शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

वादग्रस्त ‘बीएसयूपी’च्या चौकशीचे आदेश; १० वर्षांपासून योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 23:37 IST

पहिल्या टप्प्यात केवळ १७९ जणांनाच घरे मिळाली आहेत.

मीरा राेड :  गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या काशिमीरा भागातील वादग्रस्त बीएसयूपी योजनेची चौकशी करण्याचा आदेश राज्य सरकार शासनाने दिला आहे.

महापालिकेने २००९ मध्ये काशिचर्च झोपडपट्टीमधील ४७१ आणि जनतानगर झोपडपट्टीतील चार हजार १३६ झोपडपट्टीधारकांना इमारतींमध्ये पक्की घरे देण्याचा ठराव केला होता. त्यावेळी खर्चाच्या ५० टक्के रक्कम केंद्र सरकार, ३० टक्के राज्य सरकार व ११ टक्के लाभार्थी आणि नऊ टक्के महापालिकेने खर्च करायचा होता. त्यातील दोन हजार १६० घरे पाडून त्यातील रहिवाशांना पालिकेने संक्रमण शिबिरात पाठवले. परंतु, पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे योजना बारगळली.

पहिल्या टप्प्यात केवळ १७९ जणांनाच घरे मिळाली आहेत. तर, १०२१ सदनिकांच्या चार इमारतींची कामे अजून सुरू असून यातील २९४ सदनिका डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत. पालिकेने योजना पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएकडून १५० कोटींचे कर्ज मागितले असून त्यातील ४० कोटी पालिकेस वर्ग झाले आहेत. बांधकामासाठी पालिकेने निविदा मागवली. ११८ कोटी १६ लाख ५७ हजार रुपयांच्या तीन इमारतींतून ९६० झोपडपट्टीवासीयांना दोन वर्षांत घरे मिळणार होती.

निविदा मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १६ मार्चच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव दिला होता. तिन्ही इमारतींची कामे मे. शायोना कॉर्पोरेशनला देण्याची प्रशासनाची शिफारस असताना सत्ताधारी भाजपने ही निविदा फेटाळत कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून नव्या निविदेचा निर्णय भाजपने घेतला होता. या प्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रारी करून योजनेत घोटाळा झाल्याची तक्रार केली.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक