शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्याने भातशेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 12:17 AM

कंपनी प्रशासनावर कारवाई करा : शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी

वाडा : तालुक्यातील कुडूस येथील धोडी केमटेक्स या कंपनीने रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्याने हे पाणी काही शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने भातशेती वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने पाहणी करून या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत धोडी केमटेक्स प्रा.लि. ही कंपनी असून येथे क्लोरिनपासून पाणी शुद्ध करण्याच्या पावडरचे उत्पादन केले जाते. या कंपनीने रासायनिक सांडपाणी सोडण्यासाठी बनवलेला सेफ्टी टँक हा खूपच लहान असल्याने पाणी साठवून ठेवण्याची त्याची क्षमता कमी असल्याने कंपनी काही वेळा रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडत असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

या रासायनिक पाण्यामुळे वडवली, चिंचघर पाडा, मुसारणे, घोणसई, डाकिवली या गावातील नाल्यालगत असलेल्या शेतजमिनीत हे पाणी जाऊ लागले आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांचे भातपीक धोक्यात आले आहे. तसेच या गावातील गाई, म्हशी या नाल्यातील पाणी पीत असल्याने त्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे पाणी त्वरित बंद करून या व अशा अन्य कंपन्यांवर कारवाई करण्याचे निवेदन शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, पंचायत समितीचे सभापती योगेश गवा, जि.प. सदस्य राजेश मुकणे, तालुकाप्रमुख उमेश पठारे, पंचायत समिती सदस्य अमोल पाटील, राजेश सातवी, रघुनाथ पाटील, तालुका सचिव निलेश पाटील आदी या वेळी उपस्थित होते.नाल्यात सोडलेले रासायनिक पाणी आमच्या कंपनीतील नाही. कारण कंपनीला संरक्षक भिंत असल्याने पाणी बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही.- उमाकांत पांडा, कंपनी व्यवस्थापक

 

टॅग्स :thaneठाणे