शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कल्याण-डोंबिवलीतील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा-श्रीकांत शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 20:41 IST

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कुठे करायचे, या प्रश्नामुळे प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी खुशखबर असून बीएसयूपीच्या घरांमध्ये प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास केंद्र सरकारची मंजुरी मिळवण्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यश मिळवले आहे.

डोंबिवली  प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कुठे करायचे, या प्रश्नामुळे प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी खुशखबर असून बीएसयूपीच्या घरांमध्ये प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास केंद्र सरकारची मंजुरी मिळवण्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यश मिळवले आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी सुमारे तीन हजार घरे यामुळे उपलब्ध होणार असून धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरुपात सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रश्नही निकाली निघणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना या मंजुरीमुळे गती मिळणार असून बीएसयूपी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्श्याचे तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील सुमारे २३ कोटी रुपये कल्याण-डोंबिवली महापालिकेला देण्यासही केंद्राने होकार दिला आहे.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगर नियोजन मंत्रालयाच्या संसदीय समितीची बैठक सोमवारी नवी दिल्लीत झाली. बैठकीत खा. डॉ. शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीच्या नागरिकांच्या जिव्हाळ्याचे असलेले हे दोन्ही मुद्दे मांडले. बीएसयूपी प्रकल्पातील लाभार्थी आणि पंतप्रधान आवास योजनेतील घरे वगळता २,९९७ सदनिका कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे उपलब्ध आहेत. महापालिका हद्दीत होणाऱ्या विविध पायाभूत विकास प्रकल्पांच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सदनिका उपलब्ध नसल्यामुळे बीएसयूपीच्या या सदनिकांमध्ये त्यांचे पुनर्वसन करण्याची परवानगी महापालिकेने राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागाकडे मागितली होती. मात्र, वर्ष उलटून गेल्यानंतरही मंजुरी मिळत नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर करता येत नसून त्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडले असल्याचा मुद्दा खा. डॉ. शिंदे यांनी सोमवारच्या बैठकीत मांडला.

त्यावर केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या मागणीला त्वरित मंजुरी देत अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना दिले.

बीएसयूपी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्श्यातील तिसऱ्या व अंतिम टप्प्याचे सुमारे २३ कोटी रुपयेही अद्याप राज्य शासनाकडून महापालिकेला मिळाले नसल्याचा मुद्दा खा. डॉ. शिंदे यांनी मांडला. निधीअभावी या सदनिकांच्या बांधकामात अडथळे येत आहेत. केंद्राने आपला वाटा राज्याकडे हस्तांतरित करूनही महापालिकेला निधी उपलब्ध होत नसल्याची बाब खा. डॉ. शिंदे यांनी मांडली. यात केंद्राचा वाटा १३ कोटी ४४ लाख रुपये असून राज्याचा वाटा ९ कोटी ८४ लाख रुपये आहे.

त्यावर हा निधी त्वरित महापालिकेला वळता करण्याचे निर्देश राज्याला दिले जातील, असेही हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. येत्या १० दिवसांत या दोन्ही मंजुऱ्यांच्या अधिसूचना केंद्र सरकार प्रसिद्ध करणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे