शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पत्रीपूल मेगाब्लॉकच्या चक्रव्यूहात भरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:40 IST

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : कल्याण-डोंबिवलीदरम्यान प्रवाशांकडून रिक्षाचालकांची मनमानी भाडेवसुली

कल्याण : कल्याणच्या पत्रीपुलाचा ७०० मेट्रिक टन वजनाचा गर्डर लॉंच करण्यासाठी रेल्वेकडून घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे दररोज डोंबिवलीहून कल्याण व त्यापुढे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. रेल्वेच्या फेऱ्या रद्द केल्या असल्याने प्रवाशांचे हाल झाले. पर्यायी सोय म्हणून कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र, त्या बसमध्ये प्रवासी खच्चून भरल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अनेकांनी रिक्षा प्रवासाचा पर्याय स्वीकारल्याने रिक्षाचालकांनी अव्वाच्यासव्वा भाडेआकारणी केली.

पत्रीपुलाचे काम वर्ष-दीड वर्षे रखडले आहे. पत्रीपुलाचे काम मार्गी लागत असल्याचे समाधान असताना या कामाकरिता शनिवारी घेतलेल्या चार तासांच्या मेगाब्लॉकने डोंबिवली ते कल्याण व त्यापुढे कर्जत-कसारा मार्गाच्या दिशेने  जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. उद्याही मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने उद्याही हेच चित्र पाहावयास मिळणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका व रेल्वे प्रशासनाने  महत्त्वाच्या कामाकरिताच घराबाहेर पडा, असे आवाहन पोलीस व रेल्वे प्रशासनाने केले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पत्रीपूल मेगाब्लॉक त्रासदायक ठरला. मेगाब्लॉकमुळे रेल्वेने २५० फेऱ्या रद्द केल्या होत्या. सकाळी १० ते २ वाजेपर्यंत चार तासांंचा मेगाब्लॉक असल्याचे रेल्वेने जाहीर केले होते. लाेकल रद्द केल्याने बस व रिक्षासह खाजगी टॅक्सीचा आधार घेत इच्छित स्थळ गाठावे लागले.

केडीएमटीला एक लाखांचे उत्पन्नकल्याण-डोंबिवली महापालिकेकडून दररोज ५५ ते ६० बसगाड्या चालविल्या जातात. शनिवारी मेगाब्लॉकसाठी परिवहन उपक्रमाने २५ जादा बसची व्यवस्था केली होती. कल्याण-डोंबिवलीदरम्यान २५, कल्याण-टिटवाळादरम्यान ४०, कल्याण-बदलापूर २०, विठ्ठलवाडी-डोंबिवलीदरम्यान १० अशा एकूण ९५ फेऱ्या झाल्या. आजच्या मेगाब्लॉकमुळे १२ हजार प्रवाशांनी या जादा बसमधून प्रवास केला. त्यातून जवळपास एक लाख २५ हजार रुपयांचे उत्पन्न केडीएमटीला मिळणार आहे, अशी माहिती परिवहन समितीचे सभापती मनोज चौधरी यांनी दिली.

प्रवाशांची लूटरेल्वेगाड्या रद्द असल्याने उलटा प्रवास करून डोंबिवली कशी गाठावी लागली. प्रणाली व कुसुम कांबळे या दोघी शुक्रवारी टिटवाळ्य़ात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीला भेटायला गेल्या होत्या. त्यांना टिटवाळ्य़ाहून भांडुपला परतायचे होते. शनिवारी त्या रिक्षाने टिटवाळ्य़ाहून कल्याणला आल्या. त्यासाठी त्यांना बरेच जास्त पैसे माेजावे लागले. डोंबिवली ते कल्याणसाठी ३०० ते ३५० रुपये उकळले. 

टॅग्स :thaneठाणे