शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

२२९७ बालकांच्या आरटीई प्रवेशास पालकांचा विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:09 IST

शनिवारपर्यंत मुदत : लवकर प्रवेश घेण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

ठाणे : मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांचे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील शाळांमध्ये आतापर्यंत तीन हजार ५९७ विद्यार्थ्यांचे प्रवेश केजी ते पहिलीच्या वर्गात झाले. मात्र, निवड झालेल्या उर्वरित दोन हजार २९७ विद्यार्थ्यांचे प्रवेश त्यांच्या पालकांच्या निष्काळजीपणामुळे आरटीईचे शालेय प्रवेश रखडले आहेत. त्यास अधिक विलंब न करता ४ मे पर्यंत या बालकांचे प्रवेश घेण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील ६५२ शाळांमधील प्रवेशासाठी आरटीईद्वारे पाच हजार ८९६ बालकांची निवड पहिल्या फेरीत झाली आहे. यातील तीन हजार ५९७ बालकांचे प्रवेश झाले. मात्र, पालकांच्या दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे दोन हजार २९७ शालेय प्रवेश रखडले आहेत. या प्रवेशासाठी आता ४ मे ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधित पालकांनी त्यांना दिलेल्या शाळांमध्ये त्यांच्या बालकांचे केजी ते पहिलीच्या वर्गात त्वरित प्रवेश घेण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.

एससी, एसटी प्रवर्गांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांमधील बालकांना शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जात आहे. यासाठी ६५२ खाजगी शाळांमध्ये यंदा १३ हजार ४०० प्रवेश आरटीई कायद्याखाली आरक्षित ठेवले आहेत. त्यासाठी १६ हजार ३२६ बालकांनी केजी ते पहिलीच्या वर्गांसाठी प्रवेश अर्ज दाखल केले आहेत.त्यातून लॉटरी सोडतीच्या पहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली आहे.

652 शाळांमधील प्रवेशासाठी आरटीईद्वारे पाच हजार ८९६ बालकांची निवड पहिल्या फेरीत झाली आहे. यातील तीन हजार ५९७ बालकांचे प्रवेश झाले. मात्र, पालकांच्या दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे दोन हजार २९७ शालेय प्रवेश रखडले आहेत. पालकांच्या निष्काळजीमुळे रखडलेले बालकांचे प्रवेश

शहराचे नाव रखडलेले प्रवेशअंबरनाथ १७९भिवंडी मनपा २०५भिवंडी ३४कल्याण ८३कल्याण-डोंबिवली मनपा २५५मीरा-भाईंदर ०२४मुरबाड ००८नवी मुंबई ७१७शहापूर ११३ठाणे मनपा-१ २३३ठाणे मनपा-२ ३७१उल्हासनगर ०७५

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाSchoolशाळा