शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के, उल्हासनगरमध्ये कोरोना मृत्युदरही दोन टक्क्यांपेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 00:45 IST

आयुक्तांच्या प्रयत्नांना यश : उल्हासनगरमध्ये कोरोना मृत्युदरही दोन टक्क्यांपेक्षा कमी

उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या सहा हजार ८०० पेक्षा जास्त झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर, मृत्युदर हा दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.उल्हासनगरमध्ये लॉकडाऊनकाळात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन ती संख्या सहा हजार ८०० पेक्षा जास्त झाली. त्याचा आरोग्य सुविधेवर ताण पडला. महापालिकेच्या आरोग्य विभागाला नागरिकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्यावर केबिन आयुक्त असल्याचा आरोप झाला. मात्र, आयुक्तांनी सर्वपक्षीय नगरसेवक व महापालिका अधिकारी यांना विश्वासात घेऊन विविध उपाययोजना राबवत एक आराखडा तयार केला. अखेर, आयुक्तांच्या प्रयत्नांना यश येऊन पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांच्या संख्येला ब्रेक लागला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांपेक्षा जास्त झाले. तसेच शहरातील मृत्युदर दोन टक्क्यांपेक्षा कमी झाला.

एकूण रुग्णांपैकी पाच हजार ५४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, आजपर्यंत १३५ जणांचा मृत्यू झाला. एक हजार १५७ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यापैकी फक्त ८० रुग्णांना तीव्र स्वरूपाचा त्रास होत आहे. तर, २६५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून २४७ रुग्णांना कोणताही त्रास व लक्षणे नाहीत. नागरिक घराबाहेर कमी पडल्यास कोरोनाचा संसर्ग कमी होईल, अशी प्रतिक्रिया महापौर लीलाबाई अशान यांनी दिली.कोरोना रुग्णांच्या जेवणाकडे लक्षकोरोना रुग्णांची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी महापालिका प्रशासन रुग्णांच्या जेवणाकडे विशेष लक्ष देत असल्याची माहिती सहायक आयुक्त मनीष हिवरे यांनी दिली. दोन वेळा गरम चहा, नाश्ता, जेवण, एक वेळ अंडे, फळे, दूध असे जेवण दिले जात आहे. सकस आहार दिला जात असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे