शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अन्यथा ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, राष्ट्रवादीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 18:04 IST

ठाणे-कळवेकरांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आयुक्तांनी या पुलाचे काम तत्काळ पूर्ण करुन घ्यावे, अन्यथा, कळवेकरांचा उद्रेक होईल, आणि संबधीत ठेकेदार आणि पालिका अधिकारांना जनताच काळे फासेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देवाहतुक कोंडीमुळे कळवेकर हैराणठेकेदार नव्याने निवडण्याची मागणी

ठाणे - कळवा, विटावाकरांची वाहतुक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून कळवा खाडीवर तिसरा पुल उभारण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु हे काम तीन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित असतांनाही आजही याचे काम रखडलेले आहे. त्यात ज्या ठेकेदारांना हे काम देण्यात आले आहे, त्यांना मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे आता शिल्लक राहिलेले काम संबधींत ठेकेदाराकडून काढून घ्यावे आणि या कामासाठी दुसरा ठेकेदार नियुक्त करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली आहे. तसेच हा नवा केव्हा खुला होणार याची माहिती पालिकेने द्यावी अन्यथा ठेकेदाराला आणि त्याला पाठीशा घालणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना वेळ पडल्यास काळे फासले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

          ठाण्यात मेट्रोचे काम सुरु असल्याने ठाणेकरांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. केवळ घोडबंदरच नव्हे तर कळवा उड्डाणपुलावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. कळवा येथील ब्रिटिशकालीन पूल बंद केल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या एकाच उड्डाणपुलावर सध्या वाहतुकीचा भार सुरु आहे. त्यामुळे या पुलावर रोजच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी गेल्या चार वर्षापूर्वी या उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. सप्टेंबर २०१९ पर्यंत कळवा उड्डाणपूलाचे काम पूर्ण होईल असा दावा पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र २०१४ साली उड्डाणपुलाच्या कामासाठी वर्क आॅर्डर देण्यात आली असल्याची माहिती मिलिंद पाटील यांनी यावेळी दिली. सुमारे १८३ कोटी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल बांधण्यात येत असून वर्क आॅडर दिल्यापासून तीन वर्षात हे काम पूर्ण होणार होते. मात्र दिलेल्या मुदतीमध्ये हे काम पूर्ण झाले नसून कामाच्या दर्जाबाबत देखील आनंद परांजपे आणि मिलींद पाटील आणि सुहास देसाई यांनी प्रश्न उपस्थित केला आहे .         सुप्रीम या कंपनीचा एमएमआरडीएने कल्याण येथील उड्डाणपुलाचे काम काढून घेतले असून जे कुमार मुंबईमध्ये काळ्या यादीमध्ये आहे. या दोघांनीही कळवा उड्डाणपुलाचे काम वेळेत न केल्याने प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून हे काम दुसºया ठेकेदारांना देण्यात यावे अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसtmcठाणे महापालिका