शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मूळ आराखड्याप्रमाणेच भिवंडीतील मेट्रो ५ चा मार्ग हवा- कपिल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:59 IST

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५च्या प्रकल्प आराखड्याप्रमाणेच भिवंडी शहरातून जाणाऱ्या मार्गाचे काम सुरू करावे,

अनगाव : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५च्या प्रकल्प आराखड्याप्रमाणेच भिवंडी शहरातून जाणाऱ्या मार्गाचे काम सुरू करावे, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केली आहे. राज्याचे नगरविकासमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनभावनेचा आदर करावा, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून होणारे राजकारण अनाकलनीय असल्याचे मत व्यक्त केले आहे.‘एमएमआरडीए’ने कापूरबावडी, बाळकुमनाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा, धामणकरनाका, गोपाळनगर, टेमघर, रांजनोली, गोवेगाव एमआयडीसी, कोनगावमार्गे कल्याण एपीएमसी असा मार्ग मूळ आराखड्यानुसार निश्चित केला होता. भिवंडीतील वंजारपट्टीनाका, गायत्रीनगरमार्गे मेट्रोमार्ग वळवण्याची मागणी करण्यात येत आहे. ती अव्यवहार्य आहे. मूळ मार्गाप्रमाणेच मेट्रोचे काम सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे खा. पाटील म्हणाले. भिवंडीतील नागरिकांनी मूळ आराखड्याप्रमाणे मेट्रोमार्गाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला माझा पाठिंबा आहे. वर्षानुवर्षे प्रचलित असलेल्या भिवंडीकर प्रवाशांच्या मार्गावरच मेट्रो-५ चा मूळ आराखडा तयार केला आहे, असे मत खा. पाटील यांनी व्यक्त केले.>मेट्रोचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांनाच!ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचे श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. त्यांनी मेट्रोला मंजुरी देऊन आपल्या कारकिर्दीतच निविदाही काढली होती. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. आता मेट्रोचे श्रेय घेण्याचे राजकारण सुरू आहे, असा टोला खा. पाटील यांनी लगावला. काही लोकांनी पोस्टरबाजी, बॅनरबाजी सुरू केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार येण्याआधीच तत्कालीन भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने मेट्रोचे काम सुरू केले होते, याकडे खा. पाटील यांनी लक्ष वेधले.