शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांना मानधन द्यावे किंवा फक्त प्रवासखर्च?

By admin | Updated: October 12, 2016 04:38 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साधेपणाने साजरे करायचे असल्यास साहित्यिकांनी मानधन किंवा प्रवास खर्च, यापैकी एकच स्वीकारावे, असा मुद्दा

जान्हवी मोर्ये / डोंबिवलीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साधेपणाने साजरे करायचे असल्यास साहित्यिकांनी मानधन किंवा प्रवास खर्च, यापैकी एकच स्वीकारावे, असा मुद्दा चर्चेला आला आहे.डोंबिवलीत होणारे ९० वे अखिल भारतीय साहित्य संमेलन प्रवासाच्या दृष्टीने मुंबई, पुणे व नाशिकहून येणाऱ्या साहित्यिकांसाठी सोयीचे असणार आहे. त्यामुळे साधेपणाने संमेलन साजरे करण्याकरिता विविध परिसंवाद, कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्या साहित्यिकांनी मानधन किंवा प्रवास खर्च, यापैकी एकच स्वीकारावे, अशी अपेक्षा साहित्यवर्तुळातून वारंवार केली जात जाते. मात्र, आयोजक त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. संमेलन साधेपणाने करण्यासाठी त्याच्या खर्चावर कात्री लावणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्यिकांना मानधन किंवा प्रवास खर्च द्यावा, असा मुद्दा आता पुढे आला आहे.याविषयी प्रवचनकार, व्याख्याते आणि प्रसिद्ध लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे म्हणाले की, स्थानिक पातळीवरील साहित्यिकांनी मानधन घेऊ नये. लांबून येणाऱ्या साहित्यिकांना प्रवासखर्च दिला जावा. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांनी येणे बंद करावे. राजकारणी संमेलनात आले की, त्यांच्याकडून अपेक्षा वाढतात. संमेलन निखळ वातावरणात पार पडत नाही. राजकारण्यांशिवाय संमेलन पार पाडण्याची आयोजिकांची इच्छाशक्ती आहे का, हा मूळ प्रश्न आहे. लाखो रुपये संमेलनावर खर्च केले जातात. त्यातून काही बोध घेतला जात नाही. कृती करणारी चर्चा घडली पाहिजे, असे माझे प्रामाणिक मत आहे. मराठी व हिंदी साहित्याच्या अभ्यासक व साहित्यिक डॉ. सुलभा कोरे यांनी सांगितले की, ‘साहित्यलेखन हा बऱ्याच साहित्यिकांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. मानधन त्यांना दिले जाते. ते फार मोठ्या रकमेचे नसते. मानधन हा त्यांचा एक सन्मान असतो. आपल्याकडे फुकट काही दिले, तर त्याची काही किंमत राहत नाही. साहित्यिक फुकटात आले, तर त्यांचीही किंमत राहणार नाही. काही न घेता ते संमेलनात उपस्थित राहिल्यास त्यांची किंमत राहणार नाही. मानधन दिले जावे. त्यातूनही एखाद्या साहित्यिकाने मानधन घेणे नाकारले, तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न असेल. त्याचे स्वागतच केले जाईल. संमेलनात साहित्यिक काही पैसा मोजायला जात नाही. पण, त्याला मानधन न देता बोलावण्याचा चुकीचा पायंडा पाडता कामा नये. मानधन दिले नाही, तर त्याला येण्याजाण्याचा प्रवासखर्च तरी दिला जावा, असे मला वाटते.’