शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

आई-बाबा मला घरात घ्या, आर्जव करीत पाच तास ताटकळला; बरा झाल्यानंतरही ‘त्याला’ परत आणले मनोरुग्णालयात

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 7, 2024 14:42 IST

नाशिक येथील दिंडोरी गावात राहणाऱ्या स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या दशरथला त्याच्या वडिलांनी ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल केले होते. 

ठाणे : ‘आम्ही उद्या आमच्या मुलाला घ्यायला येणारच होतो, तुम्ही कशाला घेऊन आला ? थांबा बाहेर, मी घर स्वच्छ करतो आणि त्याला आत घेतो, असे म्हणत आई-वडिलांनी दाराला आतून कडी लावून घेतली आणि ४६ वर्षांचा दशरथ (नाव बदलले आहे) पाच तास ताटकळत बाहेर उभा राहिला. घर पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता; मात्र आई-वडिलांनी त्याच्या तोंडावरच दार लावून घेतल्याने तो ढसाढसा रडू लागला. नाशिक येथील दिंडोरी गावात राहणाऱ्या स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या दशरथला त्याच्या वडिलांनी ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल केले होते. ज्यावेळी उपचाराने दशरथ बरा झाला त्यावेळी त्याला डिस्चार्ज देण्याचा निर्णय मनोरुग्णालयाने घेतला. त्याच्या घरच्यांशी समाजसेवा अधीक्षक सतीश वाघ यांनी संपर्क करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी टाळाटाळ केली. अनेकवेळा संपर्क करूनही मुलास घ्यायला येतो असे उत्तर दिले. शेवटी त्याला घरी नेऊन सोडण्याचे ठरविले. मनोरुग्णालयातून तीन कर्मचारी आणि एक वाहन चालक असे शासकीय वाहनातून त्याच्या घराबाहेर पोहोचले. त्यावेळी दार ठोठावल्यावर वडिलांनी मुलाला पाहताच त्याला घरात घ्यायचे सोडून कर्मचाऱ्यांना उलट प्रश्न करण्यास सुरुवात केली. आई-वडिलांना घट्ट मिठी मारेन, त्यांच्याशी खूप गप्पागोष्टी होतील, असे दशरथला वाटले हाेते. मात्र  आई-वडिलांनी त्याच्या तोंडावरच दार लावून घेतले. 

पोलिसांनाही दिली नाही दाद- दार उघडत नसल्याने संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिस तेथे हजर झाले. त्यांनीही दार उघडण्यास सांगितले असता घरातल्यांनी नकारात्मक प्रतिसाद दिला. - पाच तास प्रयत्न करूनही दार उघडत नसल्याने कर्मचारी, पोलिस आणि दशरथच्या लक्षात आल्याने त्याला मनोरुग्णालयात परत नेण्याचा निर्णय घेतला. घरातलेच स्वीकारत नसल्यामुळे रुग्णालयासमोर त्याला परत आणण्याशिवाय पर्याय नव्हता, अशी माहिती सतीश वाघ यांनी दिली. 

कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावलेपोटच्या लेकरालाच आई-वडिलांनी नाकारले आणि तोंडावरच दार लावून घेतले हे दृश्य पाहणाऱ्या मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतही अश्रू आले. ही घटना ऐकल्यावर वैद्यकीय अधीक्षक, समाजसेवा अधीक्षकही खूप भावुक झाले.

नातेवाईक असूनही अशा रुग्णांना नाईलाजाने पुनर्वसन केंद्रात पाठवावे लागते, याचे दु:ख वाटते. समाजातील माणुसकी कमी झाली की काय असा प्रश्न पडू लागतो.- डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय 

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल