शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आमचे सरकार हप्ता भरणारं आहे तर पूर्वीचे सरकार हप्ता घेणारे होते; मुख्यमंत्र्यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 17:17 IST

महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

पंकज पाटील/ बदलापूर: "गेल्या दोन वर्षात आमच्या सरकारने लोकांच्या हितासाठी अनेक कामे केली. पूर्वीचे सरकार हे हप्ता घेणारे सरकार होतं आणि आमचं सरकार हे महिला, शेतकरी आणि बेरोजगार यांच्या बँक खात्यात हप्ता भरणारं सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे," असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आलं होते. उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच हे सरकार फसवे नसून लोकांसाठी काम करणारे सरकार असल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून या महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी गेल्या दोन वर्षात अनेक प्रकल्प राबवल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. लाडकी बहीण योजनेचा हप्ता भरताना महिलांचे बँक अकाउंट लिंक झालेत की नाही हे चेक करण्यासाठी सरकार सुरुवातीला एक रुपया टाकणार होते, मात्र विरोधक या एक रुपयाचेही राजकारण करतील म्हणून आम्ही पूर्ण रक्कम आमच्या भगिनींच्या बँक खात्यात टाकल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

विरोधकांना प्रत्येक योजनेमध्ये केवळ राजकारण दिसत असून आम्ही जनतेच्या समाधानासाठी काम करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आमदार किसन कथोरे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे, खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि राजकीय पुढारी उपस्थित होते. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेIndependence Dayस्वातंत्र्य दिन