शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

पालघर हत्याकांड: पिता पुत्रासह १८ जणांची जामीनावर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 23:48 IST

पालघर जिल्हयातील गडचिंचले येथील तीन साधूंच्या हत्याकांड प्रकरणातील लक्ष्मण रामजी जाधव (५८) यांच्यासह १८ जणांची मंगळवारी ठाणे विशेष न्यायालयाने जामीनावर सुटका केली. या आरोपींविरुद्ध थेट पुरावेही नसल्याचे आरोपीच्या वकीलांचे म्हणणे होते.

ठळक मुद्दे ठाणे विशेष न्यायालयाचे आदेश थेट पुरावेही नसल्याचा आरोपीच्या वकीलांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पालघर जिल्हयातील गडचिंचले येथील तीन साधूंच्या हत्याकांड प्रकरणातील लक्ष्मण रामजी जाधव (५८) यांच्यासह १८ जणांची मंगळवारी ठाणे विशेष न्यायालयाने जामीनावर सुटका केली. सरकारी नोकरावर हल्ला केल्याच्या प्रकरणामध्ये न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे १६ एप्रिल २०२० रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एका जमावाने गुजरातकडे जाणाऱ्या तीन साधूंची चोर समजून हत्या केली होती. याच प्रकरणामध्ये लक्ष्मण जाधव यांच्यासह अनेकांना अटक झाली आहे. यामध्ये नितीन लक्ष्मण जाधव (२६), मनोज लक्ष्मण जाधव (२५) या मुलांसह त्यांचे वडिल लक्ष्मण रामजी जाधव (२६) तसेच तुकाराम रुपजी साथ (४०, रा. गडचिंचले, पालघर) या चौघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न करणे, सरकारी नोकरावर (पोलिसांवर) हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल माजविणे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा आदी कलमांखाली कासा पोलीस ठाण्यात १७ एप्रिल २०२० रोजी गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी यातील दोन वेगवेळया प्रकरणांवर ठाणे विशेष न्यायालयात सुनावणी झाली. अन्य एका प्रकरणात १४ आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला आहे. आरोपींपैकी जाधव यांच्यासह चार तसेच अन्य १४ अशा १८ आरोपींची न्यायालयाने जामीनावर सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आरोपींविरुद्ध थेट पुरावेही नसल्याचे आरोपीच्या वकीलांचे म्हणणे होते. विशेष सरकारी वकील म्हणून सतीश माने शिंदे यांनी यावेळी पोलिसांची बाजू मांडली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय