख ६५ हजार १३१ मतदार होते. यात १० लाख ६१ हजार ३५६ पुरुष मतदार, तर ९ लाख ३ हजार ५०२ स्त्री मतदार होते. तर २०१४ च्या निवडणुकीत १९ लाख १९ हजार ५७१ इतकी मतदारांची संख्या होती. यंदा मतदानाचा टक्का अडीच टक्क्यांनी वाढला आहे.

२०१४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे तब्बल अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून आले होते. यंदा ४५.२८ टक्के मतदान झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत २.४० टक्कांनी वाढ झाली आहे. या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

अंबरनाथमध्ये मागच्या तुलनेत आठ, तर उल्हासनगरमध्ये १० टक्यांनी मतांमध्ये वाढ झाली आहे. उर्वरित चार मतदारसंघांमध्येही ४० टक्क्यांच्यावर मतदानाची आकडेवारी राहिली आहे. दरम्यान, या वेळेस राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारात ते स्थानिक भुमिपुत्र असल्याचा मुद्दा ग्रामीण भागात आळविला जात होता. त्यामुळे कल्याणमध्ये टक्का वाढेल अशी अपेक्षा होती; परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान दोन टक्के कमी झाले आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत ४७.४५ टक्के मतदान झाले होते. यंदा ४७.१४ टक्के मतदान झाले आहे. सेना-भाजपचा बालेकिल्ला डोंबिवलीत दोन, तर कल्याण पूर्वेत तीन टक्क्यांनी मतदान घसरले आहे. विशेष बाब म्हणजे कल्याण मतदारसंघातील मतदारसंख्या तब्बल १९ लाख ६५ हजार असतानाही केवळ ८ लाख ८९ हजार ८०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गेल्यावेळीही अशीच काहीशी परिस्थिती होती. मतदार यादींमधील गोंधळ तसेच काही ठिकाणी मतदानयंत्रामधील बिघाड ही कारणे मतदान कमी व्हायला कारणीभूत मानली जात असली, तरी सुशिक्षित शहरांचा समावेश असलेल्या या मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानातून मतदानाबाबतचा निरूत्साहीपणा स्पष्ट होत आहे. दरम्यान मतदानाची टक्केवारी समाधानकारक नसली, तरी वाढलेले मतदान कोणाला लाभदायक ठरते? हे २३ मे ला स्पष्ट होईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkalyan-pcकल्याण