शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पाणीटंचाई दोन दिवसांत दूर न झाल्यास उद्रेक, उपमहापौरांचा इशारा : २७ गावांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:18 IST

कल्याण-डोंबिवली शहरे व २७ गावांना पाणीपुरवठा करणाºया धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी गावांमधील ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरे व २७ गावांना पाणीपुरवठा करणाºया धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी गावांमधील ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेत चर्चा केली. पाणीसमस्या दोन दिवसांत न सुटल्यास तेथील ग्रामस्थांचा उद्रेक होईल, असा इशारा त्यांनी दिला.२७ गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. गावांना ३२ एमएलडी पाणीकोटा मंजूर झाला आहे. त्यातच, २० एमएलडी पाणी वाढवून देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. असे असतानाही एमआयडीसीकडून अन्याय केला जात असल्याचे भोईर यांचे म्हणणे आहे. एमआयडीसीवर दबाव ठेवण्यात केडीएमसी अपयशी ठरल्याने २७ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या शिगेला पोहोचल्याचे भोईर यांनी सांगितले. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही या गावांना मोठ्या प्रमाणावर पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला निवेदन देऊनही परिस्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे भोईर यांनी आयुक्तांना दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.दरम्यान, चर्चेच्या वेळी आयुक्त वेलरासू यांनी एमआयडीसीच्या अधिकाºयांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. पण, संपर्क होऊ शकला नाही. या वेळी नगरसेवक रमाकांत पाटील, जालिंदर पाटील, सुनीता खंडागळे आणि गोळवली येथील ‘देशमुख होम्स’ गृहसंकुलातील रहिवासीही उपस्थित होते.