शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

अन्यथा प्रत्येक महासभेत पाण्याचे आंदोलन पेटेल, आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:00 IST

पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सर्व पक्षीयांना एकत्र येण्याची गरज आहे. तर ठाणे महापालिकेने मोठे प्रकल्प आधी बाजूला सारून शाई धरणासाठी निधी द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

ठळक मुद्देमहासभेत शाई धरणाची घोषणा करण्याची मागणीशाई धरणाचा खर्च १४०० कोटींवर

ठाणे - डिसेंबरमध्येच ठाणे शहरात पाण्याची समस्या भीषण झाली आहे. येत्या सहा महिन्यात ही परिस्थिती आणखी वाईट होणार आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या महासभेत लक्षवेधीला उत्तर देतांना शाई धरणावर शिक्कामोर्तब करा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. परंतु या बाबतचा निर्णय झाला नाही तर प्रत्येक महासभेला पाण्यासंदर्भात आंदोलन पेटले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.                         सध्या ठाण्यासह जिल्ह्यात पाण्याची समस्या भीषण रुप धारण करीत आहे. डिसेंबर महिन्यातच ३० टक्के पाणी कपात सुरु झाली आहे. ३० तासांसाठी पाणी गेल्यानंतर पुन्हा पाणी चढण्यासाठी २४ तासांचा कालावधी जातो. त्यामुळे एक दिवसाचे शटडाऊन घेतले जात असले तरी त्याचे परिणाम पुढील दोन ते दिवस नागरीकांना भेडसावत असल्याचेही त्यांनी सांगितले. घोडबंदर सारख्या भागातही पाण्याची समस्या वाढत आहे, परंतु असे असतांना न्यायालयात ठाणे महापालिकेने दोन अ‍ॅफीडेव्हीट सादर केले. त्यातही ते दिशाभुल करणारे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पालिका प्रशासनाने न्यायालयाचीही दिशाभुल केली असल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे.                   मागील कित्येक वर्षापासून पाण्याची ही समस्या सोडविण्यासाठी शाई धरणाची मागणी करण्यात आली आहे. सुरवातीला याचा खर्च हा कमी होता. परंतु आता त्याचा खर्च सुमारे १४०० कोटींच्या घरात गेला आहे. असे असेल तरी वेळीच या धरणाचे काम सुरु केले असते तर आज ही परिस्थिती प्रशासनावर आली नसती असेही त्यांनी सांगितले. परंतु आता पाण्याची येत्या काळाची समस्या लक्षात घेता, धरण होणे ही काळाची गरज असून त्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनासुध्दा निवेदन दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. क्लस्टर व्हावे यासाठी ज्या पध्दतीने सर्व पक्षीय एकत्र आले होते, तसेच आता शाई धरणासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.दुसरीकडे शाई धरण बांधण्यासाठी पालिकेने इतर मोठ्या प्रकल्पांचा निधी शाई धरणासाठी वर्ग करण्याची मागणीसुध्दा त्यांनी केली आहे. एकूणच येत्या महासभेत लक्षवेधीवर उत्तर देतांना प्रशासन आणि महापौरांनी शाई धरणाची घोषणा करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. परंतु ही घोषणा झाली नाही तर मात्र प्रत्येक महासभेत पाण्याचे आंदोलन पेटेल असा इशाराही त्यांनी शेवटी दिला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस