शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के, उल्हासनगरमध्ये कोरोना मृत्युदरही दोन टक्क्यांपेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 00:45 IST

आयुक्तांच्या प्रयत्नांना यश : उल्हासनगरमध्ये कोरोना मृत्युदरही दोन टक्क्यांपेक्षा कमी

उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या सहा हजार ८०० पेक्षा जास्त झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर, मृत्युदर हा दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.उल्हासनगरमध्ये लॉकडाऊनकाळात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन ती संख्या सहा हजार ८०० पेक्षा जास्त झाली. त्याचा आरोग्य सुविधेवर ताण पडला. महापालिकेच्या आरोग्य विभागाला नागरिकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्यावर केबिन आयुक्त असल्याचा आरोप झाला. मात्र, आयुक्तांनी सर्वपक्षीय नगरसेवक व महापालिका अधिकारी यांना विश्वासात घेऊन विविध उपाययोजना राबवत एक आराखडा तयार केला. अखेर, आयुक्तांच्या प्रयत्नांना यश येऊन पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांच्या संख्येला ब्रेक लागला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांपेक्षा जास्त झाले. तसेच शहरातील मृत्युदर दोन टक्क्यांपेक्षा कमी झाला.

एकूण रुग्णांपैकी पाच हजार ५४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, आजपर्यंत १३५ जणांचा मृत्यू झाला. एक हजार १५७ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यापैकी फक्त ८० रुग्णांना तीव्र स्वरूपाचा त्रास होत आहे. तर, २६५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून २४७ रुग्णांना कोणताही त्रास व लक्षणे नाहीत. नागरिक घराबाहेर कमी पडल्यास कोरोनाचा संसर्ग कमी होईल, अशी प्रतिक्रिया महापौर लीलाबाई अशान यांनी दिली.कोरोना रुग्णांच्या जेवणाकडे लक्षकोरोना रुग्णांची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी महापालिका प्रशासन रुग्णांच्या जेवणाकडे विशेष लक्ष देत असल्याची माहिती सहायक आयुक्त मनीष हिवरे यांनी दिली. दोन वेळा गरम चहा, नाश्ता, जेवण, एक वेळ अंडे, फळे, दूध असे जेवण दिले जात आहे. सकस आहार दिला जात असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे