शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

मीरा रोड येथे 200 नागरिकांनी अवयवदानाचा केला संकल्प, वोक्हार्ट रुग्णालयात कार्यशाळेचं आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 16:27 IST

अवयवदानाच्या जनजागृतीसाठी रविवार १ ऑक्टोबर रोजी मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात आयोजित कार्यशाळेत २०० नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला.

मीरा रोड : अवयवदानाच्या जनजागृतीसाठी रविवार १ ऑक्टोबर रोजी मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात आयोजित कार्यशाळेत २०० नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला. मरणोत्तर अवयदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल ही संकल्पना जनमानसात रुजविण्यासाठी महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला लायन्स क्लब ऑफ भायंदरच्या सहकार्याने मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात कार्यशाळा आयोजित केली होती.अवयवदानाची मोहिम तळागाळापर्यंत पोहचण्याकरिता काय करणे गरजेचे का आहे? श्रीलंकेत मानवी अवयव ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून ग्राह्य धरली जाते, त्याच धर्तीवर भारतात असा कायदा करणे गरजेचे आहे का?अवयवदानाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची नेमकी कारणे कोणती? अशा अनेक विषयांवर चर्चा झडली .कार्यशाळेत मीरा भाईंदर , नालासोपारा व वसई विरार येथील दोनशे हुन अधिक नागरिकांनी भाग घेतला होता. आपल्या संस्कृतीत दानाला अनन्यसाधारण महत्व आहे, त्या भारतीय संस्कृतीला अंधश्रद्धा नामक अविचारी भावनेने ग्रासून टाकले आहे. अवयवदान हे श्रेष्ठ दान असले तरी लोकांना याबाबत फारशी कल्पना नसल्याचे जाणवते व याच कारणास्तव अवयवदानाला हवा तसा प्रतिसाद जनसामान्यांतून मिळत नाही, असे प्रांजळ मत किडनी विकार तज्ञ डॉ. महेश प्रसाद यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित २०० नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प करून याविषयी अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.गेल्याच आठवडयात वसई येथील ७९ वर्षीय ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी अवयव दानाचा निर्णय घेतला होता व यामुळे दोन नागरिकांचे प्राण वाचले होते याची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली. योग्य प्रमाणात अवयवदान होत नसल्याने आजही कित्येक जण हे विविध अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत. कुटुंबप्रमुखाच्या सुज्ञ व प्रभावी प्रबोधनातून अन्य सर्वच सदस्यांना अवयवदानासाठी निश्चितच प्रवृत्त करता येऊ शकते. व त्यासाठी समाजाची मानसिकता ही अशाच प्रबोधनातून निश्चितपणे बदलता येईल अशी माहिती रवी हिरवाणी यांनी दिली.एका माहितीनुसार देशात दरवर्षी यकृताच्या आजारामुळे दोन लाख, किडनी प्रत्यारोपणाअभावी दीड लाख तर ५० हजार लोक हृदयरोपण शक्य न झाल्याने मरण पावतात. दृष्टिदोषामुळे अंधत्व आलेले आणि प्रत्यारोपणाची वाट पाहणारे किमान दहा लाख लोक आपल्या देशात आहेत. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे नऊ जणांना जीवनदान मिळू शकते, याबाबत सर्वानी विचार करून यासाठी पुढचे पाऊल उचलले पाहिजे. अफाट लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशात अवयवदानाबाबत जागरूकता आणणे हे प्रत्येक रुग्णालयाचे कर्तव्य आहे अशी माहिती उपस्थितांना देण्यात आली .