शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.७३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 00:28 IST

मुलींना आकाश ठेंगणे : २५१ शाळांचा निकाल लागला १०० टक्के

हितेन नाईक/अनिरु द्ध पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/बोर्डी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी (एसएससी) परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने जाहीर झाला आहे. त्यामध्ये पालघर जिल्ह्याचा ९६.७३ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तसेच, आठ तालुक्यातील २५१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे, तर १३ हजार १३५ विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य मिळाले आहे. पालघर आणि वसई तालुक्याचा अनुक्र मे ९७.६१ आणि ९७.५६ टक्के निकाल लागला आहे. तर मोखाडा तालुक्याचा ८७.२८ टक्के सर्वात कमी निकाल आहे.दहावीच्या परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातून ५५ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ९६६ परीक्षार्थींपैकी ५३ हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये २८ हजार ०९९ विद्यार्थी तर २५ हजार ०६९ विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन निकालातील त्यांचे प्रमाण ९७.३८ टक्के आहे. तर २९ हजार २२३ मुलांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी२८ हजार ९९ मुले उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचे प्रमाण ९६.१४ टक्के आहे. जिल्ह्याचा तालुकानिहाय निकालाचे विश्लेषण करता, पालघरचा ९७.६१ टक्के निकाल लागला असून अव्वल ठरला आहे. येथील सात हजार ३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी १९५०विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले, तर ४९ शाळांचा निकाल शंभर टक्के आहे. वसई तालुक्यातील २९ हजार १९० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९७.५६ टक्के लागला. ९ हजार ०८९ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवून १२४ शाळांचा निकाल पैकीच्या-पैकी लागला.विक्र मगड तालुक्यात दोन हजार सात विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९६.१६ टक्के निकाल, तर १७७ विशेष प्रावीण्य आणि दहा शाळांचा शंभर टक्के निकाल आहे. डहाणू तालुक्यातील ९६.०८ टक्के असून चार हजार ८५९ विद्यार्थी उत्तीर्ण, ८०८ विशेष प्रावीण्य, २० शाळांचा शंभर टक्के निकाल लागला.जव्हार तालुक्यातील ९५.९२ टक्के निकाल असून दोन हजार १४० उत्तीर्ण विद्यार्थी त्यापैकी १३६ जणांनी विशेष प्रावीण्य मिळवले, १७ शाळांचे सर्व विद्यार्थी पास झाले. वाडा तालुक्यातील ९५.३८ टक्के निकाल, दोन हजार ८४ उत्तीर्ण असून ४९८ विशेष प्रावीण्य गटात तर १४ शाळांचा शंभर टक्के निकाल, तलासरी तालुक्याचा ९४.२२ टक्के निकाल, तीन हजार २४४ विद्यार्थी उत्तीर्ण, ३४७ जणांनी विशेष प्रावीण्य मिळविले, १३ शाळांचे सर्व विद्यार्थी पास झाले.जिल्ह्यातील सर्वात कमी मोखाडा तालुक्याचा ८७.२८ टक्के सर्वात कमी निकाल असून एक हजार १५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १३० विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले, तर चार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. जिल्ह्यातील नऊ हजार १५४ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते, आठ हजार ९६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८०.६१ टक्के उत्तीर्ण झाले. गतवर्षी सर्व विषयाच्या १०० गुणांच्या लेखी परीक्षा घेतल्याने निकालाचे प्रमाण कमी होते. यावर्षी लेखीसह तोंडी परीक्षा घेतल्याने निकालाचा टक्का वाढला आहे.