शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘पॉज’ने वाचविले तब्बल ३,४७७ वन्यजीवांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 00:07 IST

२० वर्षांतील कामगिरी; वन्यजीव टिकले तर, अन्नसाखळी राहील

कल्याण : प्राणी व पक्ष्यांसाठीच्या प्लॅण्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीने (पॉज) २० वर्षांत तीन हजार ४७७ वन्यजीवांचे प्राण वाचविले आहेत. वन्यजीव टिकले तर अन्नसाखळी अबाधित राहील, याकडे संस्थेचे प्रमुख निलेश भणगे यांनी लक्ष वेधले आहे.२ ते ९ आॅक्टोबरपासून वन्यजीव सप्ताह पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर भणगे म्हणाले, कुठे विहिरीत मांजर पडले, घोरपड आढळली, पक्ष्याच्या गळ्यात मांजा अडकला किंवा मोर जखमी झाल्यास संस्थेकडे फोन येतात. मग, आम्ही घटनास्थळी पोहोचून त्यांना वाचवतो. २० वर्षांत एक हजार ६१ साप, दोन हजार २६७ पक्षी, १३ माकडे, तीन कोल्हे, ६० कासव, ३१ विविध प्रजातींमधील सरपटणारे प्राणी, ज्यात घोरपड, सरडे, २० खारुताई, वटवाघूळ, विंचू अशा तीन हजार ४७७ प्राण्यांची सुटका केली आहे. जखमींवर उपचारही केले आहेत.ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातून सर्वात जास्त पक्षी ‘पॉज’कडे पुनर्वसनासाठी येतात. फ्लेमिंगो, चातक, तीनबोटी खंड्या असे स्थलांतरित व दुर्मीळ पक्ष्यांचेही संस्थेने पुनर्वसन केले आहे. विविध बदके, बगळे, सागरी ससाणे, कावळे, चिमण्या, कबुतर, मैना, घार, कोकिळा तसेच लवबर्ड, टर्की आफ्रिकन पोपट यांचेही प्राण वाचवले आहेत. पक्ष्यांच्या लहान पिलांना पुनर्वसन उपक्रमात तात्पुरते पालक दिले जातात. संस्थेच्या सदस्य शिल्पा हरकरे या पक्ष्यांना जेवण भरवितात. पकडलेले सर्प पुन्हा निसर्गात सोडले जातात.दरम्यान, जखमी प्राण्यांवर संस्थेच्या मुरबाड येथील रुग्णालयात उपचार केले जातात. तसेच ‘पॉज’कडे बरीच साधने असून, ती स्कॉटलॅण्ड, इंग्लंड, अमेरिका येथून आयात केली आहेत. संस्थेने सर्पमित्रांची सभा, सर्प संमेलन घेऊन सर्पविषयक माहिती संकलित केली आहे.थायलंडमधील पक्षिगणनेत सहभागसंस्थेकडे ४० छायाचित्रकारांनी टिपलेल्या वन्यजीव व निसर्गाच्या ३०० छायाचित्रांचा संग्रह आहे. भणगे यांनी स्वत: अंदमान निकोबार ते नेपाळ, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, हाँगकाँग येथे छायाचित्रण केले आहे. थायलंडमधील पक्षिगणनेतही त्यांनी सहभाग घेतला आहे.हत्तींसंदर्भात अहवाल सादरभणगे यांनी २००५ पासून पाळीव हत्तींवर संशोधन केले आहे. महाराष्ट्र व गोव्यातील पाळीव हत्तींचा अभ्यास करून न्यायालयात अहवाल सादर केला आहे. तसेच सर्कशीतील १२ सिंह, दोन वाघांची सुटका करून आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मदतीने त्यांना बाणोर घाटात सोडले आहे.