शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील रुग्ण वाढ दुपटीचा कालावधी 65 दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 18:23 IST

मात्र ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम नसल्याने शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे.

नितीन पंडितभिवंडी - भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेसह पालिका प्रशासनाला यश आल्याने सध्या शहरात समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या भिवंडीतील रुग्ण वाढ दुपटीचा कालावधी 65 दिवसांवर आला आहे. मात्र ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम नसल्याने शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे.मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्या नंतर केंद्र व राज्य सरकार ने विविध उपाययोजना करीत आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या सोबत स्थलांतरीत मजुरांची भूक भागविण्या पासून त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्या पर्यंत अनेक सोपस्कर अवलंबिले परंतु भिवंडी शहर व ग्रामीण भागात उपाय योजना करण्यातस एप्रिल महिन्यात प्रशासन अपयशी ठरल्याने जून महिन्यात परीसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत असतानाच मृत्यूचे प्रमाण ही वाढले होत परंतु जुलै मध्ये आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी पदभार स्वीकारल्या नंतर व नव्या आयुक्तांनी रावबिलेल्या उपाययोजनांचा परिणाम जुलै महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात दिसून आला . त्यामुळे आज शहरातील अनेक खासगी कोविड रुग्णालयात बेड रिकामे होत आहेत. त्याच बरोबर रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण ही कमी झाले असून शहरातील खाजगी कोविड रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची पिळवणूक थांबविण्यात प्रशासनाने कंबर कसली असल्याने शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे.तर ग्रामीण भागातील रुग्णांची सुरवाती पासून रुग्णालय दाखल होण्या पासून उपचार मिळविण्यासाठी येथील रुग्णांना झगडावे लागले परंतु आज ही जिल्हा प्रशासन आरोग्य सुविधा मिळवून देण्यात आज ही यशस्वी झाले नसल्याने ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती सुधारली नाही.  येत्या आठवड्यात गणेशपुरी येथील नित्यानंद रुग्णालयात 300 बेड चे कोविड सेंटर सुरू होणार असून कोनगाव येथे 200 तर काल्हेर येथे 100 बेड सह सवाद येथे 700 बेड चे कोव्हिडं केअर सेंटर उभारले जाणार आहेत. विशेष म्हणजे हिच कोविड सेंटर आधीपासूनच सुरु केली असती तर रुग्णांची कोरोना मुळे झालेली वाताहत थांबविता आली असती.दरम्यान शहरातील रुग्ण वाढीचा वेग मंदावला असून रुग्ण दुपट्टीचा कालावधी 65 दिवसांवर पोहचला तर शहरातील मृत्यु दर 5. 44  % तर ग्रामीण भागात मृत्यु दर 3.12 % आहे . दरम्यान " जून महिन्यात झालेल्या मृत्यूंची आकडेवारी जुलै महिन्यात मिळाली असल्याने जुलै महिन्यात मृत्यूंच्या आकडेवारीत वाढ दिसत आहे. मात्र जुलै पासून कोरोना रुग्णसंख्या रोखण्यात व मृत्यू दर कमी करण्यात मनपासह आरोग्य यंत्रणेला नक्कीच यश आले आहे अशी प्रतिक्रिया मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन मोकाशी यांनी दिली आहे.