शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

आई-बाबा मला घरात घ्या, आर्जव करीत पाच तास ताटकळला; बरा झाल्यानंतरही ‘त्याला’ परत आणले मनोरुग्णालयात

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 7, 2024 14:42 IST

नाशिक येथील दिंडोरी गावात राहणाऱ्या स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या दशरथला त्याच्या वडिलांनी ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल केले होते. 

ठाणे : ‘आम्ही उद्या आमच्या मुलाला घ्यायला येणारच होतो, तुम्ही कशाला घेऊन आला ? थांबा बाहेर, मी घर स्वच्छ करतो आणि त्याला आत घेतो, असे म्हणत आई-वडिलांनी दाराला आतून कडी लावून घेतली आणि ४६ वर्षांचा दशरथ (नाव बदलले आहे) पाच तास ताटकळत बाहेर उभा राहिला. घर पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता; मात्र आई-वडिलांनी त्याच्या तोंडावरच दार लावून घेतल्याने तो ढसाढसा रडू लागला. नाशिक येथील दिंडोरी गावात राहणाऱ्या स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या दशरथला त्याच्या वडिलांनी ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल केले होते. ज्यावेळी उपचाराने दशरथ बरा झाला त्यावेळी त्याला डिस्चार्ज देण्याचा निर्णय मनोरुग्णालयाने घेतला. त्याच्या घरच्यांशी समाजसेवा अधीक्षक सतीश वाघ यांनी संपर्क करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी टाळाटाळ केली. अनेकवेळा संपर्क करूनही मुलास घ्यायला येतो असे उत्तर दिले. शेवटी त्याला घरी नेऊन सोडण्याचे ठरविले. मनोरुग्णालयातून तीन कर्मचारी आणि एक वाहन चालक असे शासकीय वाहनातून त्याच्या घराबाहेर पोहोचले. त्यावेळी दार ठोठावल्यावर वडिलांनी मुलाला पाहताच त्याला घरात घ्यायचे सोडून कर्मचाऱ्यांना उलट प्रश्न करण्यास सुरुवात केली. आई-वडिलांना घट्ट मिठी मारेन, त्यांच्याशी खूप गप्पागोष्टी होतील, असे दशरथला वाटले हाेते. मात्र  आई-वडिलांनी त्याच्या तोंडावरच दार लावून घेतले. 

पोलिसांनाही दिली नाही दाद- दार उघडत नसल्याने संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिस तेथे हजर झाले. त्यांनीही दार उघडण्यास सांगितले असता घरातल्यांनी नकारात्मक प्रतिसाद दिला. - पाच तास प्रयत्न करूनही दार उघडत नसल्याने कर्मचारी, पोलिस आणि दशरथच्या लक्षात आल्याने त्याला मनोरुग्णालयात परत नेण्याचा निर्णय घेतला. घरातलेच स्वीकारत नसल्यामुळे रुग्णालयासमोर त्याला परत आणण्याशिवाय पर्याय नव्हता, अशी माहिती सतीश वाघ यांनी दिली. 

कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावलेपोटच्या लेकरालाच आई-वडिलांनी नाकारले आणि तोंडावरच दार लावून घेतले हे दृश्य पाहणाऱ्या मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतही अश्रू आले. ही घटना ऐकल्यावर वैद्यकीय अधीक्षक, समाजसेवा अधीक्षकही खूप भावुक झाले.

नातेवाईक असूनही अशा रुग्णांना नाईलाजाने पुनर्वसन केंद्रात पाठवावे लागते, याचे दु:ख वाटते. समाजातील माणुसकी कमी झाली की काय असा प्रश्न पडू लागतो.- डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय 

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल