शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

मेट्रो मार्गाला भिवंडीतून विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:23 IST

हरकतींची सुनावणी पूर्ण : कल्याण रोडऐवजी वंजारपट्टीनाक्याचा पर्याय निवडण्याची मागणी; पाच हजार नागरिकांची अनुकूलता

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी प्रस्तावित ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्प मार्गाबाबत भिवंडीतील जवळपास एक हजार नागरिकांनी विरोध दर्शविला असून, पाच हजार नागरिकांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान महानगरपालिकेने नागरिकांकडून हरकती आणि सूचना बोलावल्या होत्या.

भिवंडी शहरातील नागरिकांना दळणवळणासाठी सोयीचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने मेट्रो रेल्वे प्रकल्प भिवंडीत राबविण्याचा निर्धार केला असून, सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने मेट्रो रेल्वे प्रकल्प क्र. ५ महत्त्वाचा राहणार असून, त्याच्या मार्गाला एमएमआरडीएने गती दिली आहे. ठाण्यातील कापूरबावडी येथून सुरू होणारा मेट्रो रेल्वेमार्ग बाळकुम, कशेळी, काल्हेर, पुर्णा, अंंजूरफाटा, धामणकरनाका, राजीव गांधी चौकापासून कल्याण रोडकडे वळण घेऊन पुढे टेमघर, रांजनोली, गोवेगाव, दुर्गाडी ते कल्याण एपीएमसीपर्यंत नेण्यात येणार आहे. हा मार्ग २४ किलोमीटर लांबीचा असून, एमएमआरडीएच्या माध्यमातून कापूरबावडी, कशेळी, काल्हेर, पुर्णा, कोपर ते राहनाळपर्यंत मेट्रोचे काम सुरू झाले आहे.

भिवंडीतील कल्याण रोडच्या दुहेरी बाजूला राहणारे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी कल्याण रोडने जाणाºया मेट्रोला विरोध दर्शविला. ही बाब लक्षात येताच एमएमआरडीएच्या सूचनेवरून भिवंडी पालिका प्रशासनाने मेट्रोबाधित नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यासाठी सुमारे सहा हजार प्रकल्पबाधित रहिवाशांना नोटिसा दिल्या होत्या. या नोटिसांवर आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या उपस्थितीत पालिकेच्या दालनात लेखी हरकती व सूचना अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी एक हजार ४० लोकांनी हा मेट्रो प्रकल्प कल्याण रोडऐवजी वंजारपट्टीनाक्याकडून नेण्याची सूचना केली. हा मेट्रोमार्ग कल्याण रोड येथून नेल्यास तीव्र आंदोलन करण्याची भूमिका कल्याण रोड व्यापारी संघर्ष समितीने घेतली आहे. या मेट्रोमार्ग प्रकल्पात काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. मात्र, बहुसंख्य नागरिकांनी मेट्रो प्रकल्पासाठी आपली जागा देण्यास सहमती दर्शवली असून, जागेच्या मोबदल्यात रोख रक्कम अथवा अन्यत्र जागा देण्याचीही मागणी केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून मिळाली आहे.गोपनीय अहवाल शासनाकडे : मेट्रोच्या मार्गाबाबत आलेल्या हरकती आणि सूचनांचा गोपनीय अहवाल पालिका प्रशासनाने शासनाकडे पाठवला आहे. येत्या महिनाभरात या मेट्रोमार्गाबाबत शासनस्तरावर निर्णय होण्याची शक्यता आहे. आयुक्तांच्या दालनात झालेल्या हरकती आणि सूचनांच्या सुनावणीदरम्यान कल्याण रोड परिसरातील काही रहिवासी तथा व्यापाऱ्यांनीही मेट्रोच्या मार्गास अनुकूलता दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली.