शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

अन्यथा प्रत्येक महासभेत पाण्याचे आंदोलन पेटेल, आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:00 IST

पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सर्व पक्षीयांना एकत्र येण्याची गरज आहे. तर ठाणे महापालिकेने मोठे प्रकल्प आधी बाजूला सारून शाई धरणासाठी निधी द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

ठळक मुद्देमहासभेत शाई धरणाची घोषणा करण्याची मागणीशाई धरणाचा खर्च १४०० कोटींवर

ठाणे - डिसेंबरमध्येच ठाणे शहरात पाण्याची समस्या भीषण झाली आहे. येत्या सहा महिन्यात ही परिस्थिती आणखी वाईट होणार आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या महासभेत लक्षवेधीला उत्तर देतांना शाई धरणावर शिक्कामोर्तब करा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. परंतु या बाबतचा निर्णय झाला नाही तर प्रत्येक महासभेला पाण्यासंदर्भात आंदोलन पेटले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.                         सध्या ठाण्यासह जिल्ह्यात पाण्याची समस्या भीषण रुप धारण करीत आहे. डिसेंबर महिन्यातच ३० टक्के पाणी कपात सुरु झाली आहे. ३० तासांसाठी पाणी गेल्यानंतर पुन्हा पाणी चढण्यासाठी २४ तासांचा कालावधी जातो. त्यामुळे एक दिवसाचे शटडाऊन घेतले जात असले तरी त्याचे परिणाम पुढील दोन ते दिवस नागरीकांना भेडसावत असल्याचेही त्यांनी सांगितले. घोडबंदर सारख्या भागातही पाण्याची समस्या वाढत आहे, परंतु असे असतांना न्यायालयात ठाणे महापालिकेने दोन अ‍ॅफीडेव्हीट सादर केले. त्यातही ते दिशाभुल करणारे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पालिका प्रशासनाने न्यायालयाचीही दिशाभुल केली असल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे.                   मागील कित्येक वर्षापासून पाण्याची ही समस्या सोडविण्यासाठी शाई धरणाची मागणी करण्यात आली आहे. सुरवातीला याचा खर्च हा कमी होता. परंतु आता त्याचा खर्च सुमारे १४०० कोटींच्या घरात गेला आहे. असे असेल तरी वेळीच या धरणाचे काम सुरु केले असते तर आज ही परिस्थिती प्रशासनावर आली नसती असेही त्यांनी सांगितले. परंतु आता पाण्याची येत्या काळाची समस्या लक्षात घेता, धरण होणे ही काळाची गरज असून त्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनासुध्दा निवेदन दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. क्लस्टर व्हावे यासाठी ज्या पध्दतीने सर्व पक्षीय एकत्र आले होते, तसेच आता शाई धरणासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.दुसरीकडे शाई धरण बांधण्यासाठी पालिकेने इतर मोठ्या प्रकल्पांचा निधी शाई धरणासाठी वर्ग करण्याची मागणीसुध्दा त्यांनी केली आहे. एकूणच येत्या महासभेत लक्षवेधीवर उत्तर देतांना प्रशासन आणि महापौरांनी शाई धरणाची घोषणा करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. परंतु ही घोषणा झाली नाही तर मात्र प्रत्येक महासभेत पाण्याचे आंदोलन पेटेल असा इशाराही त्यांनी शेवटी दिला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस