शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पारसिक रेतीबंदर झोपडपट्यांचे रुपडे पालटणार, नेलादुरुस्ती, पायवाटा, रंगरंगोटीच्या कामांना सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 17:15 IST

इंदिरानगर प्रमाणेच आता ठाणे महापालिका प्रशासन आणि स्थानिक आमदार यांच्या समन्वयातून पारसिक रेती बंदर येथील झोपडपट्यांचे रुपडे पालटणार आहे. शुक्रवार पासून येथे विविध कामांना सुरवात झाली.

ठळक मुद्देप्रशासन आणि आमदाराचा समन्वयस्वच्छतेची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

ठाणे - मागील कित्येक वर्षे विकासापासुन वंचित राहिलेला पारिसक रेती बंदरच्या डोंगराळ भागात नव्या विकासाला चालना मिळाली आहे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समन्वयातून हा विकास शक्य झाला असून लोकप्रतिनिधी आणि एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय झाल्यास विकासाचा नवीन पॅटर्न कसा निर्माण होतो याची प्रचिती आता रेतीबंदर येथे आल्यावर होते.                      पारिसक चौपाटीसारख्या ऐतिहासिक प्रकल्पानंतर ठाणे महानगरपालिका आणि मिसाल मुंबई या संस्थेच्या सहकार्याने रेतीबंदर येथील आठ झोपड्या विविध आकर्षक रंगात न्हावून निघणार आहेत. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या या प्रकल्पाची सुरूवात आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि मिसाल मुंबई या संस्थेच्या रूबल नागी यांच्या उपस्थितीत शुक्र वारी विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आव्हाड आणि जयस्वाल या दोघांनीही एकमेकांचे भरभरून कौतुक केले असून हम साथ साथ है असा संदेश दिला आहे. या कामाअंतर्गत परिसरात जवळपास ५३ विद्युत पोल बसविण्यात येणार असून त्याचा शुभारंभ स्थानिक आमदार आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नाले दूरूस्ती, रस्ते पायवाटा बनविणे, कल्व्हर्ट बांधणे आणि नाल्यांची साफसफाई करणे आदी कामांना जुना गवळीपाडा येथून सुरूवात करण्यात आली. मिसाल मुंबई या संस्थेच्यावतीने येथील झोपडपट्ट्यांना रंगरंगोटी करण्यास सुरूवात झाली असून आता या सर्व झोपडपट्ट्या कात टाकायला लागल्या आहेत. डोंगरीपाडा, इंदिरानगर या झोपडपट्टीनंतर आता रेतीबंदर येथील आठ झोपड्यांना नवी झळाळी मिळणार आहे. दरम्यान यानिमित्ताने रेतीबंदरच्या जुना गवळीपाड्याच्या झोपडपट्यांमधील नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबीराचे आयोजनही करण्यात आले होते.रेतीबंदर प्रकल्पाचे देशभरात नाव होईल - जितेंद्र आव्हाडसंजीव जयस्वाल हे पहिले आयुक्त आहेत की ज्यांनी या झोपडपट्टीला भेट देवून तेथील मुलभूत कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. या परिसराला एक नवे रूप प्राप्त होत असून नाशिक रोड वरून जाताना व मुंबईच्या दिशेने प्रवास करताना या परिसराचे सौंदर्य पाहून नक्कीच प्रत्येक प्रवासी सुखावला जाणार आहे. या प्रकल्पाचे देशभरात नक्कीच नाव होईल, कालांतराने या परिसराला संजीव जयस्वाल नगर म्हणावे लागेल असेही ते म्हणाले.‘’स्वच्छ सर्वेक्षण २०१९’’ सुरु झाले असून ठाणे शहराला ‘स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे’ करण्यासाठी विद्यार्थ्यांनी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेच्याशाळा क्र .४९ मधील विद्यार्थ्यांना केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त