शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांचे अतिक्रमण सीसीटीव्हीत कैद होऊनही कारवाईबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST

कल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिका हद्दीत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्याची कंट्रोल रूम ...

कल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिका हद्दीत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्याची कंट्रोल रूम महापालिका मुख्यालयात असून, सीसीटीव्हीचेही भय फेरीवाल्यांना नाही. त्यांच्याकडून रस्ता अडविला जात असल्याने स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होते. याची तक्रार वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे केल्यानंतर फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने १ जूनपासून अनलॉक सुरू आहे. सुरुवातीला सर्व प्रकारची दुकाने शनिवार, रविवारवगळता दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा होती. आता त्यात दुपारी ४ वाजेपर्यंत वाढ केली आहे. स्टेशन परिसरातील शिवाजी चौक ते मोहम्मद अली चौक, मोहम्मद अली चौक ते दीपक हॉटेल, दीपक हॉटेल ते एसीटी डेपो, एसटी डेपो ते बैल बाजार चौक, बैल बाजार ते शिवाजी चौक परिसरात वाहतूक कोंडी होते. शिवाजी चौक ते मोहम्मद अली चौक, मोहम्मद अली चौक ते दीपक हॉटेल या मार्गावर फेरीवाल्यांचे बस्तान आहे. महापालिकेने स्मार्ट सिटीअंतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविले आहेत. या सीसीटीव्ही अंतर्गत चौकात घडणारा अपघात, गुन्हा, वाहतूक कोंडी, फेरीवाले सर्व काही नियंत्रित केले जाणार आहे. त्याची कंट्राेल रूम महापालिका मुख्यालयात आहे. या कंट्रोल रूममधून २२० ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवता येते. सीसीटीव्ही लावण्यात आलेले असताना फेरीवाले रस्त्याच्या कडेला बसतात. वाहतूक कोंडी त्यांच्यामुळे होते. त्यांना सीसीटीव्हीचे भय नाही.

यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, कंट्रोल रूमच्या आधारे २२० ठिकाणी लक्ष ठेवणे शक्य आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करणे शक्य आहे. संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांनी तातडीने फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

................

महापालिकेचा स्मार्ट सिटीचा प्रकल्प एक हजार ४४५ कोटी रुपये खर्चाचा आहे. त्यापैकी सीसीटीव्हीवर ७१ कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही लावूनदेखील त्याचा उपयोग महापालिकेची यंत्रणा घेत नसेल, फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होते हे सीसीटीव्हीत कैद होऊनदेखील प्रभाग अधिकारी कारवाई करणार नसतील तर या यंत्रणेचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

----------------------