शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ठाण्यात साथीचे आजार नियंत्रणात, महापालिकेने केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 01:23 IST

परंतु, यंदा मात्र अद्यापही पावसाने साथ दिल्याने शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण नियंत्रणात असल्याची माहिती पालिकेने दिली.

ठाणे : एकीकडे कोरोनाची साथ आटोक्यात येत असताना यंदा ठाणे शहरात विविध साथीच्या आजारांचे प्रमाणही नियंत्रणात असल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या कालावधीत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळले होते. परंतु, यंदा मात्र अद्यापही पावसाने साथ दिल्याने शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण नियंत्रणात असल्याची माहिती पालिकेने दिली.महापालिका हद्दीत जून-जुलै या कालावधीत डेंग्यूच्या २७ पैकी १० रुग्ण हे संशयित होते, तर मलेरियाचे दोन महिन्यांत २० रुग्ण आढळले आहेत. पावसाळा सुरू झाला की, साथीचे आजारही बळावण्यास सुरुवात होते. यंदा आरोग्ययंत्रणाही कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने शहरात इतर साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष झाले आहे. असे असले तरी महापालिकेने साथीचे आजार रोखण्यासाठी विविध स्वरूपाचे उपाय केल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.>30,997 घरांचीतपासणीमहापालिका हद्दीत १८३० ठिकाणी औषधफवारणी केली आहे. तर, २९,६६३ ठिकाणी धूरफवारणी केल्याचा दावाही केला आहे. यशिवाय, ३० हजार ९९७ घरांची तपासणी केली असता १९९२ घरे दूषित आढळले आहेत. तसेच एकूण ४७,५२१ पाण्याच्या पिंपांच्या तपासणीत ११३८ पिंपे दूषित आढळल्याने त्यामध्ये अळीनाशक औषधफवारणी केली आहे.>तापाच्या रुग्णांवरही तपासणी करून कोरोनाचे उपचारमागील वर्षी आॅगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर लेप्टो, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. दिव्यात तर लेप्टोमुळे काहींचा बळीही गेला होता. यंदा मात्र पावसाने तेवढे रौद्ररूप धारण केलेले नाही. यामुळे इतर साथीचे आजार नियंत्रणात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. वास्तविक पाहता, सध्या कोरोनाच्या कामात सर्वच आरोग्य यंत्रणा व्यस्त असल्याने शहरातील इतर साथीच्या आजारांकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचेही बोलले जात आहे. साधा ताप असला तरी रुग्णाला इतर रुग्णालयांत तपासले जात नाही. आधी कोरोनाचा अहवाल आणा, मगच उपचार करू,असे त्याला सांगितले जात आहे. त्यामुळे ताप असेल आणि कोरोनातपासणी केली तर अहवाल लगेच पॉझिटिव्ह येत असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे संबंधित रुग्णावर थेट कोरोनाचेच उपचार केले जात आहेत. त्यामुळेदेखील इतर साथीच्या आजारांची संख्या ही कमी असल्याचे दिसत आहे.