शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

अन्याय विकास आराखड्या विरोधात पालघर बंद, मोर्चा

By admin | Updated: April 12, 2016 00:25 IST

पालघरच्या प्रारुप विकास आराखडा हा स्थानिक शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने आराखडा विरोधी संघर्ष समितीची बैठक घेण्याच्या एक वर्षापूर्वीच्या आश्वासनाचा मुख्यमंत्र्यांना विसर

पालघर : पालघरच्या प्रारुप विकास आराखडा हा स्थानिक शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने आराखडा विरोधी संघर्ष समितीची बैठक घेण्याच्या एक वर्षापूर्वीच्या आश्वासनाचा मुख्यमंत्र्यांना विसर पडल्याने संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी सर्वपक्षीयांनी निषेध मोर्चा काढला होता. आज संपूर्ण पालघर शहरातील दुकाने व रिक्षा बंद ठेवून शहरवासियांनी त्याला पाठींबा दर्शविला होता.पालघर नगरपरिषदेचा प्रारुप विकास आराखडा हा शेतकरी व स्थानिक ग्रामस्थांवर अन्यायकारक असल्याने हा आराखडा रद्द कररावा यासाठी टेंभोडे, अल्याळी, नवली, वेवुर, घोलविरा, गोठणपुर, परिसरातील ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांनी अनेकदा मोर्चे, निदर्शने तसेच बेमुदत उपोषणाद्वारे आपला रोष व्यक्त करून शासन दरबारी निवेदनाद्वारे पोहचविण्याचे काम केले होते. नगरपरिषद क्षेत्रासाठी २१ मार्च २०१३ रोजी हा आराखडा प्रसिद्ध झाला. त्यातील जमीन वावर नकाशा प्रत्यक्ष सर्व्हेक्षण न करताच बनविण्यात आल्याने हा नकाशा सदोष होता. प्रारूप आराखड्यात जी आरक्षणे टाकण्यात आली ती पूर्णपणे लहान शेतकऱ्यांच्या जमिनीवरच. गृहसंकुलाना मनमानी परवानगी देतांना त्यांना आरक्षणातून, पूर्णपणे वगळण्यात आल्याने शेतकरी, ग्रामस्थांनी आराखड्याला प्रारंभापासूनच विरोध दर्शविला होता. या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण्यात आलेल्या उपोषणावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी शासनाने या प्ररकणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक तोडगा काढणार असल्याचा निरोप दिल्याने विश्वास ठेऊन आपले उपोषण मागे घेतले होते. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, माजी आमदार कृष्णा घोडा, आ. हितेंद्र ठाकूर यांनीही १०एप्रिल २०१५ रोजी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी आपण या प्रारूप आराखड्यासंदर्भात सर्वांशी चर्चा करून दुरूस्त्या करू अथवा रद्द करू असे आश्वासन दिले होते. (प्रतिनिधी) वर्ष झाले पालघरवासीय करता आहेत प्रतिक्षामुख्यमंत्र्यांना आपल्या अश्वासनाचा वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतरही विसर पडला असून अजूनही त्यांनी याबाबत कुठलाही तोडगा न काढल्याने आज प्रारूप विकास आराखडा विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष रमाकांत पाटील, रोशन पाटील, प्रदीप पाटील, योगीता पाटील, इ. सह नगराध्यक्षा प्रियंका पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अनील गावड, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, बाबा कदम, अस्लम मणीयार, प्रितम राऊत, बविआचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, सेवा जिल्हा प्रतीम राऊत, बविआचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, सेना जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे, भाजपाच्या लक्ष्मीबेन हजारी, सिपीएमचे बबलु त्रिवेदी इ. नी मोर्चात सहभाग घेतला होता. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांना निवेदन देण्यात आले.