शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेसह पालघरच्या अर्धवेळ शिक्षकांचे बंद केलेल्या दिवसापासून वेतन सुरू ; न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने दिवाळी गोड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 17:50 IST

शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे ५० अर्धवेळ शिक्षकांचे पगार बंद केले होते. या सर्व शिक्षकांना एकत्र करून शिक्षक सेना प्रांताध्यक्ष ज .मो. अभ्यंकर, यांच्या आदेशान्वये मुंबई उच्च न्यायालयात मी दाद मागितली. त्यास अनुसरून शिक्षण विभागाला चांगलेच धारेवर धरत ज्या दिवसापसून वेतन बंद केले, त्यादिवसापासून तत्काळ वेतन सुरू करा, असा अंतरिम आदेश न्यायालयाने बुधवारी दिला

ठळक मुद्दे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे ५० अर्धवेळ शिक्षकांचे पगार बंद केले होते.मुंबई हायकोर्टाचे वकील शेख यांचे शुल्क ४५ हजार रूपये देण्याची देखील ऐपत  नव्हती. ती शुल्क मी स्वत: भरून५० अर्धवेळ शिक्षकांना ऐन दिवाळीत न्याय मिळवून दिल्याचे समाधान

ठाणे : शासनाच्या तांत्रिक त्रृटीमुळे संचमान्यतेत अर्धवेळ शिक्षकाचे पद दिसत नव्हते. यामुळे शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे ५० अर्धवेळ शिक्षकांचे पगार बंद केले होते. या सर्व शिक्षकांना एकत्र करून शिक्षक सेना प्रांताध्यक्ष ज .मो. अभ्यंकर, यांच्या आदेशान्वये मुंबई उच्च न्यायालयात मी दाद मागितली. त्यास अनुसरून शिक्षण विभागाला चांगलेच धारेवर धरत ज्या दिवसापसून वेतन बंद केले, त्यादिवसापासून तत्काळ वेतन सुरू करा, असा अंतरिम आदेश न्यायालयाने बुधवारी दिला, असे शिक्षक सेना कोकण विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लोकमतला सांगितले. यामुळे दिवाळी आधीच या अर्धवेळ शिक्षकांची दिवाळी गोड होऊन त्यांच्या आनंदोत्सव व्यक्त केला जात आहे.कार्यरत असलेल्या या अर्धवेळ शिक्षकांना वेतन मिळावे यांनी प्रारंभी शिक्षण शिक्षणाधिकारी , उपसंचालक , शिक्षण संचालक , शिक्षण सचिव आदी अधिकाऱ्यांचे उंबरठे झिंजवले. पण या शिक्षकांवरील कोणीही अन्याय दूर केला नाही. यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षकांनी इडली विकून तर काहींनी पेपर विकून उदरनिर्वाह केला. त्यांच्या वरील हा अन्याय दूर करण्यासाठी न्यायालयीन दरवाजे थोटावण्याचा प्रसंग उद्भवला. मात्र त्यांच्याकडे मुंबई हायकोर्टाचे वकील शेख यांचे शुल्क ४५ हजार रूपये देण्याची देखील ऐपत  नव्हती. ती शुल्क मी स्वत: भरून या ५० अर्धवेळ शिक्षकांना ऐन दिवाळीत न्याय मिळवून दिल्याचे समाधान म्हात्रे यांनी व्यक्त केले.शिक्षण विभागाच्या निष्काळी व दुर्लक्षितपणामुळे अचानक पगार बंद झाल्याने या शिक्षकांवर आर्थिक संकट ओढावले होते. सर्वांवर आले होते. म्हात्रे, यांनी आमच्या नोटीसचे पैसे ४५ हजार रूपये कोर्टामध्ये भरून रिट पिटीशन दाखल केली. त्यास प्राप्त झालेल्या यशामुळे आमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून दोन वर्षांनंतर आता कुठे तरी आम्ही सर्वजन दिवाळी साजरी करणार असल्याचे अर्धवेळ शिक्षकाच्या बाजूने विलास आंब्रे यांनी स्पष्ट केले. यासाठी या आर्थिक संकट प्रसंगी अभ्यंकर यांच्यासह आमदार बालाजी किणीकर, दलीप राजे आदींसह ठाणे पालघरमधील सुमारे २१ शिक्षकांचे देखील आम्ही आभारी असल्याचे आंबे्र यांनी सांगितले.------------

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय