शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
3
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
4
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
5
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
6
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
7
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
8
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
9
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
10
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
11
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
12
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
13
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
14
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

उल्हासनगरात अतिधोकादायक ३ इमारतींवर पाडकाम कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 16:50 IST

हमलोग, शांती पॅलेस, ओम शिवगंगा इमारतीवर अतिक्रमण विभागाने पाडकाम कारवाई सुरू केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.

उल्हासनगर : महापालिकेने १५० धोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी घोषित केल्या असून, त्यापैकी अतिधोकादायक असलेल्या ३० इमारती खाली केल्या आहेत. त्यापैकी हमलोग, शांती पॅलेस, ओम शिवगंगा इमारतीवर अतिक्रमण विभागाने पाडकाम कारवाई सुरू केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.

उल्हासनगरात दरवर्षी इमारती कोसळून मृत्यू झाल्याचे प्रकार झाले आहेत. भिवंडी येथील धोकादायक इमारत कोसळून ४०पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून, असंख्य जण जखमी झाले आहेत. भिवंडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका उपायुक्त मदन सोंडे यांनी कॅम्प नं -१ मधील हमलोग, कॅम्प नं-२ मधील शांती पॅलेस व कॅम्प नं-४ मधील ओम शिवगंगा या अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. तसे प्रसिद्धिपत्रक काढले आहे. अतिक्रमण विभागाचे प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने तिन्ही इमारतीवर आज पाडकाम कारवाई सुरू केली आहे. तसेच धोकादायक इमारतीच्या यादीत नसलेल्या अन्य इमारतीचे सर्वेक्षण करण्याचे संकेत उपायुक्त मदन सोंडे यांनी दिले. 

शहरातील अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई पहापलिकेने सुरू केली. तर दुसरीकडे १३० धोकादायक इमारतीला पावसाळ्यात पूर्वी नोटिसा देऊन नागरिकांना इमारती खाली करण्यास सांगितले. मात्र इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे. महापालिकेकडे आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी होत आहे. पालिकेकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने हजारो नागरिकांना धोकादायक इमारती राहावे लागत आहे. गेल्या वर्षी २० वर्ष जुन्या इमारतीचे ऑडिट करून घेण्याचा सल्ला पालिकेने इमारत धारकांना दिला होता. मात्र एकाही २० वर्ष जुन्या इमारती स्ट्रॅक्चर ऑडिट करून घेतले नाही. 

धोकादायक इमारतींचा आकडा चुकीचाशहरात सन १९९० ते ९५दरम्यान रेती पुरवठा बंद असल्याने, त्यावेळी बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतींमध्ये रेतीऐवजी दगडाचा चुरा व वाळवा रेती याचा वापर करीत होते. त्या काळातील बहुतांश इमारती धोकादायक होत असल्याने त्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे धोकादायक इमारतीचा आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.