शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

उल्हासनगरात अतिधोकादायक ३ इमारतींवर पाडकाम कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 16:50 IST

हमलोग, शांती पॅलेस, ओम शिवगंगा इमारतीवर अतिक्रमण विभागाने पाडकाम कारवाई सुरू केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.

उल्हासनगर : महापालिकेने १५० धोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी घोषित केल्या असून, त्यापैकी अतिधोकादायक असलेल्या ३० इमारती खाली केल्या आहेत. त्यापैकी हमलोग, शांती पॅलेस, ओम शिवगंगा इमारतीवर अतिक्रमण विभागाने पाडकाम कारवाई सुरू केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.

उल्हासनगरात दरवर्षी इमारती कोसळून मृत्यू झाल्याचे प्रकार झाले आहेत. भिवंडी येथील धोकादायक इमारत कोसळून ४०पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून, असंख्य जण जखमी झाले आहेत. भिवंडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका उपायुक्त मदन सोंडे यांनी कॅम्प नं -१ मधील हमलोग, कॅम्प नं-२ मधील शांती पॅलेस व कॅम्प नं-४ मधील ओम शिवगंगा या अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. तसे प्रसिद्धिपत्रक काढले आहे. अतिक्रमण विभागाचे प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने तिन्ही इमारतीवर आज पाडकाम कारवाई सुरू केली आहे. तसेच धोकादायक इमारतीच्या यादीत नसलेल्या अन्य इमारतीचे सर्वेक्षण करण्याचे संकेत उपायुक्त मदन सोंडे यांनी दिले. 

शहरातील अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई पहापलिकेने सुरू केली. तर दुसरीकडे १३० धोकादायक इमारतीला पावसाळ्यात पूर्वी नोटिसा देऊन नागरिकांना इमारती खाली करण्यास सांगितले. मात्र इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे. महापालिकेकडे आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी होत आहे. पालिकेकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने हजारो नागरिकांना धोकादायक इमारती राहावे लागत आहे. गेल्या वर्षी २० वर्ष जुन्या इमारतीचे ऑडिट करून घेण्याचा सल्ला पालिकेने इमारत धारकांना दिला होता. मात्र एकाही २० वर्ष जुन्या इमारती स्ट्रॅक्चर ऑडिट करून घेतले नाही. 

धोकादायक इमारतींचा आकडा चुकीचाशहरात सन १९९० ते ९५दरम्यान रेती पुरवठा बंद असल्याने, त्यावेळी बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतींमध्ये रेतीऐवजी दगडाचा चुरा व वाळवा रेती याचा वापर करीत होते. त्या काळातील बहुतांश इमारती धोकादायक होत असल्याने त्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे धोकादायक इमारतीचा आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.