शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पंचनामे झाले, पण मदतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:11 IST

अतिवृष्टीमुळे निवासी भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

डोंबिवली : अतिवृष्टीमुळे निवासी भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे तहसील कार्यालयाकडून पंचनामे करण्यात आले, पण अद्याप काही पूरग्रस्तांपर्यंत सरकारची मदत पोहोचलेली नाही. मदतीसाठी त्यांचे तहसील कार्यालयात हेलपाटे सुरू असून, राजकीय मंडळींनीही आता याकडे दुर्लक्ष केल्याने मदत मिळणार तरी कधी, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.अतिवृष्टीमुळे एमआयडीसीतील निवासी भागात ३ आणि ४ आॅगस्टला पूरजन्य परिस्थिती ओढावली होती. रहिवाशांच्या घरांत पाणी शिरून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी घरात शिरले होते. दरम्यान, आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस निवासी भागातील मिलापनगर परिसरातील रहिवाशांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन अन्य नागरी समस्यांसह पुरामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा मांडला होता. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने ही समस्या ओढावल्याचे सांगताना व्यवस्थापनाचे चुकीचे नियोजन याला कारणीभूत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला होता. परंतु, अद्यापही काही रहिवाशांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे वास्तव आहे. सरकारच्या आदेशानुसार तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले होते.काही दिवसांतच मदत मिळेल, असेही त्यावेळी सांगितले होते. पंचनामा प्रक्रिया पूर्ण होऊन महिना उलटला, पण अद्याप मदत काही मिळालेली नाही. विशेष बाब म्हणजे, तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेऊन येणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही याकडे लक्ष देत नसून ते आता फोनही उचलत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.तहसील कार्यालयाकडे मदतीसंदर्भात विचारपूस केली असता त्यांच्याकडून ठोस उत्तरे दिली जात नसल्याने रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्यात. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी जी काय मदत असेल ती मिळावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. यासंदर्भात लोकमतने कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांच्याशीसंपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.>मदत मिळणार कधी?घरामध्ये दोन फुटांपर्यंत पाणी शिरले होते. त्यामुळे घरातील लाकडी सामानांसह कपड्यांचे तसेच अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले. आमच्या घरासह तळ मजल्यावर असलेल्या तीन घरांमध्येही पाणी शिरून नुकसान झाले. तहसील कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे झाले, पण आतापर्यंत कोणतीही मदत मिळालेली नाही. कार्यालयाकडूनही स्पष्टपणे काही सांगितले जात नाही, अशी प्रतिक्रिया निवासी भागातील संदेश को-आॅप. हा. सोसायटीत राहणारे विश्वास सावंत यांनी दिली.