शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

उपचाराविना रुग्णाचा उल्हासनगरमध्ये मृत्यू, कुटुंबीयांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 00:20 IST

उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहण-या ५७ वर्षीय व्यक्तीला मंगळवारी रात्री श्वसनाचा त्रास सुरु झाला.

उल्हासनगर : श्वसनाचा त्रास होणाऱ्या एका रुग्णाचा उपचाराविना बुधवारी मृत्यू झाला. तीन तास शहरात फिरून नामांकित रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे.उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहण-या ५७ वर्षीय व्यक्तीला मंगळवारी रात्री श्वसनाचा त्रास सुरु झाला. ओळखीच्या डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला मुलाला व कुटुंबाला दिला. डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी घेऊन मुलगा शहरातील नामांकित रुग्णालयात गेला. मात्र, रुग्णालयाने बेड नसल्याचे सांगून उपचारास नकार दिला. अखेर, एका मित्राच्या ओळखीने बुधवारी सकाळी डोंबिवलीच्या एका रुग्णालयात नेण्यात आले. तेथे काही वेळ उपचार केल्यावर, रुग्णालयाने बेड रिकामा नसल्याचे सांगून उल्हासनगरमध्ये परत पाठवले. वाटेतच त्या रुग्णाचा मृत्यू झाला. मृतदेह घेऊन मध्यवर्ती रुग्णालयात गेले असता, कोणतीही चाचणी न करता रुग्णालयाने कोरोना संशयित म्हणून जाहीर करून तसे प्रमाणपत्र दिले. मृतदेह परस्पर स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करावे लागल्याची माहिती त्या रुग्णाच्या मुलाने पत्रकारांना दिली. अशी वेळ इतरांवर येऊ नये, असे या मुलाने सांगितले. रुग्णालयात संशयित रुग्णावर उपचार झाल्यास अनेकांचे प्राण वाचतील. अचानक श्वसनाचा त्रास झाल्यावर उपचारासाठी रुग्णालयात नेल्यावर, रुग्णालय सुरुवातीला कोरोनाचा अहवाल मागतात. मुळात कोरोनाचा अहवाल लगेच मिळतो का? अहवाल नसल्याने उपचार केले जात नसल्याने अनेकांचे बळी जात आहेत.>रेडक्रॉस रुग्णालयातही सावळागोंधळ कायमया घटनेबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले की, संबंधित रुग्णाला रेडक्रॉस रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जायला हवे होते. मात्र, प्रत्यक्षात या रुग्णालयात अपुरी सुविधा व सावळागोंधळ असून, याविरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांनी दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस