शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

अन्यथा ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, राष्ट्रवादीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 18:04 IST

ठाणे-कळवेकरांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आयुक्तांनी या पुलाचे काम तत्काळ पूर्ण करुन घ्यावे, अन्यथा, कळवेकरांचा उद्रेक होईल, आणि संबधीत ठेकेदार आणि पालिका अधिकारांना जनताच काळे फासेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देवाहतुक कोंडीमुळे कळवेकर हैराणठेकेदार नव्याने निवडण्याची मागणी

ठाणे - कळवा, विटावाकरांची वाहतुक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून कळवा खाडीवर तिसरा पुल उभारण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु हे काम तीन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित असतांनाही आजही याचे काम रखडलेले आहे. त्यात ज्या ठेकेदारांना हे काम देण्यात आले आहे, त्यांना मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे आता शिल्लक राहिलेले काम संबधींत ठेकेदाराकडून काढून घ्यावे आणि या कामासाठी दुसरा ठेकेदार नियुक्त करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली आहे. तसेच हा नवा केव्हा खुला होणार याची माहिती पालिकेने द्यावी अन्यथा ठेकेदाराला आणि त्याला पाठीशा घालणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना वेळ पडल्यास काळे फासले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

          ठाण्यात मेट्रोचे काम सुरु असल्याने ठाणेकरांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. केवळ घोडबंदरच नव्हे तर कळवा उड्डाणपुलावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. कळवा येथील ब्रिटिशकालीन पूल बंद केल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या एकाच उड्डाणपुलावर सध्या वाहतुकीचा भार सुरु आहे. त्यामुळे या पुलावर रोजच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी गेल्या चार वर्षापूर्वी या उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. सप्टेंबर २०१९ पर्यंत कळवा उड्डाणपूलाचे काम पूर्ण होईल असा दावा पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र २०१४ साली उड्डाणपुलाच्या कामासाठी वर्क आॅर्डर देण्यात आली असल्याची माहिती मिलिंद पाटील यांनी यावेळी दिली. सुमारे १८३ कोटी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल बांधण्यात येत असून वर्क आॅडर दिल्यापासून तीन वर्षात हे काम पूर्ण होणार होते. मात्र दिलेल्या मुदतीमध्ये हे काम पूर्ण झाले नसून कामाच्या दर्जाबाबत देखील आनंद परांजपे आणि मिलींद पाटील आणि सुहास देसाई यांनी प्रश्न उपस्थित केला आहे .         सुप्रीम या कंपनीचा एमएमआरडीएने कल्याण येथील उड्डाणपुलाचे काम काढून घेतले असून जे कुमार मुंबईमध्ये काळ्या यादीमध्ये आहे. या दोघांनीही कळवा उड्डाणपुलाचे काम वेळेत न केल्याने प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून हे काम दुसºया ठेकेदारांना देण्यात यावे अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसtmcठाणे महापालिका