शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
4
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
5
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
6
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
7
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
8
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
9
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
10
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
11
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
12
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
13
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
14
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
15
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
16
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
17
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
18
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
19
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
20
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...

भिवंडीतील रुग्ण वाढ दुपटीचा कालावधी 65 दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 18:23 IST

मात्र ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम नसल्याने शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे.

नितीन पंडितभिवंडी - भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेसह पालिका प्रशासनाला यश आल्याने सध्या शहरात समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या भिवंडीतील रुग्ण वाढ दुपटीचा कालावधी 65 दिवसांवर आला आहे. मात्र ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम नसल्याने शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे.मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्या नंतर केंद्र व राज्य सरकार ने विविध उपाययोजना करीत आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या सोबत स्थलांतरीत मजुरांची भूक भागविण्या पासून त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्या पर्यंत अनेक सोपस्कर अवलंबिले परंतु भिवंडी शहर व ग्रामीण भागात उपाय योजना करण्यातस एप्रिल महिन्यात प्रशासन अपयशी ठरल्याने जून महिन्यात परीसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत असतानाच मृत्यूचे प्रमाण ही वाढले होत परंतु जुलै मध्ये आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी पदभार स्वीकारल्या नंतर व नव्या आयुक्तांनी रावबिलेल्या उपाययोजनांचा परिणाम जुलै महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात दिसून आला . त्यामुळे आज शहरातील अनेक खासगी कोविड रुग्णालयात बेड रिकामे होत आहेत. त्याच बरोबर रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण ही कमी झाले असून शहरातील खाजगी कोविड रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची पिळवणूक थांबविण्यात प्रशासनाने कंबर कसली असल्याने शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे.तर ग्रामीण भागातील रुग्णांची सुरवाती पासून रुग्णालय दाखल होण्या पासून उपचार मिळविण्यासाठी येथील रुग्णांना झगडावे लागले परंतु आज ही जिल्हा प्रशासन आरोग्य सुविधा मिळवून देण्यात आज ही यशस्वी झाले नसल्याने ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती सुधारली नाही.  येत्या आठवड्यात गणेशपुरी येथील नित्यानंद रुग्णालयात 300 बेड चे कोविड सेंटर सुरू होणार असून कोनगाव येथे 200 तर काल्हेर येथे 100 बेड सह सवाद येथे 700 बेड चे कोव्हिडं केअर सेंटर उभारले जाणार आहेत. विशेष म्हणजे हिच कोविड सेंटर आधीपासूनच सुरु केली असती तर रुग्णांची कोरोना मुळे झालेली वाताहत थांबविता आली असती.दरम्यान शहरातील रुग्ण वाढीचा वेग मंदावला असून रुग्ण दुपट्टीचा कालावधी 65 दिवसांवर पोहचला तर शहरातील मृत्यु दर 5. 44  % तर ग्रामीण भागात मृत्यु दर 3.12 % आहे . दरम्यान " जून महिन्यात झालेल्या मृत्यूंची आकडेवारी जुलै महिन्यात मिळाली असल्याने जुलै महिन्यात मृत्यूंच्या आकडेवारीत वाढ दिसत आहे. मात्र जुलै पासून कोरोना रुग्णसंख्या रोखण्यात व मृत्यू दर कमी करण्यात मनपासह आरोग्य यंत्रणेला नक्कीच यश आले आहे अशी प्रतिक्रिया मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन मोकाशी यांनी दिली आहे.