शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉज’ने वाचविले तब्बल ३,४७७ वन्यजीवांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 00:07 IST

२० वर्षांतील कामगिरी; वन्यजीव टिकले तर, अन्नसाखळी राहील

कल्याण : प्राणी व पक्ष्यांसाठीच्या प्लॅण्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीने (पॉज) २० वर्षांत तीन हजार ४७७ वन्यजीवांचे प्राण वाचविले आहेत. वन्यजीव टिकले तर अन्नसाखळी अबाधित राहील, याकडे संस्थेचे प्रमुख निलेश भणगे यांनी लक्ष वेधले आहे.२ ते ९ आॅक्टोबरपासून वन्यजीव सप्ताह पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर भणगे म्हणाले, कुठे विहिरीत मांजर पडले, घोरपड आढळली, पक्ष्याच्या गळ्यात मांजा अडकला किंवा मोर जखमी झाल्यास संस्थेकडे फोन येतात. मग, आम्ही घटनास्थळी पोहोचून त्यांना वाचवतो. २० वर्षांत एक हजार ६१ साप, दोन हजार २६७ पक्षी, १३ माकडे, तीन कोल्हे, ६० कासव, ३१ विविध प्रजातींमधील सरपटणारे प्राणी, ज्यात घोरपड, सरडे, २० खारुताई, वटवाघूळ, विंचू अशा तीन हजार ४७७ प्राण्यांची सुटका केली आहे. जखमींवर उपचारही केले आहेत.ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातून सर्वात जास्त पक्षी ‘पॉज’कडे पुनर्वसनासाठी येतात. फ्लेमिंगो, चातक, तीनबोटी खंड्या असे स्थलांतरित व दुर्मीळ पक्ष्यांचेही संस्थेने पुनर्वसन केले आहे. विविध बदके, बगळे, सागरी ससाणे, कावळे, चिमण्या, कबुतर, मैना, घार, कोकिळा तसेच लवबर्ड, टर्की आफ्रिकन पोपट यांचेही प्राण वाचवले आहेत. पक्ष्यांच्या लहान पिलांना पुनर्वसन उपक्रमात तात्पुरते पालक दिले जातात. संस्थेच्या सदस्य शिल्पा हरकरे या पक्ष्यांना जेवण भरवितात. पकडलेले सर्प पुन्हा निसर्गात सोडले जातात.दरम्यान, जखमी प्राण्यांवर संस्थेच्या मुरबाड येथील रुग्णालयात उपचार केले जातात. तसेच ‘पॉज’कडे बरीच साधने असून, ती स्कॉटलॅण्ड, इंग्लंड, अमेरिका येथून आयात केली आहेत. संस्थेने सर्पमित्रांची सभा, सर्प संमेलन घेऊन सर्पविषयक माहिती संकलित केली आहे.थायलंडमधील पक्षिगणनेत सहभागसंस्थेकडे ४० छायाचित्रकारांनी टिपलेल्या वन्यजीव व निसर्गाच्या ३०० छायाचित्रांचा संग्रह आहे. भणगे यांनी स्वत: अंदमान निकोबार ते नेपाळ, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, हाँगकाँग येथे छायाचित्रण केले आहे. थायलंडमधील पक्षिगणनेतही त्यांनी सहभाग घेतला आहे.हत्तींसंदर्भात अहवाल सादरभणगे यांनी २००५ पासून पाळीव हत्तींवर संशोधन केले आहे. महाराष्ट्र व गोव्यातील पाळीव हत्तींचा अभ्यास करून न्यायालयात अहवाल सादर केला आहे. तसेच सर्कशीतील १२ सिंह, दोन वाघांची सुटका करून आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मदतीने त्यांना बाणोर घाटात सोडले आहे.