शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

भाईंदरपाड्यातील रुग्णांना रोज मिळतेय सकस जेवण; १२०० जण घेत आहेत आस्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 00:22 IST

जिल्ह्यातील पहिले कम्युनिटी किचन

- जितेंद्र कालेकर ठाणे : ठाणे महापालिकेने कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी भार्इंदरपाडा येथील क्वारंटाइन सेंटरजवळच एका कम्युनिटी किचनला परवानगी दिली असून याच किचनमधून गरमागरम सकस जेवण रुग्णांच्या पलंगांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते. सुमारे १२०० रुग्ण या थाळीचा आस्वाद घेत आहेत.

कोरोना रुग्णांना काही ठिकाणी बेचव, खराब, जेवण दिल्याच्या तसेच जेवणात अळ्या सापडल्याच्या तक्रारी असल्या, तरी ठाण्यातील भार्इंदरपाडा येथील क्वारंटाइन सेंटर मात्र त्याला अपवाद ठरले. लोढाच्या येथील तीन इमारतींमध्ये सध्या ठाणे महापालिकेने हे सेंटर सुरू केले आहे. याठिकाणी १२०० रुग्ण असून यामध्ये हाय रिस्क, लो रिस्क आणि कोरोनाग्रस्त अशा तीन प्रकारच्या रुग्णांची व त्यांच्या नातलगांची उपचाराची व विलगीकरणाची सोय केली आहे. एमएमआरडीएच्या तीनपैकी दोन इमारतींमध्ये हाय रिस्क, लो रिस्क रुग्ण, तर तिसऱ्या इमारतीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा समावेश आहे.

या रुग्णांची सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कसलीही आबाळ व्हायला नको म्हणून खासगी ठेकेदारामार्फत जेवण पुरविले जाते. संजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच याठिकाणी प्रथिनेयुक्त सकस आणि गरमागरम आहार देण्यावर भर असतो. यासाठी अगदी पहाटे ४ वाजल्यापासूनच ३० ते ३५ स्वयंपाक्यांची लगबग सुरू होते. इथल्याच एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये हे किचन सुरू आहे. अनेक ठिकाणच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बाहेरून जेवण मागविले जाते.पण, या ठिकाणी सेंटरमध्येच हे जेवण बनवून रुग्णांपर्यंत पोहोचवले जात असल्याचे सांगण्यात आले.

कसा असतो आहार

च्सकाळी उपमा, पोहे, मेदुवडे यापैकी एक पदार्थ न्याहारीत दिला जातो. सकाळी ७.३० ते ८ पर्यंत सर्वांना चहा-नाश्ता पुरविला जातो. पीपीई किट घालून स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेऊन येथील कर्मचारी हे काम करतात.च्दु

पारच्या जेवणाची तयारी ही ११.३० ते १२ वाजल्यापासून सुरू होते. साधारण १ ते १.३० पर्यंत रुग्णांना जेवण पुरविले जाते. या जेवणामध्ये डाळभात, भाजी, चार चपात्या आणि खीर, मूगहलवा, शिरा किंवा बुंदी यापैकी एक गोड पदार्थ (तोंडाला चव येण्यासाठी) दिला जातो.

सायंकाळी चहा किंवा लहान मुलांचा विचार करून दूध, बिस्कीट पुरविले जाते.

रात्रीच्या जेवणामध्येही चपात्या, कडधान्ये आणि भाजीचा समावेश असतो.

अनुभवी शेफच्या मदतीने जेवण बनविले जाते. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांचे तापमान आणि आॅक्सिजनपातळी रोज तपासली जाते, असेही संजय पाटील यांनी सांगितले.‘रुग्णांना वेळेवर रुचकर, सकस जेवण मिळण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे अनुभवी कॅटरर्सना जेवणाचा ठेका दिला आहे.  भार्इंदरपाड्याप्रमाणेच बाळकुमचे ग्लोबल हॉस्पिटल, होरायझन सेंटर याठिकाणीही रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण पुरविण्याकडे पालिका प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाते.’- अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठाणे महापालिका

टॅग्स :thaneठाणे