शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

समांतर बसला श्रेयवादाचे टायर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 06:37 IST

रेल्वेला समांतर रस्त्यावरून श्रावणी सोमवारपासून बस सुरू करण्यास केडीएमटी उपक्रमाला मुहूर्त मिळाल्याने आता त्यांच्या श्रेयासाठी

प्रशांत माने/ लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : रेल्वेला समांतर रस्त्यावरून श्रावणी सोमवारपासून बस सुरू करण्यास केडीएमटी उपक्रमाला मुहूर्त मिळाल्याने आता त्यांच्या श्रेयासाठी व्रतवैकल्ये सुरू झाली आहेत. भाजपाने श्रावणी सोमवारच्या सकाळीच या बससेवेला झेंडा दाखवायचा ठरवला आहे, तर शिवसेनेने मात्र ‘नो गाजावाजा’ म्हणत या आटपाटनगरातून माघार घेतली आहे. सत्ताधाऱ्यांतील श्रेयवाद अंगलट येण्याची शक्यता असल्याने केडीएमटी उपक्रमाने मात्र शुभारंभाचा कोणताही कार्यक्रम आयोजित न करता पांढरे निशाण फडकावले आहे. रेल्वेला समांतर रस्त्यावर बससेवा सुरू करण्यासंदर्भात शिवसेनेचे सदस्य मनोज चौधरी यांनी जूनच्या पहिल्या आठवडयात झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत प्रस्ताव मांडला. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी हिरवा कंदील दाखवल्याने श्रावणी सोमवारपासून या मार्गावरून बससेवा सुरू होत आहे. पण त्यावरून सत्ताधारी शिवसेना-भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. माझ्या प्रस्तावामुळे बस सुरू झाल्याचा शिवसेनेचे परिवहन सदस्य मनोज चौधरी यांचा दावा आहे. मात्र २०१५ मध्ये निवडून आल्यानंतर लागलीच मी समांतर रस्त्यावरून बससेवा सुरू करण्याचे पत्र दिले होते आणि याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याने ही सेवा सुरू होत असल्याचे मत कचोरे प्रभागाच्या भाजपाच्या स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी व्यक्त केले. त्यामुळे सोमवारी भाजपातर्फे गावदेवी चौकात बसचे स्वागत केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मनोज चौधरी यांनी मात्र मी श्रेयासाठी बस सुरू नाही केली, तर नागरिकांच्या सोयीसाठी केल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, केडीएमटी उपक्रमाचे महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्याशी संपर्क साधला असता उपक्रमाकडून बससेवेच्या शुभारंभाचा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नसल्याचे सांगत श्रेयवादाबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला.बसथांबे कागदावरच कल्याण स्थानक, बैलबाजार, फुलमार्केट, रहेजा कॉम्प्लेक्स, पत्रीपूल, मोहन सृष्टी, अंबरप्रीत चौक, कचोरे गाव, साईराज पार्क, आयसीआयसीआय बँक, म्हसोबा चौक, कर्नाटका बँक, हरिप्रसाद दर्शन, बंदिश पॅलेस, आजदे गांव, शेलार चौक, मंजुनाथ विद्यालय, टिळक चौक, ब्राह्मण सभा, डोंबिवली स्थानक या बसथांब्यांवर अजून साधे फलकही लावलेले नाहीत.मग इतका विलंब का?रेखा चौधरी यांनी बससेवा सुरू करण्याचे पत्र २०१५ ला दिले, तेव्हा परिवहन सभापती भाजपाचाच होता. मग त्यांच्या पत्रावर तत्काळ अंमलबजावणी का झाली नाही? बस सुरू व्हायला २०१७ साल का उजाडले? असा सवाल शिवसेनेचे सदस्य मनोज चौधरी यांनी विचारला. लवकरच बसथांबेही लागतील. त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे चौधरी यांनी सांगितले.‘प्रवाशांचे वचन पाळले’ : गेली दोन वर्षे बसससाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर सोसायट्यांच्या बैठकांमधील मागणीनुसार मी या मार्गावरून बससेवा सुरू करण्याचे वचन दिले होते, त्याची पूर्तता होते, यात मला आनंद आहे. श्रेय कोणालाही घेऊ दे. मला नागरिकांची समस्या सोडवायची होती आणि ती मी सोडवली, असे भाजपच्या स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी स्पष्ट केले.