शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कोकणातील पालखी नृत्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा 

By अजित मांडके | Updated: March 20, 2023 11:35 IST

कळवा येथील खारलँड मैदानावर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : दहीहंडीचा सण आपण मोठ्या प्रमाणात साजरा केला. अन् गल्लीत बालगोपाळांपुरता मर्यादीत असलेला हा सण आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला. आता कोकणातील पालखी नृत्य आपण ठाण्यात साजरा करीत आहोत. आता हा सण आणि ही पालखी नृत्याची  संस्कृती आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

कळवा येथील खारलँड मैदानावर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या शिमगोत्सवात जितेंद्र आव्हाड यांनी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नृत्य केले. या प्रसंगी आव्हाड बोलत होते. 

 म्हणाले की, कोकणी माणूस हा संस्कृती आणि गाव प्रिय असणारा माणूस आहे. आज जी मुंबई आपणाला दिसत आहे. या मुंबईला घडविण्यात कोकणी माणसाचा मोठा वाटा आहे. येथील मिलमध्ये कोकणी माणूसच आधी नोकरीला लागला. कोकणी माणूस शिमगा आणि गणपतीला जसा न चुकता गावी जातो. तसाच तो आपल्या जीवनात आणि व्यवहारातही काटेकोर आहे. कोकणी माणूस कधीच वीजबिल बुडवत नाही. कोकणी माणूस कधीच कर्ज फेडीपासून दूर पळत नाही. तसेच, शेतीवर कितीही संकटे आली तरी तो आत्महत्या करीत नाही;  तो लढतो.  

आपण जो शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. त्या स्पर्धेसाठी आधी उक्षीच्या ग्रामदेवतेसमोर कौल लावण्यात आला होता. देवीने कौल दिल्यानंतरच आपण येथे पालखी आणली. पुढील वर्षी पुन्हा देवीला कौल लावू आणि आज जेवढ्या उत्साहात हा महोत्सव साजरा केला. त्याच्या दुप्पट उत्साहात शिमगोत्सव साजरा करू. सलग चार दिवसांचा कोकण महोत्सव,  त्यामध्ये कोकणातील सर्वच तालुक्यांतील महत्वाच्या गावांतील पालख्या या स्पर्धेत सामावून घेऊ. ही स्पर्धा आजच्या पेक्षा अधिक भव्य दिव्य करून दहीहंडीप्रमाणेच पालखी नाचवण्याची ही संस्कृतीदेखील जगभर पोहचवू, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

संगमेश्वरच्या गांगोबा करंबेळे संघाने पटकावला प्रथम क्रमांक 

या ठिकाणी झालेल्या पालखी नृत्य स्पर्धेत सुमारे अकरा संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत २ लाख १० हजार रूपयांचे पहिले पारितोषिक संगमेश्वरच्या गांगोबा करंबेळे संघाने पटकावले. दुसरे 1 लाख 51 हजारांचे पारितोषिक राजापूरच्या रामेश्वर चिचवाडी संघाने, तिसरे 1 लाख 1 हजाराचे पारितोषिक वाघजाई मानोबा पालखी नृत्य पथक माखजन, संगमेश्वर यांनी पटकाविले.तर   श्री. नागेश्वर, रत्नागिरी (सोमेश्वर), तालुका रत्नागिरी, श्री. वाघजाई, उक्षि, ता. रत्नागिरी, सुखाई देवी, चिंचघरी, चिपळूण. तालुका चिपळूण,  जय त्रिमुख, मठ, तालुका लांजा., श्री वाघजाई देवी पालखी नृत्य पथक, तणाली, ता. चिपळूण,  जय सांबा,पाटगाव,देवरूख,तालुका संगमेश्वर, काळकाई पा. नृ. प. कुशिवडे, तालुका चिपळूण, माखजन, ता. संगमेश्वर आणि  पद्मावती , मार्गताम्हाणे, तालुका गुहागर यांना उत्तेजनार्थ 25 हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड