शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

उल्हासनगर महापालिकेचा कारभार देवभरोसे?; पगार लिपिकाचा काम क्लास वन अधिकाऱ्यांचे

By सदानंद नाईक | Updated: March 5, 2024 19:55 IST

महत्वाच्या पदाचा पदभार मिळण्यासाठी कनिष्ठ कर्मचारी थेट राजकीय नेत्यांच्या घरांचे उंबरठे झिजवीत आहेत.

उल्हासनगर : महापालिकेत लिपिकाचा पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर वर्ग-१ व २ पदाचा पदभार दिल्याने, महापालिका कारभार देवभरोसे सुरू असल्याची टीका होत आहे. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी येत नसल्याने, लिपिकावर क्लास वन अधिकाऱ्यांचे काम करण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे.

 उल्हासनगरात हजारो कोटीच्या निधीतून विविध विकास योजना राबविल्या जात असताना लिपिकाचा पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट क्लासवन अधिकाऱ्यांचा पदभार दिल्याने, महापालिका कारभारात सावळागोंधळ उडल्याची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांचे ८० टक्के तर वर्ग-३ व ४ ची ४० टक्के पदे रिक्त आहेत. एक अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त, सहायक आयुक्तांची ६ पदे, एक शहर अभियंता, बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पदे, करनिर्धारक संचालक, महापालिका सचिव, वैद्यकीय अधिकारी, विधी अधिकारी, परिवहन व्यवस्थापक यांच्यासह महापालिकेचे बहुतांश विभाग प्रमुख पदी लिपिकाचा पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची वर्णी लागलीं आहे. महत्वाच्या पदाचा पदभार मिळण्यासाठी कनिष्ठ कर्मचारी थेट राजकीय नेत्यांच्या घरांचे उंबरठे झिजवीत आहेत.

 महापालिका वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असलेल्या कनिष्ठ कर्मचाऱ्याकडे एक नव्हेतर अनेक मालदार विभागाचा पदभार दिल्याचे चित्र महापालिकेत आहेत. ज्या कर्मचाऱ्यांकडे वर्ग-१ व २ पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात तक्रारीचा पाऊस पडला आहे. मात्र त्यांच्यावर राजकीय नेत्यांच्या वरदहस्त असल्याने, वरिष्ठ अधिकारी कारवाई करण्यास टाळत आहेत. लिपिक व कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा पगार घेणाऱ्या मात्र क्लासवन अधिकाऱ्याचा पदभार सांभाळणाऱ्या अर्धेअधिक कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच घेण्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.

शासनाकडे प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांची मागणी....आयुक्त अजीज शेख 

महापालिकेत वर्ग-१ व २ अधिकाऱ्यांचे ८० टक्के पदे रिक्त असल्याने, लिपिक व कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे या पदाचा प्रभारी पदभार दिला आहे. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला असून अद्यापही प्रतिनियुक्तीवर अधिकारी आले नाहीत. शासनाकडून अधिकारी येताच लिपीक व कनिष्ठ कर्मचाऱ्यांना प्रभारी पदातून मुक्त केले जाणार आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांची मक्तेदारी 

शासनाकडून आलेल्या अधिकाऱ्यांना महापालिका कारभाराबाबत स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती करून घ्यावे लागते. याचाच फायदा प्रभारी पदावर वर्षांनुवर्ष असलेले अधिकारी घेऊन मनमानी कारभार हाकत आहेत. त्यांची मक्तेदारी मोडीत काढून त्यांना मूळ पदावर पाठविण्याच्या मागणीने जोर पकडला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर