शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पत्रीपूल मेगाब्लॉकच्या चक्रव्यूहात भरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:40 IST

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : कल्याण-डोंबिवलीदरम्यान प्रवाशांकडून रिक्षाचालकांची मनमानी भाडेवसुली

कल्याण : कल्याणच्या पत्रीपुलाचा ७०० मेट्रिक टन वजनाचा गर्डर लॉंच करण्यासाठी रेल्वेकडून घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे दररोज डोंबिवलीहून कल्याण व त्यापुढे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. रेल्वेच्या फेऱ्या रद्द केल्या असल्याने प्रवाशांचे हाल झाले. पर्यायी सोय म्हणून कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र, त्या बसमध्ये प्रवासी खच्चून भरल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अनेकांनी रिक्षा प्रवासाचा पर्याय स्वीकारल्याने रिक्षाचालकांनी अव्वाच्यासव्वा भाडेआकारणी केली.

पत्रीपुलाचे काम वर्ष-दीड वर्षे रखडले आहे. पत्रीपुलाचे काम मार्गी लागत असल्याचे समाधान असताना या कामाकरिता शनिवारी घेतलेल्या चार तासांच्या मेगाब्लॉकने डोंबिवली ते कल्याण व त्यापुढे कर्जत-कसारा मार्गाच्या दिशेने  जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. उद्याही मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने उद्याही हेच चित्र पाहावयास मिळणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका व रेल्वे प्रशासनाने  महत्त्वाच्या कामाकरिताच घराबाहेर पडा, असे आवाहन पोलीस व रेल्वे प्रशासनाने केले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पत्रीपूल मेगाब्लॉक त्रासदायक ठरला. मेगाब्लॉकमुळे रेल्वेने २५० फेऱ्या रद्द केल्या होत्या. सकाळी १० ते २ वाजेपर्यंत चार तासांंचा मेगाब्लॉक असल्याचे रेल्वेने जाहीर केले होते. लाेकल रद्द केल्याने बस व रिक्षासह खाजगी टॅक्सीचा आधार घेत इच्छित स्थळ गाठावे लागले.

केडीएमटीला एक लाखांचे उत्पन्नकल्याण-डोंबिवली महापालिकेकडून दररोज ५५ ते ६० बसगाड्या चालविल्या जातात. शनिवारी मेगाब्लॉकसाठी परिवहन उपक्रमाने २५ जादा बसची व्यवस्था केली होती. कल्याण-डोंबिवलीदरम्यान २५, कल्याण-टिटवाळादरम्यान ४०, कल्याण-बदलापूर २०, विठ्ठलवाडी-डोंबिवलीदरम्यान १० अशा एकूण ९५ फेऱ्या झाल्या. आजच्या मेगाब्लॉकमुळे १२ हजार प्रवाशांनी या जादा बसमधून प्रवास केला. त्यातून जवळपास एक लाख २५ हजार रुपयांचे उत्पन्न केडीएमटीला मिळणार आहे, अशी माहिती परिवहन समितीचे सभापती मनोज चौधरी यांनी दिली.

प्रवाशांची लूटरेल्वेगाड्या रद्द असल्याने उलटा प्रवास करून डोंबिवली कशी गाठावी लागली. प्रणाली व कुसुम कांबळे या दोघी शुक्रवारी टिटवाळ्य़ात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीला भेटायला गेल्या होत्या. त्यांना टिटवाळ्य़ाहून भांडुपला परतायचे होते. शनिवारी त्या रिक्षाने टिटवाळ्य़ाहून कल्याणला आल्या. त्यासाठी त्यांना बरेच जास्त पैसे माेजावे लागले. डोंबिवली ते कल्याणसाठी ३०० ते ३५० रुपये उकळले. 

टॅग्स :thaneठाणे