शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

भर पावसात अग्निशमन दलाने वाचविले १०३ जणांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 06:05 IST

मंगळवारी ठाणेकरांना मुसळधार पावसाने गाठल्यानंतर घरी आणि रस्त्यावर अडकलेल्यांची एकच धावपळ उडाली.

ठाणे : मंगळवारी ठाणेकरांना मुसळधार पावसाने गाठल्यानंतर घरी आणि रस्त्यावर अडकलेल्यांची एकच धावपळ उडाली. अनेक घरांत पाणी शिरल्यामुळे जीव मुठीत घेऊन अडकलेल्या १०३ रहिवाशांची अग्निशमन दलाच्या वेगवेगळ्या केंद्रावरील जवानांनी प्राणांची बाजी लावून सुटका केली. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांची त्यांना मोलाची मदत मिळाली.दुपारनंतर पावसाचा जोर वाढला त्याच वेळी भरतीची असल्याने खाडीतही पाणी जायला जागा नव्हती. त्यामुळे नाले, गटारे तुडूंब भरुन वाहू लागली होते. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पालिकेसह जिल्हा आपत्ती नियंत्रण यंत्रणांचीही एकच धावपळ उडाली. वर्तकनगर, भीमनगर, विनायक सोसायटी शिवाईनगर गार्डन बिल्डिंग, वर्तकनगर पोलीस वसाहत इमारत क्रमांक ५३ आणि कोपरीतील शामनगर तसेच नौपाड्यातील चिखलवाडी अशा इमारतींच्या परिसरात मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. याशिवाय, वागळे इस्टेट टीसा हाऊस, ज्ञानेश्वरनगर, राजीव गांधीनगर, कैलासनगर, सिद्धेश्वर तलाव, श्रीनगर या भागांसह ८३ ठिकाणी पाणी भरल्याच्या घटना घडल्या. तर जिल्हा रुग्णालयाजवळ एक बस पाण्यात अडकल्यामुळे २० प्रवासी जीव मुठीत घेऊन बसले होते. त्यांची कौशल्याने अग्निशमन दलाने सुटका केली. याशिवाय, मनोरमानगर येथे दोन, कोपरी परिसरातून २६, बाळकूम भागातील मानपाडा आणि मनोरमानगर भागातील ३० ते ३५ आणि नौपाड्याच्या चिखलवाडीतील ३० अशा सुमारे १०३ जणांची सुटका ठाणे महापालिकेच्या जवाहरबाग, कोपरी, वागळे इस्टेट, बाळकूम, पाचपाखाडी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी केली. गेली २४ तास हा विभाग जीवाची पर्वा न करता नाले आणि इमारतींमधील पाण्यात शिरुन लोकांचे जीव वाचविण्यासाठी धडपड करीत होता. आणखीही तीन ते चार जणांचा शोध लागलेला नसून त्यांचाही शोध घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती अग्निशमन दलाचे उपमुख्य अधिकारी अरुण राऊत यांनी ‘लोकमत’ला दिली. नितिन कंपनी येथे कोरम मॉलजवळ दीपाली बनसोडे ही महिला पडल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी अग्शिमन दल किंवा पोलिसांना तातडीने कळविले नाही. तिच्या पतीने दुसºया दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी अग्निशमन दलाला ही माहिती दिली. अन्यथा, तिचाही लवकर शोध लागू शकला असता, असेही ते म्हणाले.याठिकाणी भिंत कोसळली...पावसामुळे श्रीनगर सेक्टर चार प्रेरणा बिल्डिंगच्या कंपाउंडची भिंत, लोकमान्यनगरपाडा क्रमांक एक महिला बचत गट, देवदयानगर, आयप्पा मंदीर आदी सात ते आठ ठिकाणी भिंत कोसळल्याचे प्रकार घडले.ज्ञानेश्वरनगर, राजीव गांधीनगर, सिद्धेश्वर तलाव परिसरासह ३० ते ३५ ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. तर मुंब्रा येथील रेहमानिया हॉस्पिटल समोरील रोडवर दरड कोसळल्याची घटना घडली. या सर्व ठिकाणी ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाºयांनी धाव घेऊन मदत कार्य केले.