शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉज’ने वाचविले तब्बल ३,४७७ वन्यजीवांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 00:07 IST

२० वर्षांतील कामगिरी; वन्यजीव टिकले तर, अन्नसाखळी राहील

कल्याण : प्राणी व पक्ष्यांसाठीच्या प्लॅण्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीने (पॉज) २० वर्षांत तीन हजार ४७७ वन्यजीवांचे प्राण वाचविले आहेत. वन्यजीव टिकले तर अन्नसाखळी अबाधित राहील, याकडे संस्थेचे प्रमुख निलेश भणगे यांनी लक्ष वेधले आहे.२ ते ९ आॅक्टोबरपासून वन्यजीव सप्ताह पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर भणगे म्हणाले, कुठे विहिरीत मांजर पडले, घोरपड आढळली, पक्ष्याच्या गळ्यात मांजा अडकला किंवा मोर जखमी झाल्यास संस्थेकडे फोन येतात. मग, आम्ही घटनास्थळी पोहोचून त्यांना वाचवतो. २० वर्षांत एक हजार ६१ साप, दोन हजार २६७ पक्षी, १३ माकडे, तीन कोल्हे, ६० कासव, ३१ विविध प्रजातींमधील सरपटणारे प्राणी, ज्यात घोरपड, सरडे, २० खारुताई, वटवाघूळ, विंचू अशा तीन हजार ४७७ प्राण्यांची सुटका केली आहे. जखमींवर उपचारही केले आहेत.ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातून सर्वात जास्त पक्षी ‘पॉज’कडे पुनर्वसनासाठी येतात. फ्लेमिंगो, चातक, तीनबोटी खंड्या असे स्थलांतरित व दुर्मीळ पक्ष्यांचेही संस्थेने पुनर्वसन केले आहे. विविध बदके, बगळे, सागरी ससाणे, कावळे, चिमण्या, कबुतर, मैना, घार, कोकिळा तसेच लवबर्ड, टर्की आफ्रिकन पोपट यांचेही प्राण वाचवले आहेत. पक्ष्यांच्या लहान पिलांना पुनर्वसन उपक्रमात तात्पुरते पालक दिले जातात. संस्थेच्या सदस्य शिल्पा हरकरे या पक्ष्यांना जेवण भरवितात. पकडलेले सर्प पुन्हा निसर्गात सोडले जातात.दरम्यान, जखमी प्राण्यांवर संस्थेच्या मुरबाड येथील रुग्णालयात उपचार केले जातात. तसेच ‘पॉज’कडे बरीच साधने असून, ती स्कॉटलॅण्ड, इंग्लंड, अमेरिका येथून आयात केली आहेत. संस्थेने सर्पमित्रांची सभा, सर्प संमेलन घेऊन सर्पविषयक माहिती संकलित केली आहे.थायलंडमधील पक्षिगणनेत सहभागसंस्थेकडे ४० छायाचित्रकारांनी टिपलेल्या वन्यजीव व निसर्गाच्या ३०० छायाचित्रांचा संग्रह आहे. भणगे यांनी स्वत: अंदमान निकोबार ते नेपाळ, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, हाँगकाँग येथे छायाचित्रण केले आहे. थायलंडमधील पक्षिगणनेतही त्यांनी सहभाग घेतला आहे.हत्तींसंदर्भात अहवाल सादरभणगे यांनी २००५ पासून पाळीव हत्तींवर संशोधन केले आहे. महाराष्ट्र व गोव्यातील पाळीव हत्तींचा अभ्यास करून न्यायालयात अहवाल सादर केला आहे. तसेच सर्कशीतील १२ सिंह, दोन वाघांची सुटका करून आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मदतीने त्यांना बाणोर घाटात सोडले आहे.