शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

जिल्ह्यात २४ हजार २२७ पैकी टीईटी पास नसलेले अवघे १२ शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण संस्थेच्या कृपाशीर्वादाने ‘टीईटी’ ही परीक्षा उत्तीर्ण नसलेले शिक्षक मिळेल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण संस्थेच्या कृपाशीर्वादाने ‘टीईटी’ ही परीक्षा उत्तीर्ण नसलेले शिक्षक मिळेल त्या वेतनावर विद्यार्थी घडवत आहेत. पण आता टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच सेवेत राहता येईल, असे शिक्कामोर्तब औरंगाबाद खंडपीठाने निर्णयाद्वारे केले आहे. यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची नोकरी संकटात आली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १२ शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आलेले शिक्षक हे संस्थांच्या शाळांमधील आहेत. शासकीय, जिल्हा परिषद, महापालिका शाळांमध्ये आधीच नियमबाह्य शिक्षक भरण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झालेले शिक्षक जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थांच्याच शाळांमध्ये आढळून येतात. यानुसार जिल्ह्यातील या टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांची संख्या ही १२ आढळून आली आहे. न्यायालयीन आदेशानुसार आता या शिक्षकांवर गंडांतर आले आहे. कायम शिक्षकांच्या तुलनेत कंत्राटी शिक्षकांच्या कामाचा दर्जा उत्तम असल्याचे याआधी राजकीय वर्तुळात ऐकायला मिळायचे. मात्र, आता यातील टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्यांच्या नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. यावर संबंधित शिक्षण संस्था आता काय हालचाली करणार, याकडे या शिक्षकांचे लक्ष लागून आहे.

जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाआनुदानित शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या बघता अवघे १२ शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाकडे नोंदविण्यात आले आहे. ठाणे महापालिकेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर या सहा महापालिकांसह जिल्हा परिषदेच्या व नगर परिषदांच्या कार्य क्षेत्रात अनुदानित ४३४ माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांसह अंशत: अनुदानित, विनाअनुदानित आदी एक हजार ६२० शाळा व कनिष्ठ महाविद्यालये जिल्ह्यात कार्यरत आहेत.

या शाळांमध्ये यामध्ये सात हजार ७३७ शिक्षक व १६ हजार ४९० शिक्षिकांसह तब्बल २४ हजार २२७ शिक्षक कार्यरत आहेत. याशिवाय आठ हजार ९१ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हाभरातील या ३२ हजार ३१८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून नववी ते १२वीच्या चार लाख ४२ हजार ५०७ विद्यार्थ्यांना या एक हजार ६२० व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यादानाचे कार्य सध्या सुरू आहे. यात शाळांमध्ये गेल्या काही वर्षांपासून कमी वेतनावर, वेतन मिळण्याच्या अपेक्षेने बहुतांशी शिक्षक कायम सेवा लागू होईल या आशेने विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्याची दखल घेऊन शिक्षण संस्था ठरावाच्या माध्यमातून काही शिक्षकांना सेवेतही घेतले. पण, आता त्यांच्या या नोकरीवर गंडांतर आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

--------

जोड आहे.