शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

साहित्यिकांना मानधन द्यावे किंवा फक्त प्रवासखर्च?

By admin | Updated: October 12, 2016 04:38 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साधेपणाने साजरे करायचे असल्यास साहित्यिकांनी मानधन किंवा प्रवास खर्च, यापैकी एकच स्वीकारावे, असा मुद्दा

जान्हवी मोर्ये / डोंबिवलीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साधेपणाने साजरे करायचे असल्यास साहित्यिकांनी मानधन किंवा प्रवास खर्च, यापैकी एकच स्वीकारावे, असा मुद्दा चर्चेला आला आहे.डोंबिवलीत होणारे ९० वे अखिल भारतीय साहित्य संमेलन प्रवासाच्या दृष्टीने मुंबई, पुणे व नाशिकहून येणाऱ्या साहित्यिकांसाठी सोयीचे असणार आहे. त्यामुळे साधेपणाने संमेलन साजरे करण्याकरिता विविध परिसंवाद, कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्या साहित्यिकांनी मानधन किंवा प्रवास खर्च, यापैकी एकच स्वीकारावे, अशी अपेक्षा साहित्यवर्तुळातून वारंवार केली जात जाते. मात्र, आयोजक त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. संमेलन साधेपणाने करण्यासाठी त्याच्या खर्चावर कात्री लावणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्यिकांना मानधन किंवा प्रवास खर्च द्यावा, असा मुद्दा आता पुढे आला आहे.याविषयी प्रवचनकार, व्याख्याते आणि प्रसिद्ध लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे म्हणाले की, स्थानिक पातळीवरील साहित्यिकांनी मानधन घेऊ नये. लांबून येणाऱ्या साहित्यिकांना प्रवासखर्च दिला जावा. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांनी येणे बंद करावे. राजकारणी संमेलनात आले की, त्यांच्याकडून अपेक्षा वाढतात. संमेलन निखळ वातावरणात पार पडत नाही. राजकारण्यांशिवाय संमेलन पार पाडण्याची आयोजिकांची इच्छाशक्ती आहे का, हा मूळ प्रश्न आहे. लाखो रुपये संमेलनावर खर्च केले जातात. त्यातून काही बोध घेतला जात नाही. कृती करणारी चर्चा घडली पाहिजे, असे माझे प्रामाणिक मत आहे. मराठी व हिंदी साहित्याच्या अभ्यासक व साहित्यिक डॉ. सुलभा कोरे यांनी सांगितले की, ‘साहित्यलेखन हा बऱ्याच साहित्यिकांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. मानधन त्यांना दिले जाते. ते फार मोठ्या रकमेचे नसते. मानधन हा त्यांचा एक सन्मान असतो. आपल्याकडे फुकट काही दिले, तर त्याची काही किंमत राहत नाही. साहित्यिक फुकटात आले, तर त्यांचीही किंमत राहणार नाही. काही न घेता ते संमेलनात उपस्थित राहिल्यास त्यांची किंमत राहणार नाही. मानधन दिले जावे. त्यातूनही एखाद्या साहित्यिकाने मानधन घेणे नाकारले, तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न असेल. त्याचे स्वागतच केले जाईल. संमेलनात साहित्यिक काही पैसा मोजायला जात नाही. पण, त्याला मानधन न देता बोलावण्याचा चुकीचा पायंडा पाडता कामा नये. मानधन दिले नाही, तर त्याला येण्याजाण्याचा प्रवासखर्च तरी दिला जावा, असे मला वाटते.’