शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पाच महिन्यांमध्ये एकाच उद्यानाचे दोनदा लोकार्पण, आधी भाजपा आता शिवसेना करणार उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 02:30 IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावर साकारण्यात आलेल्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पाच महिन्यांत दुसऱ्यांदा केला जाणार आहे.

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावर साकारण्यात आलेल्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पाच महिन्यांत दुसऱ्यांदा केला जाणार आहे. आधी भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या उद्यानाचे लोकार्पण केले होते. आता शिवसेनेचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पाच महिन्यांत या उद्यानाचे नाव बदलण्याचा डावही शिवसेनेने आखला असून, दिवंगत नेते वसंत डावखरे यांच्या नावाऐवजी आता वनस्थळी उद्यान असे नामकरण केले जाणार आहे. याच मुद्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. हा राज्यमंत्र्यांचा अवमान असून याविरोधात लोकार्पणाच्या दिवशी आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मानपाडा, टिकुजिनीवाडी येथील पायथ्याशी निसर्ग परिचय केंद्र आहे. या परिचय केंद्राजवळ ठाणे मनपाचा आरक्षित सुविधा भूखंड आहे. ४५११.७४ चौ.मी. क्षेत्रफळाच्या या भूखंडावर निसर्ग उद्यान साकारावे यासाठी स्थानिक नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार ८ मार्च २०१९ रोजी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजप गटनेते नारायण पवार, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, मुकेश मोकाशी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. या निसर्ग उद्यानात विविध विभाग करण्यात आले आहे. मेडीटेशन, फिटनेस, मुलांसाठी खास प्ले विभाग, ओपन जिम असे विविध विभाग असून त्यात जिमचे साहित्य, लहान मुलांच्या खेळण्यांचे साहित्य ठेवण्यात आले आहे.दरम्यान, या उद्यानाचे लोकार्पण होऊन पाच महिने होत नाही तोच आता याच उद्यानाचे लोकार्पण आदीत्य ठाकरे यांच्या हस्ते १५ आॅगस्ट रोजी सांयकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे. यापूर्वी या उद्यानाचे नाव स्व. वसंत डावखरे उद्यान असे ठेवण्यात आले होते. कधी काळी शिवसेनेशी जवळीक असलेल्या डावखरेंचे नाव शिवसेनेने हटवले आहे. आता पालिकेने छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत या उद्यानाचे नामकरण करुन वनस्थळी उद्यान असे ठेवण्यात आले आहे. याविरोधात भाजपने आवाज उठवला असून, हा राज्यमंत्र्यांचा अवमान असल्याचे मत नारायण पवार यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेने लोकार्पण रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. एकूणच या मुद्यावर शिवसेना विरुध्द भाजप असा वाद पुन्हा उफाळला असून, त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.आधीचे उदघाटन अनौपचारिक होते - मीनाक्षी शिंदेमहापौर मीनाक्षी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, या उद्यानाचे यापूर्वी अनौपचारिक उद्घाटन झाले होते. वास्तविक पाहता, पालिकेचे उद्यान असल्याने नियमानुसार पालिकेची निमंत्रण पत्रिका त्यावेळेस छापण्यात आली नव्हती. मात्र आता या उद्यानाचे औपचारीकरित्या उद्घाटन केले जात आहे. शिवाय नामकरणाचा कोणताही ठराव यापूर्वी झालेला नाही. त्यामुळे हा वादाचा विषय होऊ शकत नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :thaneठाणे