शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे झाले, पण मदतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:11 IST

अतिवृष्टीमुळे निवासी भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

डोंबिवली : अतिवृष्टीमुळे निवासी भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे तहसील कार्यालयाकडून पंचनामे करण्यात आले, पण अद्याप काही पूरग्रस्तांपर्यंत सरकारची मदत पोहोचलेली नाही. मदतीसाठी त्यांचे तहसील कार्यालयात हेलपाटे सुरू असून, राजकीय मंडळींनीही आता याकडे दुर्लक्ष केल्याने मदत मिळणार तरी कधी, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.अतिवृष्टीमुळे एमआयडीसीतील निवासी भागात ३ आणि ४ आॅगस्टला पूरजन्य परिस्थिती ओढावली होती. रहिवाशांच्या घरांत पाणी शिरून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी घरात शिरले होते. दरम्यान, आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस निवासी भागातील मिलापनगर परिसरातील रहिवाशांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन अन्य नागरी समस्यांसह पुरामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा मांडला होता. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने ही समस्या ओढावल्याचे सांगताना व्यवस्थापनाचे चुकीचे नियोजन याला कारणीभूत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला होता. परंतु, अद्यापही काही रहिवाशांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे वास्तव आहे. सरकारच्या आदेशानुसार तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले होते.काही दिवसांतच मदत मिळेल, असेही त्यावेळी सांगितले होते. पंचनामा प्रक्रिया पूर्ण होऊन महिना उलटला, पण अद्याप मदत काही मिळालेली नाही. विशेष बाब म्हणजे, तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेऊन येणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही याकडे लक्ष देत नसून ते आता फोनही उचलत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.तहसील कार्यालयाकडे मदतीसंदर्भात विचारपूस केली असता त्यांच्याकडून ठोस उत्तरे दिली जात नसल्याने रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्यात. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी जी काय मदत असेल ती मिळावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. यासंदर्भात लोकमतने कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांच्याशीसंपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.>मदत मिळणार कधी?घरामध्ये दोन फुटांपर्यंत पाणी शिरले होते. त्यामुळे घरातील लाकडी सामानांसह कपड्यांचे तसेच अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले. आमच्या घरासह तळ मजल्यावर असलेल्या तीन घरांमध्येही पाणी शिरून नुकसान झाले. तहसील कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे झाले, पण आतापर्यंत कोणतीही मदत मिळालेली नाही. कार्यालयाकडूनही स्पष्टपणे काही सांगितले जात नाही, अशी प्रतिक्रिया निवासी भागातील संदेश को-आॅप. हा. सोसायटीत राहणारे विश्वास सावंत यांनी दिली.