शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

५३०० कोटींपैकी केवळ २४०० कोटी आयकर वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 00:58 IST

आतापर्यंत केवळ २४०० कोटी रुपयेच जमा झाले असून गेल्या आर्थिक वर्षात ८१ हजार ५६३ ठाणेकरांनी आयकर (इन्कम टॅक्स रिटर्न) भरलेला नाही, अशी धक्कादायक माहिती पुणे येथील प्रधान मुख्य आयकर आयुक्त अनुराधा भाटिया यांनी ठाण्यात दिली.

ठाणे : आयकर कार्यालयांतर्गत असणाऱ्या ठाणे विभागाला ५३०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य दिले होते. मात्र, आतापर्यंत केवळ २४०० कोटी रुपयेच जमा झाले असून गेल्या आर्थिक वर्षात ८१ हजार ५६३ ठाणेकरांनी आयकर (इन्कम टॅक्स रिटर्न) भरलेला नाही, अशी धक्कादायक माहिती पुणे येथील प्रधान मुख्य आयकर आयुक्त अनुराधा भाटिया यांनी ठाण्यात दिली. आउटरिच कार्यक्रम आणि संवादात्मक चर्चासत्र शुक्रवारी ठाण्यात आयोजिले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.भारत सरकारच्या विवाद से विश्वास योजना-२०२० याची माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम वागळे इस्टेट येथील सभागृहात आयोजिला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. आयकर कार्यालयांतर्गत इतर विभागांच्या तुलनेत ठाण्यात कमी लोकांनी आयकर (इन्कम टॅक्स रिटर्न) भरला आहे. मात्र, असे का झाले, याची संबंधित अधिकाऱ्यांसह सीए, उद्योजक आणि व्यावसायिकाच्या प्रतिनिधींनी माहिती घेऊन आपापले करदाते, व्यावसायिक यांना आयकर भरायला लावावा, अशा सूचना त्यांनी केल्या. अद्यापही ठाणे विभागाकडून दिलेल्या लक्ष्यातील २४०० कोटी रुपये जमा होणे बाकी आहे. तर, सेल्फ असेसमेंट ८२ कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. जो अ‍ॅडव्हान्स टॅक्स येणे अपेक्षित आहे, तोही आलेला नाही, अशी माहिती दिली.यावेळी ठाण्याचे मुख्य आयकर आयुक्त के.सी.पी. पटनायक यांनीही करदाते व व्यावसायिक यांच्याशी संवाद साधला. यावेळी ट्रेडर्स असोसिएशन, ज्वेलर्स असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन, चार्टर्ड अकाउंटंट्स असोसिएशन, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.>विवाद से विश्वास योजनेची दिली माहितीमहाराष्टÑात आठ लाख नोंदणीकृत सामाजिक तसेच विश्वस्त संस्था आहेत. मात्र, त्यातील फक्त सुमारे १० हजार संस्थाच कर देतात, असेही भाटिया म्हणाल्या. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी विवाद से विश्वास योजनेबाबत करदाते आणि करव्यावसायिकांमध्ये जागृती निर्माण केली. या योजनेचे फायदे सांगितले. या योजनेत आयकर आयुक्त (अपील), आयकर अपीलिय प्राधिकरण, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय अशा विविध टप्प्यांवर विवादित मागणी (जशी केस असेल तशी) करदात्यांना १०० टक्के किंवा ५० टक्के भरून दंड व व्याजातून मुक्तता मिळू शकणार आहे.