शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

ऑक्टोबरमध्ये होणार पंडितराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 19, 2022 17:46 IST

१ आणि २ ऑक्टोबर रोजी ठाण्यात रंगणार स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महाविद्यालयीन विश्वात मानाची असलेली कै. नी. गो. पंडितराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यंदा १ आणि २ ऑक्टोबर रोजी ठाण्यात होणार आहे. श्री समर्थ सेवक मंडळ, ठाणे यांच्यातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेचे यंदाचे ५४वे वर्ष आहे. ही स्पर्धा कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालये अशा दोन गटांत आयोजित केली जाते. प्रत्येक गटात पाच स्पर्धक पाठविण्याची महाविद्यालयांना संधी आहे.

पदवी गटासाठी नियोजित भाषणाकरता १. शेजारी राष्ट्रांमधील सत्ता संघर्ष आणि भारत, २. मराठी साहित्यातील वसंत बापट यांची मुशाफिरी, ३. स्टार्ट अप - माझ्या नजरेतून मूल्यमापन, ४. अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा - बदलत्या जाणिवांचा, ५. तरुणाई आणि मानसिक स्वास्थ्य असे विषय देण्यात आले आहेत तर, कनिष्ठ गटासाठी, १. शाळेपासून भेटलेल्या शांताबाई शेळके, २. युद्धाच्या ज्वाला, महागाईची झळ, ३. माझ्या नजरेतून अग्निपथ योजना, ४. सप्तसुरांतील सुर हरपला, ५. चित्रपट क्षेत्रावर वेब सिरिजचे बूमरांग हे विषय आहेत. स्पर्धकांना नियोजित भाषणासाठी प्रत्येकी १० मिनिटे, तर आयत्यावेळेच्या विषयासाठी तीन मिनिटांचा वेळ दिला जाईल. स्पर्धकांनी नियोजित आणि उत्स्फूर्त दोन्ही भाषणे करणे अपेक्षित आहे. विजेत्यांना प्रत्येक गटात प्रथम क्रमांकास ६००० रुपये, द्वितीय क्रमांकास ३००० रुपये, तृतीय क्रमांकास २००० रुपये आणि उत्तेजनार्थ १००० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ २ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता शिव दौलत सभागृह, हनुमान व्यायामशाळा, गडकरी रंगायतनसमोर, ठाणे येथे होईल, अशी माहिती स्पर्धा समितीचे चिटणीस डॉ. चैतन्य साठे यांनी दिली आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती, नावनोंदणी, बाहेर गावच्या स्पर्धकांसाठी विनामूल्य निवास व्यवस्था आदी तपशिलासाठी स्पर्धा समितीशी ९९८७९०६२०६ किंवा ९८२१५७२४२७ येथे संपर्क साधावा असे आवाहन समितीचे आणि मंडळाचे अध्यक्ष संजीव हजारे यांनी केले आहे.