शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

झळा ज्या लागल्या जीवा , पारा ४५ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:04 IST

राजस्थानातून आलेल्या उष्णतेच्या लाटेच्या परिणामी सोमवारी ठाणे जिल्ह्यात तापमानाने कहर केला

ठाणे : राजस्थानातून आलेल्या उष्णतेच्या लाटेच्या परिणामी सोमवारी ठाणे जिल्ह्यात तापमानाने कहर केला. बहुतांश शहरांचे तापमान ४४ ते ४५ अंशांदरम्यान गेल्याने अंगाची काहिली झाली. दुपारच्या वेळी रहदारीही थंडावली. उष्णतेची ही लाट मंगळवारीही कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.उष्ण वाऱ्यांच्या झळांमुळे रविवारपासूनच ठाणे जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली होती. ते ४२ ते ४४ अंशांदरम्यान होते. सोमवारी मात्र पारा आणखी चढत गेला आणि जिल्ह्यातील प्रमुख शहरांचे तापमान ४४ ते ४५ अंशांपर्यंत पोचले. तापमान वाढत गेल्याने सकाळी ११ ते साडेअकरानंतर उष्म्याच्या लाटा जाणवू लागल्या. लोकलमध्ये, बस किंवा रिक्षेसारख्या वाहनांत येणाºया झळांनी जीव नकोसा झाला. रहदारी मंदावली. दुकानांतील गर्दी रोडावली. काही दुकाने तर दुपारच्या वेळेत बंदही करण्यात आली. वातानुकूलन यंत्रांचाही फारसा उपयोग होत नसल्याचे जाणवत होते.सतत कोरड पडत असल्याने बाटलीबंद थंड पाण्याची मागणी प्रचंड वाढली. वेगवेगळ््या रेल्वे स्थानकांत मिळणाºया शुद्ध पाण्याच्या काऊंटरसमोर अक्षरश: रांगा लागल्या. ताक, सरबते, पन्हे, ऊसाचा रस पिण्यासाठी गर्दी झाली. कुल्फी, आइस्क्रिम, फालुदा, पियुष, लस्सी पिणाºयांचे प्रमाण वाढले. वेगवेगळ््या रूग्णालयांनी, पालिकांच्या आपत्कालीन विभागांनी उषण्तेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केले आहेत.घटलेली झाडे कारणीभूतकमी झालेले झाडांचे प्रमाण, घटलेले हरीत पट्टे, ठिकठिकाणी बसवलेले पेव्हर ब्लॉक, काँक्रिटचे रस्ते, सर्वत्र सुरू असलेली बांधकामे, जलाशयांचे घटलेले प्रमाण यामुळे तापमानाच्या झळा आणखी जाणवत असल्याचे मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले.सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान उन्हात फिरू नका.आवश्यकता नसली, तरी भरपूर पाणी प्या.सरबते, शहाळ््याचे पाणी, निरा, ताक, पन्हे, ऊसाचा रस यासारखी शक्यतो नैसर्गिक पेय प्या.टोपी, रूमालाने डोके झाकून घ्या. गॉगल वापराचेहरा पुसण्यासाठी ओल्या कापडाचा वापर करा.कलिंगडासारखी रसदार फळे, काकडी यांचे सेवन करा.सौम्य रंगाचे, सैल, सुती कपडे वापरा.उन्हामुळे अस्वस्थ वाटू लागल्यास लगेचच सावलीत जा.फारच अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.पशु-पक्ष्यांसाठीही पुरेसे पाणी ठेवा.उष्ण वारे अंगावर येत असतील, तर त्यापासूनही काळजी घ्या.