शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विरोधी पक्ष नेत्याच्या मुलीचे पाणी प्रश्नावर आयुक्तांच्या दालनात केले ठिय्या आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 18:18 IST

मुंब्रा प्रभागातील शिवाजी नगर, दरगाह रोड,एम के कंपाऊंड, दादी कॉलोनी तसेच पिंट्या दादा मैदान परिसरात गेले महिनाभर प्रचंड पाणी समस्या भेडसावत आहे.

मुंब्रा-कौसा भागातील पाण्याच्या समस्येवर तत्काळ तोडगा काढण्याचे आदेश ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले होते. त्यानंतर पाणीपुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांनीही दुसर्‍याच दिवशी कामाला सुरुवात करण्याचे जाहीर केले होते. मात्र, 15 दिवसांनंतरही पाणी समस्या निकाली न निघाल्याने नगरसेविका फरझाना शाकिर शेख  आणि  मर्झिया शानु पठाण यांचा आयुक्त दालना बाहेर हल्लाबोल केला. पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेरच त्यांनी जवळपास तासभर ठिय्या आंदोलन केले.

मुंब्रा प्रभागातील शिवाजी नगर, दरगाह रोड,एम के कंपाऊंड, दादी कॉलोनी तसेच पिंट्या दादा मैदान परिसरात गेले महिनाभर प्रचंड पाणी समस्या भेडसावत आहे. या भागात पाणीपुरवठा खंडीत होणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, अशा समस्या भेडसावत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी अधिकार्‍यांसह पाहणीदौरा केला होता. त्यानंतर आयुक्तांशीही चर्चा केली होती. या पाहणी दौर्‍यानंतर जमिनीखाली दबलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती अशक्य असल्याने नवीन जलवाहिन्या टाकण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, पंधरा दिवसानंतरही या समस्येवर तोडगा काढण्यात येत नसल्याने सोमवारी दुपारी मर्झिया पठाण आणि फरझाना शाकीर शेख या आयुक्तांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडविल्यानंतर या दोघींनीही आयुक्तांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन केले.यावेळी पाणीपुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांनी नियोजनबद्ध आखणी करुन बुधवारपासून कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

यावेळी मर्झिया पठाण यांनी सांगितले की, येथील पाण्याची समस्येवर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी सागर साळुंखे या अधिकार्‍यांसह रात्री 12 ते दोन वाजेच्या दरम्यान दौरा केला होता. त्यावेळी अनेक ठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्या दिसून आल्या. मात्र, त्यांची दुरुस्ती शक्य नसल्याने या जलवाहिन्या नव्याने टाकण्याचे काम करण्याबाबत आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीमध्ये अधिकार्‍यांनी आश्वासीत केले होते. मात्र, अद्यापही त्यावर काम सुरु झालेले नाही. याचाच अर्थ अधिकारी आयुक्तांच्या आदेशाला महत्व देत नाहीत का? पाणीपुरवठ्याच्या नूतनीकरणासाठी शायोना नावाच्या एका  238 कोटींच्या ठेक्यामध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे मुंब्रा-कौसा भागाला नेहमीच सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे. महिनाभर पाणी नसल्याने मुंब्रावासियांचे हाल होत आहेत.

नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणे हा संविधानाच्या 21 व्या कलमाचा म्हणजेच मूलभूत अधिकारांचे हनन आहे. त्याविरोधात आपण हे आंदोलन सुरु केले होते. तर, सोमवारी अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्वासनाबाबत मर्झिया पठाण म्हणाल्या की, पाणी खात्याच्या अधिकार्‍यांनी आपणाला हे आश्वासन नसून आमच्या पाणीटंचाईबाबत नियोजनात्मक काम करण्यात येणार आहे, असे सांगितले आहे.  जर त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही तर आमच्याकडेही नियोजन आहे. ते आम्ही त्यांना दाखवून देऊ, असेही सांगितले

टॅग्स :mumbraमुंब्रा