शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

अन्यथा प्रत्येक महासभेत पाण्याचे आंदोलन पेटेल, आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:00 IST

पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सर्व पक्षीयांना एकत्र येण्याची गरज आहे. तर ठाणे महापालिकेने मोठे प्रकल्प आधी बाजूला सारून शाई धरणासाठी निधी द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

ठळक मुद्देमहासभेत शाई धरणाची घोषणा करण्याची मागणीशाई धरणाचा खर्च १४०० कोटींवर

ठाणे - डिसेंबरमध्येच ठाणे शहरात पाण्याची समस्या भीषण झाली आहे. येत्या सहा महिन्यात ही परिस्थिती आणखी वाईट होणार आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या महासभेत लक्षवेधीला उत्तर देतांना शाई धरणावर शिक्कामोर्तब करा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. परंतु या बाबतचा निर्णय झाला नाही तर प्रत्येक महासभेला पाण्यासंदर्भात आंदोलन पेटले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.                         सध्या ठाण्यासह जिल्ह्यात पाण्याची समस्या भीषण रुप धारण करीत आहे. डिसेंबर महिन्यातच ३० टक्के पाणी कपात सुरु झाली आहे. ३० तासांसाठी पाणी गेल्यानंतर पुन्हा पाणी चढण्यासाठी २४ तासांचा कालावधी जातो. त्यामुळे एक दिवसाचे शटडाऊन घेतले जात असले तरी त्याचे परिणाम पुढील दोन ते दिवस नागरीकांना भेडसावत असल्याचेही त्यांनी सांगितले. घोडबंदर सारख्या भागातही पाण्याची समस्या वाढत आहे, परंतु असे असतांना न्यायालयात ठाणे महापालिकेने दोन अ‍ॅफीडेव्हीट सादर केले. त्यातही ते दिशाभुल करणारे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पालिका प्रशासनाने न्यायालयाचीही दिशाभुल केली असल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे.                   मागील कित्येक वर्षापासून पाण्याची ही समस्या सोडविण्यासाठी शाई धरणाची मागणी करण्यात आली आहे. सुरवातीला याचा खर्च हा कमी होता. परंतु आता त्याचा खर्च सुमारे १४०० कोटींच्या घरात गेला आहे. असे असेल तरी वेळीच या धरणाचे काम सुरु केले असते तर आज ही परिस्थिती प्रशासनावर आली नसती असेही त्यांनी सांगितले. परंतु आता पाण्याची येत्या काळाची समस्या लक्षात घेता, धरण होणे ही काळाची गरज असून त्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनासुध्दा निवेदन दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. क्लस्टर व्हावे यासाठी ज्या पध्दतीने सर्व पक्षीय एकत्र आले होते, तसेच आता शाई धरणासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.दुसरीकडे शाई धरण बांधण्यासाठी पालिकेने इतर मोठ्या प्रकल्पांचा निधी शाई धरणासाठी वर्ग करण्याची मागणीसुध्दा त्यांनी केली आहे. एकूणच येत्या महासभेत लक्षवेधीवर उत्तर देतांना प्रशासन आणि महापौरांनी शाई धरणाची घोषणा करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. परंतु ही घोषणा झाली नाही तर मात्र प्रत्येक महासभेत पाण्याचे आंदोलन पेटेल असा इशाराही त्यांनी शेवटी दिला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस