शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

...अन्यथा रिंगरूट प्रकल्पाला तीव्र विरोध राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 14:54 IST

कल्याण: कल्याण डोंबिवली क्षेत्रातील प्रस्तावित रिंगरूट (बाहय वळण रस्ता) प्रकल्पासाठी केडीएमसी प्रशासनाकडून नुकतीच एक नोटीस जारी करण्यात आली आहे. यात प्रकल्पात जमिन संपादीत करण्याच्या अनुषंगाने टीडीआर स्वरूपातील मोबदला संबंधित जमिन मालकांना देण्याचे धोरण महापालिकेने जारी केले आहे. दरम्यान संबंधितांना त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळावा, समृध्दी महामार्ग अथवा कोकणातील महामार्गाप्रमाणे या रस्त्यासाठी रोखीचा मोबदला देऊन जमिन संपादीत करावी अन्यथा अन्यथा तीव्र आंदोलन छेडून प्रकल्पास विरोध करावा लागेल असा इशारा काँग्रेसचे माजी नगरसेवक रवि पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या माजी नगरसेवकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कल्याण: कल्याण डोंबिवली क्षेत्रातील प्रस्तावित रिंगरूट (बाहय वळण रस्ता) प्रकल्पासाठी केडीएमसी प्रशासनाकडून नुकतीच एक नोटीस जारी करण्यात आली आहे. यात प्रकल्पात जमिन संपादीत करण्याच्या अनुषंगाने टीडीआर स्वरूपातील मोबदला संबंधित जमिन मालकांना देण्याचे धोरण महापालिकेने जारी केले आहे. दरम्यान संबंधितांना त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळावा, समृध्दी महामार्ग अथवा कोकणातील महामार्गाप्रमाणे या रस्त्यासाठी रोखीचा मोबदला देऊन जमिन संपादीत करावी अन्यथा अन्यथा तीव्र आंदोलन छेडून प्रकल्पास विरोध करावा लागेल असा इशारा काँग्रेसचे माजी नगरसेवक रवि पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.एमएमआरडीएच्या माध्यमातून रिंगरूट प्रकल्प राबविण्या संदर्भात जमीनी व अन्य मालमत्ता ताब्यात घेण्यासंदर्भात केडीएमसीने कार्यवाही सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी माणगांव, सागाव, हेदुटणे, घारीवली, भोपर, आयरे, कोपर, जुनी डोंबिवली, ठाकुर्ली, गावदेवी, शिवाजी नगर, चोळे, कांचनगाव, कचोरे, कल्याण, वाडेघर, उंबर्डे, कोलिवली, गंधारे, बारावे, वडवली, अटाळी, आंबिवली, बल्याणी, मांडा, टिटवाळा या सुमारे २६ गावांमधील जमिनी प्रकल्पासाठी संपादीत करण्यात येणार आहे. या जमिनी ताब्यात घेण्यासाठी टीडीआर स्वरूपातील मोबदला जमिन मालकांना देण्याचे धोरण महापालिकेने जाहीर केले आहे. आयुक्त पी वेलरासू यांनी केलेल्या आवाहनानुसार शेतक-यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यावर त्यांना जमिनीचा मोबदला हस्तांतरणीय विकास हककाच्या स्वरूपात (टीडीआर) स्वरूपात दिला जाणार आहे. हा रस्ता सुमारे ३० कि.मी लांबीचा आणि ३० ते ४५ मीटर रूंदीचा आहे. एवढया प्रचंड मोठया प्रमाणात टीडीआर उपलब्ध झाल्याने अशा टीडीआर वापराचा अपेक्षित मोबदला भूमिपुत्रांना मिळणे दुरापास्त होणार असल्याकडे माजी नगरसेवक पाटील यांनी लक्ष वेधले आहे. ज्या २६ गावांचा उल्लेख करण्यात आला आहे त्यातील बहुतांश गावे २०१५ ला केडीएमसीत समाविष्ट झाली तर काही गावे ज्यावेळी महापालिका अस्तित्वात आली तेव्हा म्हणजेच १९८३ ला समाविष्ठ करण्यात आलेली आहेत. परंतू अद्यापही ती अविकसित आहेत, रस्ते, पाणी आदि प्राथमिक स्वरूपातील सुविधा याठिकाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. परिणामी टीडीआर स्वरूपातील मोबदला मुख्य शहरातील बांधकामांसाठी वापरण्याकडे भुमिपुत्रांचा कल राहणार आहे मात्र एवढा प्रचंड टीडीआर ज्या भूखंडावर वापरता येईल असे भूखंड फार कमी प्रमाणात शहरात उपलब्ध असल्याचे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे. टीडीआर प्रक्रिया पार पडण्यासाठी सातबारा उतारा, गटबूक नकाशा, मोजणी नकाशा व अन्य शासकीय कागदपत्रे मिळविण्यासाठी भूमिपुत्रांची अडवणूक व पिळवणूक सरकारी कर्मचा-यांकडून होण्याची दाट शक्यता अल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे व अप्रत्यक्ष असलेल्या सहभागामुळे प्रस्तावित महामार्गावर अनेक बेकायदा बांधकामे उभी राहीली आहेत अशा बांधकामांचा विस्तार पाहता अशा बांधकामांमध्ये राहणारे नागरीक बेघर होण्याची भिती आहे त्यामुळे अशा नागरीकांबाबतचे धोरण स्पष्ट होणे गरजेचे आहे अन्यथा न्यायालयीन प्रक्रियेमुळे संबंधित प्रकल्प रेंगाळण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले आहे. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, राज्यमंत्री तथा रायगड जिल्हयाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार सुभाष भोईर, गणपत गायकवाड, नरेंद्र पवार आणि केडीएमसीचे आयुक्त पी वेलरासू यांनाही पत्र पाठविले आहे.------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली