शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

ठाण्यात साथीचे आजार नियंत्रणात, महापालिकेने केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 01:23 IST

परंतु, यंदा मात्र अद्यापही पावसाने साथ दिल्याने शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण नियंत्रणात असल्याची माहिती पालिकेने दिली.

ठाणे : एकीकडे कोरोनाची साथ आटोक्यात येत असताना यंदा ठाणे शहरात विविध साथीच्या आजारांचे प्रमाणही नियंत्रणात असल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या कालावधीत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळले होते. परंतु, यंदा मात्र अद्यापही पावसाने साथ दिल्याने शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण नियंत्रणात असल्याची माहिती पालिकेने दिली.महापालिका हद्दीत जून-जुलै या कालावधीत डेंग्यूच्या २७ पैकी १० रुग्ण हे संशयित होते, तर मलेरियाचे दोन महिन्यांत २० रुग्ण आढळले आहेत. पावसाळा सुरू झाला की, साथीचे आजारही बळावण्यास सुरुवात होते. यंदा आरोग्ययंत्रणाही कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने शहरात इतर साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष झाले आहे. असे असले तरी महापालिकेने साथीचे आजार रोखण्यासाठी विविध स्वरूपाचे उपाय केल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.>30,997 घरांचीतपासणीमहापालिका हद्दीत १८३० ठिकाणी औषधफवारणी केली आहे. तर, २९,६६३ ठिकाणी धूरफवारणी केल्याचा दावाही केला आहे. यशिवाय, ३० हजार ९९७ घरांची तपासणी केली असता १९९२ घरे दूषित आढळले आहेत. तसेच एकूण ४७,५२१ पाण्याच्या पिंपांच्या तपासणीत ११३८ पिंपे दूषित आढळल्याने त्यामध्ये अळीनाशक औषधफवारणी केली आहे.>तापाच्या रुग्णांवरही तपासणी करून कोरोनाचे उपचारमागील वर्षी आॅगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर लेप्टो, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. दिव्यात तर लेप्टोमुळे काहींचा बळीही गेला होता. यंदा मात्र पावसाने तेवढे रौद्ररूप धारण केलेले नाही. यामुळे इतर साथीचे आजार नियंत्रणात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. वास्तविक पाहता, सध्या कोरोनाच्या कामात सर्वच आरोग्य यंत्रणा व्यस्त असल्याने शहरातील इतर साथीच्या आजारांकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचेही बोलले जात आहे. साधा ताप असला तरी रुग्णाला इतर रुग्णालयांत तपासले जात नाही. आधी कोरोनाचा अहवाल आणा, मगच उपचार करू,असे त्याला सांगितले जात आहे. त्यामुळे ताप असेल आणि कोरोनातपासणी केली तर अहवाल लगेच पॉझिटिव्ह येत असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे संबंधित रुग्णावर थेट कोरोनाचेच उपचार केले जात आहेत. त्यामुळेदेखील इतर साथीच्या आजारांची संख्या ही कमी असल्याचे दिसत आहे.