शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

घाण करणाऱ्या २३00 जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:25 IST

ठाणे स्थानकाने अस्वच्छतेचा डाग पुसला; ४.११ लाखांचा दंड वसूल

- पंकज रोडेकर ठाणे : अस्वच्छ रेल्वेस्थानक म्हणून ठाणेरेल्वेस्थानकाचे ‘टॉप टेन’च्या यादीत नाव आल्यावर ठाण्यावर प्रचंड टीका झाली. त्यानंतर, रेल्वे प्रशासनाने कंबर कसून हा डाग पुसून काढण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून त्याचा फटका रेल्वेस्थानकात थुंकणे असो, या कचरा करणाºया २३०० जणांना बसला आहे. या कारवाईनंतर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ठाणे रेल्वेस्थानकाने स्वच्छतेत ए श्रेणीत बेस्ट रेल्वेस्थानकाचा असा पुरस्कारही मिळवून हा डाग पुसून काढला आहे.ऐतिहासिक ठाणे रेल्वेस्थानकात एकूण १० फलाट आहेत. मध्य रेल्वेवर जलद-धीम्या लोकल सेवांसह ट्रान्स-हार्बर, एक्स्प्रेस आणि मालगाड्यांची वाहतूक सातत्याने सुरू असते. दिवसाला सात ते आठ लाख प्रवासी ठाणे रेल्वेस्थानकातून येजा करतात. त्यातच रेल्वेस्थानकातून आत आणि बाहेर जाण्यासाठी २६ गेट आहेत. गुटखा, पानमसाला यासारखे तंबाखुजन्य पदार्थ खाणारे फलाटावर मिळेल त्या जागेत थुंक तात. त्याचबरोबर खाद्यपदार्थ खाऊन झाल्यावर पिशव्या किंवा खाद्यपदार्थ टाकून पळ काढतात. गर्दुल्ले-भिकारी यांच्यामुळे स्थानकात अस्वच्छता पसरल्याने मध्यंतरी रेल्वेस्थानकाचे नाव टॉप टेनच्या यादी झळकले होते. त्यानंतर, रेल्वे प्रशासनाने जानेवारी ते जुलै २०१९ च्या या सात महिन्यांत दोन हजार २६० जणांना अस्वच्छता करताना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये फेब्रुवारी महिन्यात जवळपास एक हजार ८२५ जणांवर करवाई केली आहे. ही कारवाई तिकीट निरीक्षक (टीसी) विभागामार्फत रेल्वेस्थानकात तैनात असलेले २६ ठिकाणी तपासणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जनजागृती मोहीम राबवलीरेल्वेस्थानकातून जातायेता कुठेही न थुंकण्याचे, कचराकुंड्यांचा वापर करण्याचे, तसेच कुठेही कचरा करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. त्याबाबत प्रशासनामार्फत वेळोवेळी जनजागृती मोहीमही राबवण्यात येते. मात्र त्यातूनही उपयोन न झाल्यास कारवाईचा मार्ग पत्करला जातो. कारवाईचा बडगा यापुढेही सातत्याने सुरूच राहणार असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे