शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

बारावीच्या 418 प्रकल्पग्रस्तांना महापालिकांमध्ये सामावून घेण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2022 23:00 IST

बदलापूर: संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पात जे शेतकरी बाधित ...

बदलापूर: संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पात जे शेतकरी बाधित झाले होते त्यांना नोकरीमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका यांना पत्र पाठविले या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात तब्बल 418 प्रकल्पग्रस्तांना महापालिका नगरपालिका मध्ये सामावून घेण्यात येणार आहे. 

      बदलापूरच्या बारवी धरणावर उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाल्याने या धरणात 340 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. या अतिरिक्त पाण्याचा पुरवठा ठाणे महापालिका क्षेत्र, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, अंबरनाथ नगरपालिका, बदलापूर नगरपालिका आणि स्टेम या प्राधिकरणाला पाणी पुरवठा केला जातो. बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिकाना ज्या प्रमाणात पाणीपुरवठा होतोय त्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीची हमी देण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांनी मध्ये 1204 कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 627 बारावी प्रकल्पबाधितांना नोकरी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने पहिल्या टप्प्यात 209 प्रकल्पग्रस्तांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्वतःच्या विभागात सामावून घेतले आहेत. तर उर्वरित 418 लाभार्थ्यांना जिल्ह्यातील विविध महापालिकांमध्ये सामावून घेण्याच्या सूचना देण्यात आले आहे.

या 418 लाभार्थ्यांना पैकी  ठाणे महापालिका 29, कल्याण डोंबिवली महापालिका 121, नवी मुंबई महापालिका 68, मीरा भाईंदर महापालिका 97, उल्हासनगर महापालिका 34, अंबरनाथ नगरपालिका 16, कुळगाव बदलापूर नगरपालिका 18 आणि स्टेम 35  असे तब्बल 418 प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांना प्रत्येक कुटुंबात एका सदस्याला सरकारी नोकरी मिळावी यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी आमदार किसन कथोरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जागेच्या मोबदल्यात भरपाई मिळाल्यानंतर देखील या प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावि यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. या संघर्षाला यश आले असून असून प्रकल्पग्रस्तांना देखील आता नोकरीत सामावून घेतले जात आहे. 

       '' बर्‍याच वर्षांपासूनची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आहे. बारवी प्रकल्पग्रस्तांना जो पॅकेज देण्यात आला आहे तो राज्यातील सर्वोत्कृष्ट पॅकेट ठरला असून भविष्यात राज्यात देखील बारावीच्या धर्तीवरच मोबदला प्रत्येक प्रकल्पग्रस्त मागेल असा विश्वास आहे. 

    - किसन कथोरे, आमदार. मुरबाड विधानसभा

टॅग्स :Damधरण