शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पक्षच ठरला अपशकुनी

By admin | Updated: October 15, 2015 01:38 IST

कडोंमपाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. याकरिता १४ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. सर्वपक्षीयांसह अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले

उमेश जाधव, टिटवाळाकडोंमपाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. याकरिता १४ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. सर्वपक्षीयांसह अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु, पक्षाच्या नेत्यांनी चर्चेत असणाऱ्या उमेदवारांना एबी फार्म न देता ते नव्या उमेदवाराला दिल्याने पितृपक्षापेक्षा स्वत:चाच पक्ष त्यांना अपशकुनी ठरला आहे.निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यापासून कामाला लागलेले कडोंमपातील सगळ्याच पक्षांतील निष्ठावंत व चर्चेतील इच्छुकांना याचा अनुभव आला. विशेषत: मांडा-टिटवाळ्यातील सर्वच पक्षांतील बहुसंख्य उमेदवारांना याचा अनुभव आला आहे.येथील प्रभाग क्रमांक ८ मधून आरपीआय व भाजपा युतीच्या उमेदवार उषा भोईर येथील पहिल्या उमेदवार घोषित करण्यात आल्या होत्या. त्यांनी तर आपल्या प्रचाराच्या कार्यालयाचे उद्घाटनदेखील भाजपा व आरपीआय वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते केले होते. परंतु, अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मात्र युती न झाल्याने त्यांना फक्त आरपीआयच्या बॅनरखाली अर्ज दाखल करावा लागला. तसेच शिवसेनेने आमंत्रण देऊन बोलवलेल्या याच प्रभागातील उमेदवार अनसूया वाळंज यांना तर अर्ज भरण्यासाठी पक्षाच्या शहर कार्यालयात बोलवून एबी फार्म मात्र दुसऱ्याच इच्छुकाला दिला. याचप्रमाणे प्रभाग क्रमांक ९ मध्येदेखील तेच झाले. येथे शिवसेनेचे चार इच्छुक रिंगणात होते. पण, यात जास्त चर्चेत असणारे नाव म्हणजे प्रवीण भोईर. त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते की, नाव कट होईल म्हणून, परंतु रात्रीच सूत्रे हलली आणि त्यांचे नाव कट करून त्याजागी दुसरे इच्छुक अनिल महाजन यांची वर्णी लागून पक्षाचा एबी फार्म त्यांना मिळाला. यामुळे गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेले भोईर नाराज झाले आहेत. त्यांना तिकीट नाकारल्याचे कारणदेखील वेगळेच आहे. ते हे की, या प्रभागात गाववाले व भोईर नावाची दहशत आहे. म्हणून तिकीट नाकारले, अशा चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीत विजय देशेकर यांची उमेदवारी १०० टक्के फायनल मानली जात होती. परंतु, काही क्षणातच चित्र बदलले आणि येथील राष्ट्रवादी नेत्यांनी नवीन चेहरा सुरज पाटील यांना उमेदवारी दिली.