शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांच्या मनमानी फी वसुलीविरोधात पालकांची वणवण सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 18:51 IST

मीरा-भाईंदरमधील अनेक मोठ्या शाळा या राजकारणी, बिल्डर आदींच्या आहेत.

मीरा रोड - मीरा-भाईंदरमधील अनेक शाळांनी शाळा बंद असतानादेखील सरसकट फी वसुली आणि मागणी चालविल्याने आर्थिक संकटात असलेले पालकवर्ग त्रस्त झाले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांना पहिल्या सहामाही परीक्षेला बसू द्यायचे असेल तर आधी शाळेची सांगितलेली सर्व फी भरा, अशी अडवणूक काही शाळांनी सुरू केल्याने हवालदिल झालेल्या पालकांनी आज शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर जमून संताप व्यक्त केला. 

मीरा-भाईंदरमधील अनेक मोठ्या शाळा या राजकारणी, बिल्डर आदींच्या आहेत. एरव्ही मनमानी गलेलठ्ठ फी वसुली करणाऱ्या या शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक मात्र कोरोना संक्रमणामुळे आलेल्या आर्थिक संकटाने हवालदिल झाले आहेत. शहरातील मोठ्या तसेच अन्य शाळा बंद असल्या तरी आता ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणासाठी फारसा खर्च नसताना देखील शाळांनी मात्र नेहमीप्रमाणेची मनमानी शुल्क वसुली चालवली आहे. काही शाळा तर अजूनही कॅंटीन फी, मिसलेनियस शुल्क आकारत आहेत. फी कमी करा सांगितले म्हणून पालकांना वकिलामार्फत नोटिसा दिल्या जात आहेत.   

या विरोधात पालकांनी गेल्या दोन महिन्यांपासून लोकप्रतिनिधी, राजकारणी व प्रशासनाकडे सतत निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडल्या आहेत. मनसे, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष आदींनी देखील दांडगाई करून मनमानी शुल्क वसुली करणाऱ्या शाळांविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी आणि आंदोलन चालवली आहेत. परंतु पालकांना न्याय दिला जात नसला तरी त्यांनी लढा सुरूच ठेवला आहे. आज सोमवारी पालकांनी भाईंदरच्या नगरभवन येथील शिक्षणाधीकारी ऊर्मिला पारधे यांच्या कार्यालयाबाहेर जमून संताप व्यक्त केला. पालक म्हणाले की, घरखर्च चालवणे, घराचे भाडे भरणेदेखील आताच्या संकटात मुश्कील झालेले आहे. एरव्ही शाळेने सांगितली तेवढी फी आम्ही भरत होतो. पण आमची आता आर्थिक परिस्थिती नाही. शाळा बंद असून केवळ ऑनलाइन ट्युशन फी घ्या, टर्म फी घ्या हे समजू शकतो. पण वर्षाची फी नेहमीच सर्व शुल्क लावून शाळा पैसे भरा सांगत आहे. फी नाही भरली तर मुलांना ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे आणि आता सहामाही परीक्षेला बसू देणार नाही असे धमकावले जात आहे, असा संताप पालकांनी व्यक्त केला.

ज्यांची परिस्थिती नाही त्यांना ट्युशन फी भरण्यास मुदत दिली पाहिजे, असे काही पालक म्हणाले. या गंभीर प्रश्नांवर शिक्षणाधिकारी ठोस कार्यवाही करत नाहीत. लोकप्रतिनिधी-राजकारणीदेखील शाळांच्या विरुद्ध बोलायला त्यात नाहीत. कारण काही शाळाच राजकारणी, बिल्डर आदींच्या आहेत, असा आरोप केला जात आहे.