शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

डोंबिवलीत बेकायदा ३० रिक्षा, १० बस चालकांवर दंडात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 11:16 IST

बहुतांशी स्टँडवर फोर्थ सीट, बॅज नसणे, लायसन नसणे यासह वय कमी असतानाही बेकायदा रिक्षा चालवण्यात येत असून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका आहे.

डोंबिवली: येथील बहुतांशी स्टँडवर फोर्थ सीट, बॅज नसणे, लायसन नसणे यासह वय कमी असतानाही बेकायदा रिक्षा चालवण्यात येत असून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. अशा रिक्षा चालकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहरातील रामनगर, इंदिरा गांधी चौकातील काही रिक्षा चालकांनी केली होती. त्यानुसार रामनगर पोलीस, वाहतूक पोलीस नियंत्रक शाखेचे पोलीस, वॉर्डनने बुधवारी सकाळी भगतसिंग, फतेह अली रोडवर धडक कारवाई केली. त्यामध्ये ३० रिक्षा चालक, १० बस चालकांकडून दंड आकारण्यात आला.लोकमतच्या हॅलो ठाणेमध्ये ‘बेकायदा रिक्षांना घाला लगाम’या आशयाचे वृत्त येताच वाहतूक नियंत्रक, रामनगर पोलिसांनी सकाळी ७.३० वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत ही कारवाई केली. रिक्षा, बस चालकांनी गणवेश न घालणे, लायसन आणि वाहनांचे कागदपत्र न बाळगणे, यासह सर्रासपणे फोर्थ सीट अशी बेकायदा वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या नीदर्शनास आले. रामनगरचे पोलिस उपनिरिक्षक मनोहर घाडगे, हवालदार एस.इंगळे, नाना मुळे, रंगनाथ पाटील आदींसह वाहतूक पोलिस नियंत्रक शााखेचे पोलिस आणि वॉर्डन आदींनी संयुक्तपणे कारवाई केली. अशी कारवाई सातत्याने व्हावी, रिक्षा चालकांच्या मुजोरीला आळा घालावा अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली.सकाळी पहाटेच्या वेळेत आणि मध्यरात्री सर्वात जास्त प्रमाणात बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती रिक्षाचालकांनी यावेळी पोलिसांना दिली. त्यानूसार केवळ याच ठिकाणी नव्हे तर इंदिरा गांधी चौक, शिवमंदिर, चार रस्ता, रामनगर, राजाजी पथ, टंडन रोड, एमआयडीसी आदी सर्व ठिकाणी पोलिसांनी सतत पंधरा दिवस जरी कारवाई केली तरी काही प्रमाणात शिस्त लागु शकते, पण पोलिस त्यात सातत्य ठेवत नसल्याने कारवाई नाममात्रच असल्याचे दिसून येते असेही ते म्हणाले. पलावा, रिजन्सी यांसह अन्य खासगी कंपन्यांच्या बस चालकांनी, तसेच स्कूल व्हॅनच्या चालकांनाही दंड ठोठावण्यात आला. वाहनांची कागदपत्र न बाळगणे, लायसन नसणे यासह अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता न केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुचाकीस्वारांनाही टिबल सीट वाहन न चालवण्याची तंबी देण्यात आली. काहींना तासभर थांबवण्यात आले होते. त्यानंतर मात्र समज देत सोडण्यात आले. या सर्व कारवाईमध्ये आरटीओ, कल्याणचे पथकाचा देखिल समावेश असता तर वाहनचालकांमध्ये दबदबा निर्माण झाला असता. आरटीओ अधिका-यांनी याची नोंद घ्यावी अशी अपेक्षा पोलिस कर्मचा-यांनी व्यक्त केली. आरटीओचे पथक दिवसभरातून विविध वेळांमध्ये शहरात येत असून कारवाई करते असे चित्र व्हायला हवे. पण आभावानेच आरटीओ येथे येतात, त्यामुळे त्यांचा वचक वाहनचालकांवर रहात नसल्याचेही वाहतूक नियंत्रक पाेिलसांनी सांगितले.