शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

पंचनामे झाले, पण मदतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:11 IST

अतिवृष्टीमुळे निवासी भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

डोंबिवली : अतिवृष्टीमुळे निवासी भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे तहसील कार्यालयाकडून पंचनामे करण्यात आले, पण अद्याप काही पूरग्रस्तांपर्यंत सरकारची मदत पोहोचलेली नाही. मदतीसाठी त्यांचे तहसील कार्यालयात हेलपाटे सुरू असून, राजकीय मंडळींनीही आता याकडे दुर्लक्ष केल्याने मदत मिळणार तरी कधी, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.अतिवृष्टीमुळे एमआयडीसीतील निवासी भागात ३ आणि ४ आॅगस्टला पूरजन्य परिस्थिती ओढावली होती. रहिवाशांच्या घरांत पाणी शिरून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी घरात शिरले होते. दरम्यान, आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस निवासी भागातील मिलापनगर परिसरातील रहिवाशांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन अन्य नागरी समस्यांसह पुरामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा मांडला होता. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने ही समस्या ओढावल्याचे सांगताना व्यवस्थापनाचे चुकीचे नियोजन याला कारणीभूत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला होता. परंतु, अद्यापही काही रहिवाशांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे वास्तव आहे. सरकारच्या आदेशानुसार तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले होते.काही दिवसांतच मदत मिळेल, असेही त्यावेळी सांगितले होते. पंचनामा प्रक्रिया पूर्ण होऊन महिना उलटला, पण अद्याप मदत काही मिळालेली नाही. विशेष बाब म्हणजे, तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेऊन येणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही याकडे लक्ष देत नसून ते आता फोनही उचलत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.तहसील कार्यालयाकडे मदतीसंदर्भात विचारपूस केली असता त्यांच्याकडून ठोस उत्तरे दिली जात नसल्याने रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्यात. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी जी काय मदत असेल ती मिळावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. यासंदर्भात लोकमतने कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांच्याशीसंपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.>मदत मिळणार कधी?घरामध्ये दोन फुटांपर्यंत पाणी शिरले होते. त्यामुळे घरातील लाकडी सामानांसह कपड्यांचे तसेच अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले. आमच्या घरासह तळ मजल्यावर असलेल्या तीन घरांमध्येही पाणी शिरून नुकसान झाले. तहसील कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे झाले, पण आतापर्यंत कोणतीही मदत मिळालेली नाही. कार्यालयाकडूनही स्पष्टपणे काही सांगितले जात नाही, अशी प्रतिक्रिया निवासी भागातील संदेश को-आॅप. हा. सोसायटीत राहणारे विश्वास सावंत यांनी दिली.