शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मनोज जरांगेंनी केले आदेशाचे उल्लंघन; हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी
2
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
3
"माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
4
मराठा आंदोलन: शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आझाद मैदानात, घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले... 
5
मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
6
"राष्ट्रीय पुरस्कार, आपली अपूर्ण इच्छा पूर्ण झाली...", किंग खानने राणीसोबत केलं रील, चाहते खूश
7
मराठा आंदोलन: सुट्टी असूनही मुंबई हायकोर्ट उघडले; जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीची सुनावणी
8
चीनमध्ये भारताचा पाकिस्तानला धक्का! SCO च्या जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एकमताने निषेध
9
येत्या रविवारी खग्रास चंद्रग्रहण; 'या' वेळेत दिसणार अद्भुत लाल चंद्र! भारतातूनही पाहता येणार
10
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सुरुच राहणार; इथेनॉलमुक्त पेट्रोलची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
11
सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी; लोकल ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये घुसले आंदोलक
12
लेडी कंडक्टरला तब्बल ६१५९ कॉल, ३१५ मेसेज; ‘तो’ म्हणाला, ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर…'
13
ओलाचा शेअर रॉकेट बनला, ३० दिवसांत ४७% परतावा दिला; पाडला पैशांचा पाऊस; कारण काय?
14
"रशिया-भारत खांद्याला खांदा लावून प्रगती करतायत..."; PM मोदी आणि पुतिन यांच्यात दीर्घ चर्चा
15
७३ हजार सॅलरी असणाऱ्या पत्नीने पतीकडे मागितली पोटगी; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निकाल
16
Women's World Cup 2025 Prize Money : महिला क्रिकेटला 'अच्छे दिन'; पुरुषांपेक्षाही अधिक बक्षीस
17
ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यातूनही ओला इलेक्ट्रिकची उसळी; शेअरचा भाव ४७ टक्के वाढला; 'हा' निर्णय ठरला गेमचेंजर
18
सगळ्यांसमोर गळाभेट, एकाच गाडीतून प्रवास अन् हास्याचा खळखळाट! पुतिन-मोदींची मैत्री पाहून ट्रम्प यांचं टेन्शन वाढणार
19
Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका
20
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट! पास की नापास, काय आला निकाल? संघात स्थान मिळणार?

साहित्यिकांना मानधन द्यावे किंवा फक्त प्रवासखर्च?

By admin | Updated: October 12, 2016 04:38 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साधेपणाने साजरे करायचे असल्यास साहित्यिकांनी मानधन किंवा प्रवास खर्च, यापैकी एकच स्वीकारावे, असा मुद्दा

जान्हवी मोर्ये / डोंबिवलीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साधेपणाने साजरे करायचे असल्यास साहित्यिकांनी मानधन किंवा प्रवास खर्च, यापैकी एकच स्वीकारावे, असा मुद्दा चर्चेला आला आहे.डोंबिवलीत होणारे ९० वे अखिल भारतीय साहित्य संमेलन प्रवासाच्या दृष्टीने मुंबई, पुणे व नाशिकहून येणाऱ्या साहित्यिकांसाठी सोयीचे असणार आहे. त्यामुळे साधेपणाने संमेलन साजरे करण्याकरिता विविध परिसंवाद, कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्या साहित्यिकांनी मानधन किंवा प्रवास खर्च, यापैकी एकच स्वीकारावे, अशी अपेक्षा साहित्यवर्तुळातून वारंवार केली जात जाते. मात्र, आयोजक त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. संमेलन साधेपणाने करण्यासाठी त्याच्या खर्चावर कात्री लावणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्यिकांना मानधन किंवा प्रवास खर्च द्यावा, असा मुद्दा आता पुढे आला आहे.याविषयी प्रवचनकार, व्याख्याते आणि प्रसिद्ध लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे म्हणाले की, स्थानिक पातळीवरील साहित्यिकांनी मानधन घेऊ नये. लांबून येणाऱ्या साहित्यिकांना प्रवासखर्च दिला जावा. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांनी येणे बंद करावे. राजकारणी संमेलनात आले की, त्यांच्याकडून अपेक्षा वाढतात. संमेलन निखळ वातावरणात पार पडत नाही. राजकारण्यांशिवाय संमेलन पार पाडण्याची आयोजिकांची इच्छाशक्ती आहे का, हा मूळ प्रश्न आहे. लाखो रुपये संमेलनावर खर्च केले जातात. त्यातून काही बोध घेतला जात नाही. कृती करणारी चर्चा घडली पाहिजे, असे माझे प्रामाणिक मत आहे. मराठी व हिंदी साहित्याच्या अभ्यासक व साहित्यिक डॉ. सुलभा कोरे यांनी सांगितले की, ‘साहित्यलेखन हा बऱ्याच साहित्यिकांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. मानधन त्यांना दिले जाते. ते फार मोठ्या रकमेचे नसते. मानधन हा त्यांचा एक सन्मान असतो. आपल्याकडे फुकट काही दिले, तर त्याची काही किंमत राहत नाही. साहित्यिक फुकटात आले, तर त्यांचीही किंमत राहणार नाही. काही न घेता ते संमेलनात उपस्थित राहिल्यास त्यांची किंमत राहणार नाही. मानधन दिले जावे. त्यातूनही एखाद्या साहित्यिकाने मानधन घेणे नाकारले, तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न असेल. त्याचे स्वागतच केले जाईल. संमेलनात साहित्यिक काही पैसा मोजायला जात नाही. पण, त्याला मानधन न देता बोलावण्याचा चुकीचा पायंडा पाडता कामा नये. मानधन दिले नाही, तर त्याला येण्याजाण्याचा प्रवासखर्च तरी दिला जावा, असे मला वाटते.’